शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अवकाळी पावसाने रब्बीचे नुकसान

By admin | Updated: January 1, 2015 00:39 IST

बुलडाणा जिल्ह्यात वादळी वा-यासह पाऊस ; संग्रामपूर, नांदुरा तालुक्यासह काही भागात पडल्या गारा.

बुलडाणा : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. तापमानाचा पारा ८ अंशावर येऊन ठेपल्यामुळे जिल्ह्याला हुडहुडी भरली असताना बुधवारी पहाटे व दिवसभर जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वार्‍यासह, तर संग्रामपूर, नांदुरा तालुक्यासह काही भागात तुरळक गाराही पडल्याने थंडीचा कहर जिल्ह्यात कायम आहे. शिवाय अचानक आलेल्या या पावसामुळे रब्बीच्या हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ८ अंश सेल्सियसवर आले. त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कहर झाला आहे. बरोबर असलेल्या ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांवर किडीचा प्रदुर्भाव झाला. या वातावरणात कडाड्याच्या थंडीबरोबरच बुधवारी पहाटे चार वाजता परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळी झालेला हा पाऊस सर्वदूर झाला. त्यानंतर बुधवारी दिवसभर जिह्यात ठिकठिकाणी या पावसाने हजेरी लावली. देऊळगावराजा, सिंदखेडराजा शहर व परिसरात पाऊस झाला. देऊळगावमही येथे तब्बल दोन तास वादळी वार्‍यासह पाऊस झाला. काही भागात तुरळक स्वरूपाच्या गाराही पडल्याची माहिती आहे. रुईखेड मायंबा, धाड, चांडोळ, डोमरूळ या परिसरातही पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. संग्रामपूर पावसाबरोबर गारा पडल्या आहेत. यामुळे रब्बी पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. *चांडोळ येथे गारांचा पाऊस मंगळवारी ३0 डिसेंबर सायंकाळपासूनच आकाशात ढग जमा होऊन दुसर्‍या दिवशी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली होती. तर बुधवारी सायंकाळी या परिसरात अर्धा तास पाऊस झाला. या पावसाबरोबर हरभर्‍याएवढय़ा गाराही पडल्या. वादळी वारा, पाऊस आणि गारा पडल्याने शेतातील हरभरा, गहू आणि कांदा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. या आवकाळी पावसाने शेतकर्‍यांची एकच तारांबळ उडाली होती. अनेक शेतकर्‍यांच्या शेतात अद्याप सोयाबीनच्या सुड्या आहेत. बुधवारी सकाळी झालेल्या पावसाने काही शेतकर्‍यांचे सोयाबीनसुद्धा भिजल्याचे वृत्त आहे.