शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकनिहाय याद्या प्रसिद्ध करा!

By admin | Updated: July 6, 2017 00:08 IST

हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार ८१८ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकनिहाय याद्या व कर्जमाफीची रक्कम प्रसिद्ध करण्याबाबतची मागणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. कर्जमाफीच्या या गोंधळात ३० जून २०१७ पर्यंत केवळ २८ हजार ८९९ शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी पीक कर्ज मंजूर करण्यात आले असून, अनेक शेतकरी अद्यापही वंचित आहेत. या शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत युद्ध पातळीवर पीक कर्ज देण्याबाबतची मागणीसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची संख्या घोषित केली आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार ८१८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेष उल्लेखनीय असे, की या संख्येमध्ये पुनर्गठन, नियमित कर्ज भरणारे तसेच ओ.टी.एस. चा लाभ घेणारे शेतकरी समाविष्ट नसल्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून नमूद करण्यात आलेले आहे.या पार्श्वभूमीवर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा जिल्ह्याची सन २०१६-१७ या वित्तीय वर्षातील पीक कर्ज वाटपाची स्थिती आपल्या निवेदनात नमूद केली असून, खरीप हंगाम नियोजनाच्या अहवालानुसार १,६६,०६७ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक (४६,१४२), राष्ट्रीयीकृत बँका (१,१८,९०५) व ग्रामीण बँक (३१,०२०) इत्यादींचा समावेश आहे. तर १,३३,५०५ शेतकरी हे थकबाकीदार होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक (४१,३६२), राष्ट्रीयीकृत बँका (६७, ९१८) व ग्रामीण बँक (२३,२२५) इत्यादींचा समावेश आहे. म्हणजेच बुलडाणा जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये एकूण २,९९,५७२ शेतकरी हे बँकेशी संबंधित खातेदार असल्याचे नमूद केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे घोषित केलेल्या कर्जमाफीदार शेतकऱ्यांच्या २,४९,८१८ या संख्येमुळे संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. कर्जमाफी संदर्भात शासनाच्या आतापर्यंतच्या वेळखाऊ भूमिकेमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला असून, कर्जमाफी मिळाली की नाही, नवीन पीक कर्ज मिळणार की नाही, या कोंडीत अडकलेला असल्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तसेच सन २०१६-१७ या वित्तीय वर्षात ३० जून २०१७ पर्यंत केवळ २८,८९९ शेतकऱ्यांनाच पीक कर्ज मंजूर करण्यात आल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.प्रशासकीय पातळीवर शेतकरी कर्ज वाटप व कर्जमाफीच्या अनुषंगाने विविध विभागांच्या व बँकांच्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ निदर्शनास येत असून, यंत्रणेत सुद्धा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातील कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकनिहाय याद्या व कर्जमाफीची रक्कम प्रत्येक बँकेने प्रसिद्ध करण्याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावे, सोबतच चालू हंगामात केवळ सहा टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना लक्षात घेता, १५ जुलैपर्यंत पीक कर्ज वितरित करण्याची मागणी आ. सपकाळ यांनी केली आहे.