शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या वर्षी रेणुकादेवी चैत्र यात्रोत्सव रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:32 IST

शहराचे आराध्य दैवत रेणुकादेवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवाला लाखो भाविक दरवर्षी येतात. यामुळे येथे दरवर्षी प्रसाद, मिठाई, खेळणी, कटलरी साहित्य, ...

शहराचे आराध्य दैवत रेणुकादेवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवाला लाखो भाविक दरवर्षी येतात. यामुळे येथे दरवर्षी प्रसाद, मिठाई, खेळणी, कटलरी साहित्य, भांडे आदींसह एकूण बाजारपेठ व प्रवासी वाहतूक, हॉटेल, शीतपेय व्यवसायाला मोठा लाभ होतो. लाखो रुपयांची उलाढाल या यात्रेनिमित्ताने होते. तथापि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असल्याने नवस फेडणे, दर्शनासाठी मोठी गर्दी यानिमित्ताने शहरात होत असते. मात्र, कोरोनामुळे गतवर्षी यात्रा रद्द झाली होती. त्यापश्चातही अनेक दिवस मंदिर बंद असल्याने याचा फटका मंदिर परिसरातील दुकानदारांना बसला आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेतून तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाही चैत्र यात्रा व इतर सर्व सार्वजनिक उत्सव रद्द झाल्याने सर्वांचाच हिरमोड झाला आहे. यात्रा रद्द करण्याबाबत श्री रेणुका देवी संस्थान चिखली विश्वस्त मंडळ व जिल्हा प्रशासनाचा निर्णय झाला आहे. भाविकांनी कठोर निर्बंध पाळत घरीच राहण्याचे आवाहन व मंदिरात गर्दी न करण्याच्या सूचना या पृष्ठभूमीवर देण्यात आल्या आहे. 'विदर्भासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवीच्या वासंतिक नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हजारो वर्षांपासून चालत आलेला आदिशक्ती श्री रेणुका देवी चैत्र पौर्णिमा उत्सव, वहनोत्सव नगर परिक्रमा आज देशापुढील कोरोना आपत्तीमुळे होणार नाही, परंपरा ही जपूच पण सार्वजनिक सोहळा करता येणार नाही, कोणालाच सहभागी होता येणार नाही', असे संस्थानच्या विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.

सर्वच कार्यक्रम रद्द

चिखलीत चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवानिमित्त देवीचे वहन मिरवणूक व नगर परिक्रमा या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. यावर्षी २७ एप्रिलला हा सोहळा नियोजित होता. मात्र, देवीचे वहन मिरवणूक निघणार नाही. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. २७ एप्रिल पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थिातीत देवीची आरती होईल. त्याचवेळी सर्व भाविकांनी आपापल्या घरी देवीच्या प्रतिमेसमोर पूजा, आरती करावी, याचे प्रतीक म्हणून दारासमोर अंगणात ५ दिवे लावावेत आणि प्रामुख्याने कोरोना विषाणू संकटाशी लढा देण्याची शक्ती आम्हाला दे, अशी प्रार्थना देवीकडे करावी, असे आवाहन संस्थानने केले असून देवीच्या चैत्र नवरात्राचे उपवास २७ एप्रिलला सुटतील, असे स्पष्ट केले आहे.