शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

माणसांना माणसाशी जोडते ती खरी कविता - अजिम नवाज राही

By admin | Updated: May 30, 2017 19:46 IST

स्वा.सै.शाहीर ना.मा.मिरगे पुरस्काराचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सल असली की अस्सल लिहीले जाते. मी सुचलं म्हणुन लिहीत नाही तर बोचलं म्हणुन लिहीतो. माय मराठीने जोंधळ्याच्या कणसात दाणे भरावेत इतकं भरभरून दिलं. कवी लिहीतो तो समाज जोडण्यासाठी , माणसाला माणसाशी जोडते ती खरी कविता असते असं मी माणतो, असे विचार मांडले ख्यातनाम कवी, निवेदक अजिम नवाज राही यांनी मांडले.माजलगाव येथील स्वा.सै.शाहीर ना.मा.मिरगे प्रतिष्ठाण चा 6 वा राज्यस्तरीय पुरस्कार स्विकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. म.फुले विद्यालयाच्या अनंत भालेराव सभाग्रहात व्यासपीठावर नवविकासमंडळाचे अध्यक्ष अँड.एस आर. शर्मा ,प्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर , म.फुले विद्यालय शालेय समिती चे अध्यक्ष र.ब.देशमुख , प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाट्यलेखक अरुण मिरगे , सचीव श्याम मिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथे प्रमाणे प्रारंभी मारोती मिरगे , रोहीणी जोशी ,शाम मिरगे यांनी शाहीरांच्या कवितांचे वाचन केले. यावर्षीचा पुरस्कार अजिम नवाज राही यांच्या कल्लोळातला एकांत या काव्यसंग्रहासाठी राही यांना अँड.एस.आर.शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कल्लोळातील एकांत या काव्यसंग्रहा वर बोलताना कवी प्रभाकर साळेगावकर म्हणाले, की जगणं आणि भोगणं यापेक्षा राही यांची कवितेला वागणं महत्वाचं वाटतं , हा महत्वाचा सा-या अनुबंधाचा पुल उन्नत करणारी कविता या संग्रहात आहे. जात ,धर्म ,प्रांत या पेक्षा माणुस मोठा करणा-या कवितेत येणारी प्रतिमा आणि प्रतिके विलक्षण वेगळी आहेत. परंपरा ,आधुनिकता यांचा वस्तुनिष्ठ दर्शनाचा पाढा विषद करणा-या १३४ कवितेला कोणत्याही अभिनवेशासाचा लवलेश नाही. माणुस किती शिकला याला महत्व नाही तो कसा वागला हे महत्वाचे आहे.पर्यावरण निष्ठ, एकात्मता निष्ठ , मानवता निष्ठ , कवितेचा मुक्तछंद टोकदार लयीने मांडणारे राही हे नव्वोदत्तरी कवितेचे महत्वाचे कवी आहेत. अजिम नवाज राही यांच्या ही तासाभराच्या ओघवत्या शैलीने रसिक मोहरून गेले. पडझड मोहल्लाची, सडकेलगतची झाडे, अमेरिका या कविता सादर झाल्या. राज्यस्तरीय अशा पुरस्काराच्या शानदार वितरण सोहळ्यास साहित्यिक मोहीब कादरी, अशोक वाडेकर, भास्कर काळे, लता जोश, दैठणकर, खेलबा काळे, भारत सोळंके, प्रकाश पत्की, डाँ.प्रज्ञा जोशी, प्रशांत भानप ,अंजीराम भोसले ,आरेफ शेख ,सूरेखा कोकड ,प्रतिभा थिगळे ,बळीराम वायबसे यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवी अशोक मिरगे यांनी केले तर मानपत्राचे वाचन आणि आभार प्रदर्शन कवी महेश देशमुख यांनी केले.