शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

सलग दुसऱ्या वर्षी रेणुकादेवी चैत्र यात्रोत्सव रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:32 IST

शहराचे आराध्य दैवत रेणुकादेवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवाला लाखो भाविक दरवर्षी येतात. यामुळे येथे दरवर्षी प्रसाद, मिठाई, खेळणी, कटलरी साहित्य, ...

शहराचे आराध्य दैवत रेणुकादेवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवाला लाखो भाविक दरवर्षी येतात. यामुळे येथे दरवर्षी प्रसाद, मिठाई, खेळणी, कटलरी साहित्य, भांडे आदींसह एकूण बाजारपेठ व प्रवासी वाहतूक, हॉटेल, शीतपेय व्यवसायाला मोठा लाभ होतो. लाखो रुपयांची उलाढाल या यात्रेनिमित्ताने होते. तथापि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असल्याने नवस फेडणे, दर्शनासाठी मोठी गर्दी यानिमित्ताने शहरात होत असते. मात्र, कोरोनामुळे गतवर्षी यात्रा रद्द झाली होती. त्यापश्चातही अनेक दिवस मंदिर बंद असल्याने याचा फटका मंदिर परिसरातील दुकानदारांना बसला आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेतून तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाही चैत्र यात्रा व इतर सर्व सार्वजनिक उत्सव रद्द झाल्याने सर्वांचाच हिरमोड झाला आहे. यात्रा रद्द करण्याबाबत श्री रेणुका देवी संस्थान चिखली विश्वस्त मंडळ व जिल्हा प्रशासनाचा निर्णय झाला आहे. भाविकांनी कठोर निर्बंध पाळत घरीच राहण्याचे आवाहन व मंदिरात गर्दी न करण्याच्या सूचना या पृष्ठभूमीवर देण्यात आल्या आहे. 'विदर्भासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवीच्या वासंतिक नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हजारो वर्षांपासून चालत आलेला आदिशक्ती श्री रेणुका देवी चैत्र पौर्णिमा उत्सव, वहनोत्सव नगर परिक्रमा आज देशापुढील कोरोना आपत्तीमुळे होणार नाही, परंपरा ही जपूच पण सार्वजनिक सोहळा करता येणार नाही, कोणालाच सहभागी होता येणार नाही', असे संस्थानच्या विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.

सर्वच कार्यक्रम रद्द

चिखलीत चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवानिमित्त देवीचे वहन मिरवणूक व नगर परिक्रमा या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. यावर्षी २७ एप्रिलला हा सोहळा नियोजित होता. मात्र, देवीचे वहन मिरवणूक निघणार नाही. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. २७ एप्रिल पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थिातीत देवीची आरती होईल. त्याचवेळी सर्व भाविकांनी आपापल्या घरी देवीच्या प्रतिमेसमोर पूजा, आरती करावी, याचे प्रतीक म्हणून दारासमोर अंगणात ५ दिवे लावावेत आणि प्रामुख्याने कोरोना विषाणू संकटाशी लढा देण्याची शक्ती आम्हाला दे, अशी प्रार्थना देवीकडे करावी, असे आवाहन संस्थानने केले असून देवीच्या चैत्र नवरात्राचे उपवास २७ एप्रिलला सुटतील, असे स्पष्ट केले आहे.