शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

साखरखेर्डा कॉपी प्रकरणात शिक्षक व विद्यार्थ्यांची साक्ष नोंदणी

By निलेश जोशी | Updated: March 8, 2023 17:40 IST

गुंतागुंतीच्या साखरखेर्डा कॉपी प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने या संपूर्ण प्रकरणाची उकल करण्यासाठी परीक्षा केंद्रावरील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जबाबाची नोंदणी सुरू केली आहे.

साखरखेर्डा (जि. बुलढाणा): गुंतागुंतीच्या साखरखेर्डा कॉपी प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने या संपूर्ण प्रकरणाची उकल करण्यासाठी परीक्षा केंद्रावरील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जबाबाची नोंदणी सुरू केली आहे. या माध्यमातून ही साखळी नेमकी कशी तयार झाली याची उकल करण्यास मदत मिळणार आहे.

दुसरीकडे या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून सातही आरेपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. तीन मार्च ारेजी १२ वीच्या गणिताचा पेपर मोबाईल ग्रुपवर व्हायरल झाला होता. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होती. १० मार्च पर्यंत त्यांना पोलिस कोठडी न्यायालायने सुनावली आहे. दरम्यान पेपर फुटी प्रकरणी सर्वप्रथम शेंदुर्जन येथील वच्छगुलाब बहुउद्देशीय संस्थेचे संचालक गोपाल दामोदर शिंगणे यांना अटक झाली होती. त्यांच्या मोबाईलमधून ‘खुपीया’ गृपवर त्यांनी प्रश्नपत्रीका व्हायरल केली होती, असा आरोप आहे.

त्यानंतर गणेश शिवानंद नागरे, पवन सुधाकर नागरे, गणेश बंद्रीनाथ पालवे, यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय किनगावजट्टू येथील गजानन शेषराव आडे यांना अटक झाली होती. यातील गजानन आडे यांची विनाअनुदानित शाळा व काॅलेज असून यांना डॉ . झाकीर हुसेन विद्यालयाचे शिक्षक शेख अकील शेख मुनाफ यांनी सकाळी १० :२० वाजता परीक्षा सुरु होण्यापूर्वी प्रश्न प्रश्न पत्रीका व्हायरल केली होती . अंकुश पृथ्वीराज चव्हाण या शिक्षकाने विद्यार्थ्यांना परीक्षा काळात उत्तरे पुरविल्याची चर्चा आहे. त्याच बरोबर शेंदुर्जन येथील वच्छगुलाब बहुउद्देशीय संस्थेचे विद्यार्थी राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असल्या कारणाने काही विद्यार्थ्यांना सामुहिक काॅपी पुरविल्या गेल्याची माहिती आहे.

त्यामुळे पोलीसांनी राजेगाव, बिबी, लोणार येथील परीक्षा केंद्रावर उपस्थित शिक्षकांचे जबाब व साक्षी पुरावे घेण्यास सुरुवात केली आहे. परीक्षा सुरु असतांना पेपर बाहेर कसा आला? त्याचा लाभ कोणी कोणी कसा घेतला?, याबाबत पोलीस तपास करीत आहे. बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी शेंदुर्जन येथील काही शिक्षकांना बोलावून त्यांची साक्ष नोंदणी सुरू केली होती. टप्प्या टप्प्याने याची व्याप्ती वाढवून प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.