शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

रजतनगरी दुमदुमली

By admin | Updated: August 20, 2015 23:56 IST

‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत; शहरातील रस्ते भक्तिभावाने सजले.

खामगाव : पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे गुरूवारी सकाळी ८.३0 वाजता खामगाव येथे आगमन झाले. ह्यश्रींह्णची पालखी संतनगरीत दाखल होताच विविध सामाजिक संघटना, धार्मिक आणि युवक मंडळांच्यावतीने ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विदर्भ पंढरीनाथ गजानन महाराजांची पायदळ वारी पंढरपूर येथे संतनगरी शेगाव येथून रवाना झाली होती. त्यानंतर तब्बल ५५ पेक्षा जास्त दिवसांचा प्रवास करीत आता परतीच्या मार्गावर आहे. दरम्यान, शहरात गुरूवारी सकाळी पालखी दाखल होताच खामगाव बायपास रोडवरील हनुमान व्हिटामिन येथे पालखीचा पहिला मुक्काम झाला. या ठिकाणी पालखीच्या पूजनानंतर वारकर्‍यांना जेवण देण्यात आले. सनियंत्रण समितीचे विश्‍वपालसिंह जाधव, उपाध्यक्ष वैभव डवरे, सरस्वतीताई खासने, दिलीप पवार, शरदचंद्र गायकी, संजय सिनगारे, संतोष देशमुख यांची याप्रसंगी उपस्थिती होती. बाळापूर फैलात सम्राट अशोक क्रीडा मंडळाच्यावतीने आशिष धुंदळे, प्रकाश मोरे, कपिल खंडारे, धम्मा नितनवरे, सुमीत मेढे, महादेव वाकोडे यांनी स्वागत केले. त्यानंतर गौतम चौक, बाजार समिती मागील रस्त्याने भुसावळ चौक, सरकी लाईन मार्गे मुख्य रस्त्यावर पालखी पोहोचली. वाटेत विविध ठिकाणी भाविकांनी वारकर्‍यांना विविध साहित्याचे वितरण केले. यामध्ये गौतम चौक मित्रमंडळ, श्री हनुमान ऑटो स्टॉप सती फैल, सुरेका परिवार सती फैल, सरकी लाईन मित्रमंडळ, नेताजी नवयुवक मंडळ, चंदनशेष मंडळ, कालिंका सार्वजनिक उत्सव मंडळ, तुलसी भजनी मंडळ, रामदल मंडळ, जय गजानन मंडळ टॉवर चौक, जय संतोषी माँ नवयुवक मंडळ फरशी, आदर्श नवयुवक मंडळ, श्रीकृष्ण मंडळ, माँ वैष्णवी मंडळ रेखा प्लॉट मित्रमंडळाच्यावतीने नांदुरा रोडवर चहाचे वितरण करण्यात आले. टॉवर चौकात पाणीपुरी व्यावयायिक तसेच टॉवर चौक मित्रमंडळाच्यावतीने वारकर्‍यांना ओल्या नारळाचे वितरण करण्यात आले. सहाशे नारळांचे यावेळी वितरण झाले. विविध ठिकाणी महिला भाविकांनी सडा घालून आकर्षक रांगोळ्यांची आरास पालखी मार्गावर केली. यावेळी ध्वनिफित वाजवून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. सुटाळपुर्‍यातील संत गजानन अवलिया महाराज भक्तमंडळाने पालखीचे पूजन केले. याठिकाणी संत गजानन अवलिया महाराज भक्तमंडळाचे अध्यक्ष श्रीराम पंढरी पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. त्यानंतर वारकर्‍यांना भोजन देण्यात आले.