शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

राष्ट्रधर्म प्रचार समिती पुरविते ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:19 IST

बुलडाणा : जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी आजच्या आधुनिक काळातही जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून राज्यभर होत आहे. राज्यात राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या ५० शाखांमधून तुकडोजी महाराजांनी दिलेली मानवतेची शिकवण देण्याचे कार्य केले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त १० आॅक्टोबरला महाराजांना श्रद्धांजली अर्पण करून ‘मानवता दिन’ साजरा करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देआज ‘मानवता दिन’ राज्यात ५० शाखांमधून चालते कार्य

ब्रम्हानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी आजच्या आधुनिक काळातही जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून राज्यभर होत आहे. राज्यात राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या ५० शाखांमधून तुकडोजी महाराजांनी दिलेली मानवतेची शिकवण देण्याचे कार्य केले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त १० आॅक्टोबरला महाराजांना श्रद्धांजली अर्पण करून ‘मानवता दिन’ साजरा करण्यात येत आहे. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ माननारे आधुनिक काळातील महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी  भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनाचे कार्य केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हाती घेवून जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देण्याचे कार्य त्यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून खास तत्वज्ञानाचा प्रसार व्हावा, म्हणून राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र तयार करण्यात आले. या केंद्रातर्गत तुकडोजी महाराजांचे विचार आजच्या आधुनिक काळाज राज्याच्या कानाकोपºयात पोहचविण्यासाठी  राष्ट्रधर्म प्रचार समिती कार्य करत आहे.  आचार्य वेरूळकर गुरूजी आजीवन प्रचारक तर अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ हे तर कमिटीचे संचालक अध्यक्ष माधवराव सूर्यवंशी आहेत. तसेच कार्याध्यक्ष म्हणून डॉ.नरेंद्र तराळ हे काम पाहतात. राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या राज्यभरात ५० शाखांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या विदर्भात ४०, मराठवाडा पाच व पश्चिम महाराष्ट्रात पाच अशा एकूण ५० शाखांमधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे अखंड कार्य सध्या सुरू आहे. अखिल भारतीय श्रीगुरूदेव मंडळाच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त १० आॅक्टोबर रोजी श्रद्धांतली अर्पण करून मानवता दिन पाळण्यात येत आहे. त्यानिमित्त राष्ट्रधर्म प्रचार समितीकडून विविध ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. 

दिवाळी सुट्टीमध्ये होते संस्कार शिबीरराष्ट्रधर्म प्रचार समितीच्या राज्यात असलेल्या ५० शाखांतर्गत दिवाळी व उन्हाळी सुट्टीमध्ये संस्कार शिबीर घेण्यात येते. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये मानवतेला केंद्रभूत ठेवून लिहिलेले विचार मुलांमध्ये रूजविण्यासाठी यावर्षी सुद्धा दिवाळी सुट्टीत राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या शाखांकडून संस्कार शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या सर्व शाखांमधून तुकडोजी महाराजांचे विचार सर्वत्र पोहचविण्याचे कार्य करण्यात येते. प्रामाणिक व सत्वशील समाजाच्या निर्मितीसाठी हे कार्य अखंड सुरू आहे. - प्रशांत ठाकरे, राष्ट्रधर्म प्रचार समिती प्रवक्ता.