शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

लागवडीसोबतच संगोपन आवश्यक!

By admin | Updated: June 30, 2016 01:00 IST

लोकमत परिचर्चेतील सूर: वृक्ष संगोपनाची सामूहिक जबाबदारी घेणे आवश्यक.

बुलडाणा : शासनाच्यावतीने यावर्षी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या वृक्ष लागवडीच्या चळवळीत शासकीय कर्मचार्‍यांसह विविध संस्था, संघटना तसेच पर्यावरणप्रेमी मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत; मात्र दरवर्षी मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे वृक्ष लागवडीनंतर वृक्ष संगोपनावर भर देण्याची गरज असल्याचे मत ह्यवृक्ष लागवड ठरतोय फार्स?ह्णया विषयावर लोकमततर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या परिचर्चेत उमटला. पावसाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र अल्हाददायक वातावरण आहे. या दिवसात वृक्ष लागवड केल्यास अनेक रोपे जिवंत ठेवण्यास मदत होते. पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड आवश्यक असून, शासनाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही १ जुलै रोजी दोन लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे; मात्र दरवर्षी वृक्ष लागवड झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. या चळवळीकडे शासकीय कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतो; मात्र शासकीय कर्मचारी या चळवळीत सहभागी होत असून, पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेत असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे काहींनी सांगितले, तर काही पर्यावरण प्रेमींनी वृक्ष लागवड केल्यानंतर वृक्ष संगोपनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. काहींनी वृक्ष संगोपनात सातत्य हवे, त्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत वेग येईल. यासाठी वृक्ष संगोपनाची सामूहिक जबाबदारी घेऊन वृक्ष संगोपनावर भर देण्याची गरज असल्याचे काहींनी सांगितले.