शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

टाकळी वतपाळ गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू!

By admin | Updated: March 18, 2017 00:56 IST

जिगाव प्रकल्पग्रस्त गावाचे १३५ एकरामध्ये पुनर्वसन.

हिंगणे गव्हाड (जि. बुलडाणा), दि. १७- गेल्या २00८ पासून जिगाव प्रकल्पाचे मातीभिंतीचे नदीपात्रातील बांधकाम अतिशय जोमाने सुरू आहे. या जिगाव प्रकल्पामध्ये ३२ गावे पूर्णत: बाधित असून, १५ गावे ही अशंत: बाधित आहेत. या ३२ गावांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन पुनर्वसन विभागातून राबविले जात असून, या गावांचे पुनर्वसन करण्याकरिता तसेच निधीचा योग्य विनियोग करता यावा म्हणून या सर्व गावांचे पुनर्वसन करण्याकरिता जिगाव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग शेगाव यांच्या पाच टप्पे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सहा गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यामध्ये जिगाव प्रकल्पांतर्गत टाकळी वतपाळ या गावांचे मोमीनाबाद शिवारामध्ये हिंगणे गव्हाड ते मोमीनाबाद रस्त्याने १३५ एकरामध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे. देवाशिस कन्स्ट्रक्शन औरंगाबादमार्फत कामाला जोमात सुरूवात झाली आहे. या पुनर्वसित वतपाळ गावामध्ये प्राथमिक शाळेचे बांधकाम, अंतर्गत रस्ते, त्यावरील पुलाचे बांधकाम उघडी गटाराचे बांधकाम करणे, ग्रामपंचायत भवन, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम, कोंडवाडा, प्रवेशद्वाराचे बांधकाम, सार्वजनिक शौचालये व गुरांसाठी हौदाचे बांधकाम, स्मशानभूमी रोडचे बांधकाम, बस थांबा यासह १८ जीवनावश्यक सुविधांचा यामध्ये समावेश आहे. याकरिता जिगाव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग शेगाव यांच्याकडून कामांची पाहणी करण्यात येत आहे. लवकरच काम पूर्ण होणार आहे.