शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकनिहाय याद्या प्रसिद्ध करा!

By admin | Updated: July 6, 2017 00:08 IST

हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार ८१८ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकनिहाय याद्या व कर्जमाफीची रक्कम प्रसिद्ध करण्याबाबतची मागणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. कर्जमाफीच्या या गोंधळात ३० जून २०१७ पर्यंत केवळ २८ हजार ८९९ शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी पीक कर्ज मंजूर करण्यात आले असून, अनेक शेतकरी अद्यापही वंचित आहेत. या शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत युद्ध पातळीवर पीक कर्ज देण्याबाबतची मागणीसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची संख्या घोषित केली आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार ८१८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेष उल्लेखनीय असे, की या संख्येमध्ये पुनर्गठन, नियमित कर्ज भरणारे तसेच ओ.टी.एस. चा लाभ घेणारे शेतकरी समाविष्ट नसल्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून नमूद करण्यात आलेले आहे.या पार्श्वभूमीवर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा जिल्ह्याची सन २०१६-१७ या वित्तीय वर्षातील पीक कर्ज वाटपाची स्थिती आपल्या निवेदनात नमूद केली असून, खरीप हंगाम नियोजनाच्या अहवालानुसार १,६६,०६७ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक (४६,१४२), राष्ट्रीयीकृत बँका (१,१८,९०५) व ग्रामीण बँक (३१,०२०) इत्यादींचा समावेश आहे. तर १,३३,५०५ शेतकरी हे थकबाकीदार होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक (४१,३६२), राष्ट्रीयीकृत बँका (६७, ९१८) व ग्रामीण बँक (२३,२२५) इत्यादींचा समावेश आहे. म्हणजेच बुलडाणा जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये एकूण २,९९,५७२ शेतकरी हे बँकेशी संबंधित खातेदार असल्याचे नमूद केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे घोषित केलेल्या कर्जमाफीदार शेतकऱ्यांच्या २,४९,८१८ या संख्येमुळे संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. कर्जमाफी संदर्भात शासनाच्या आतापर्यंतच्या वेळखाऊ भूमिकेमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला असून, कर्जमाफी मिळाली की नाही, नवीन पीक कर्ज मिळणार की नाही, या कोंडीत अडकलेला असल्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तसेच सन २०१६-१७ या वित्तीय वर्षात ३० जून २०१७ पर्यंत केवळ २८,८९९ शेतकऱ्यांनाच पीक कर्ज मंजूर करण्यात आल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.प्रशासकीय पातळीवर शेतकरी कर्ज वाटप व कर्जमाफीच्या अनुषंगाने विविध विभागांच्या व बँकांच्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ निदर्शनास येत असून, यंत्रणेत सुद्धा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातील कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकनिहाय याद्या व कर्जमाफीची रक्कम प्रत्येक बँकेने प्रसिद्ध करण्याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावे, सोबतच चालू हंगामात केवळ सहा टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना लक्षात घेता, १५ जुलैपर्यंत पीक कर्ज वितरित करण्याची मागणी आ. सपकाळ यांनी केली आहे.