शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रधर्म प्रचार समिती पुरविते ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:19 IST

बुलडाणा : जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी आजच्या आधुनिक काळातही जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून राज्यभर होत आहे. राज्यात राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या ५० शाखांमधून तुकडोजी महाराजांनी दिलेली मानवतेची शिकवण देण्याचे कार्य केले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त १० आॅक्टोबरला महाराजांना श्रद्धांजली अर्पण करून ‘मानवता दिन’ साजरा करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देआज ‘मानवता दिन’ राज्यात ५० शाखांमधून चालते कार्य

ब्रम्हानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी आजच्या आधुनिक काळातही जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून राज्यभर होत आहे. राज्यात राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या ५० शाखांमधून तुकडोजी महाराजांनी दिलेली मानवतेची शिकवण देण्याचे कार्य केले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त १० आॅक्टोबरला महाराजांना श्रद्धांजली अर्पण करून ‘मानवता दिन’ साजरा करण्यात येत आहे. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ माननारे आधुनिक काळातील महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी  भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनाचे कार्य केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हाती घेवून जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देण्याचे कार्य त्यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून खास तत्वज्ञानाचा प्रसार व्हावा, म्हणून राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र तयार करण्यात आले. या केंद्रातर्गत तुकडोजी महाराजांचे विचार आजच्या आधुनिक काळाज राज्याच्या कानाकोपºयात पोहचविण्यासाठी  राष्ट्रधर्म प्रचार समिती कार्य करत आहे.  आचार्य वेरूळकर गुरूजी आजीवन प्रचारक तर अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ हे तर कमिटीचे संचालक अध्यक्ष माधवराव सूर्यवंशी आहेत. तसेच कार्याध्यक्ष म्हणून डॉ.नरेंद्र तराळ हे काम पाहतात. राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या राज्यभरात ५० शाखांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या विदर्भात ४०, मराठवाडा पाच व पश्चिम महाराष्ट्रात पाच अशा एकूण ५० शाखांमधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे अखंड कार्य सध्या सुरू आहे. अखिल भारतीय श्रीगुरूदेव मंडळाच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त १० आॅक्टोबर रोजी श्रद्धांतली अर्पण करून मानवता दिन पाळण्यात येत आहे. त्यानिमित्त राष्ट्रधर्म प्रचार समितीकडून विविध ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. 

दिवाळी सुट्टीमध्ये होते संस्कार शिबीरराष्ट्रधर्म प्रचार समितीच्या राज्यात असलेल्या ५० शाखांतर्गत दिवाळी व उन्हाळी सुट्टीमध्ये संस्कार शिबीर घेण्यात येते. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये मानवतेला केंद्रभूत ठेवून लिहिलेले विचार मुलांमध्ये रूजविण्यासाठी यावर्षी सुद्धा दिवाळी सुट्टीत राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या शाखांकडून संस्कार शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या सर्व शाखांमधून तुकडोजी महाराजांचे विचार सर्वत्र पोहचविण्याचे कार्य करण्यात येते. प्रामाणिक व सत्वशील समाजाच्या निर्मितीसाठी हे कार्य अखंड सुरू आहे. - प्रशांत ठाकरे, राष्ट्रधर्म प्रचार समिती प्रवक्ता.