शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पावसाळ्याच्या तोंडी टँकरचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

चिखली : यंदा जून महिना संपण्यास आला असला तरीही तालुक्यातील काही मंडळे वगळता अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अनेक ...

चिखली : यंदा जून महिना संपण्यास आला असला तरीही तालुक्यातील काही मंडळे वगळता अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अनेक गावांमध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. यामध्ये आता शहराचाच एक भाग बनलेल्या सैलानी नगरची स्थिती अत्यंत गंभीर असून, पावसाळ्यातदेखील येथे टँकरने पाणीपुरवठा होतो.

चिखली तालुक्यातील यावर्षी मे अखेरपर्यंत २८ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. जून महिना सुरू झाल्यानंतर पाणीटंचाई दूर होईल, अशी अपेक्षा टंचाईची झळ सोसणाऱ्या गावांना होती. मात्र, आता पावसाळा लागलेला असतानाही तालुक्यातील उंद्री, वैरागड, हरणी, टाकरखेड मु., अमडापूर, मुंगी, धानोरी, किन्ही सवडद, घानमोड व अमडापूर ही गावे वगळता तालुक्याला अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. याचा परिणाम जसा शेती क्षेत्रावर झाला आहे. तसाच विपरीत परिणाम जीवमानावर होत असल्याने किमान पाणीटंचाईतून सुटका होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. पावसाअभावी टंचाईग्रस्त गावांची भिस्त असलेल्या पाणीपुरवठ्या जलस्तोत्रांमध्ये अद्यापही मुबलक प्रमाणात जलसाठा झालेला नाही. परिणामी २८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ उन्हाळ्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना अद्यापही कायम आहेत. या अनुषंगाने २६ गावांसाठी विहिरींचे, दोन गावांसाठी बोअरचे अधिग्रहण अद्यापही कायम आहे. यापैकी १४ गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. असोला, सैलानी नगर आणि कोलारा या तीन गावांत चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या अनुषंगाने खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, या अधिग्रहीत विहिरीवरून टँकर भरून गावास पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातदेखील आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

पाण्यासाठी टँकरवर नागरिकांची झुंबड

गट ग्रामपंचायतीत समावेश असला तरी शहराशी एकजीव झालेल्या सैलानी नगर आज पाण्यासाठी मोताद झाले आहे. पालिका हद्दीवाढीच्या चक्रात फसलेल्या या भागातील नागरिकांना चक्क बादलीभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा टँकर पोहोचताच या भागात पाणी भरण्यासाठी मोठी झुंबड उडते.

हदवाढीचा अंतिम आदेशाने मिळू शकतो दिलासा

नगरपरिषदेने सादर केलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. यामध्ये सैलानी नगरसह परिसरातील इतर नगरांचा समावेश आहे. मात्र, हद्दवाढीसंदर्भातील अंतिम आदेश अद्यापही न आल्याने अनेक नगर पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. हद्दवाढीचा अंतिम आदेश मिळाल्यास दिलासा मिळण्यास मदत होण्यासह प्रामुख्याने सैलानी नगरवासीयांची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे.