शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

पावसाळ्याच्या तोंडी टँकरचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

चिखली : यंदा जून महिना संपण्यास आला असला तरीही तालुक्यातील काही मंडळे वगळता अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अनेक ...

चिखली : यंदा जून महिना संपण्यास आला असला तरीही तालुक्यातील काही मंडळे वगळता अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अनेक गावांमध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. यामध्ये आता शहराचाच एक भाग बनलेल्या सैलानी नगरची स्थिती अत्यंत गंभीर असून, पावसाळ्यातदेखील येथे टँकरने पाणीपुरवठा होतो.

चिखली तालुक्यातील यावर्षी मे अखेरपर्यंत २८ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. जून महिना सुरू झाल्यानंतर पाणीटंचाई दूर होईल, अशी अपेक्षा टंचाईची झळ सोसणाऱ्या गावांना होती. मात्र, आता पावसाळा लागलेला असतानाही तालुक्यातील उंद्री, वैरागड, हरणी, टाकरखेड मु., अमडापूर, मुंगी, धानोरी, किन्ही सवडद, घानमोड व अमडापूर ही गावे वगळता तालुक्याला अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. याचा परिणाम जसा शेती क्षेत्रावर झाला आहे. तसाच विपरीत परिणाम जीवमानावर होत असल्याने किमान पाणीटंचाईतून सुटका होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. पावसाअभावी टंचाईग्रस्त गावांची भिस्त असलेल्या पाणीपुरवठ्या जलस्तोत्रांमध्ये अद्यापही मुबलक प्रमाणात जलसाठा झालेला नाही. परिणामी २८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ उन्हाळ्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना अद्यापही कायम आहेत. या अनुषंगाने २६ गावांसाठी विहिरींचे, दोन गावांसाठी बोअरचे अधिग्रहण अद्यापही कायम आहे. यापैकी १४ गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. असोला, सैलानी नगर आणि कोलारा या तीन गावांत चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या अनुषंगाने खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, या अधिग्रहीत विहिरीवरून टँकर भरून गावास पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातदेखील आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

पाण्यासाठी टँकरवर नागरिकांची झुंबड

गट ग्रामपंचायतीत समावेश असला तरी शहराशी एकजीव झालेल्या सैलानी नगर आज पाण्यासाठी मोताद झाले आहे. पालिका हद्दीवाढीच्या चक्रात फसलेल्या या भागातील नागरिकांना चक्क बादलीभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा टँकर पोहोचताच या भागात पाणी भरण्यासाठी मोठी झुंबड उडते.

हदवाढीचा अंतिम आदेशाने मिळू शकतो दिलासा

नगरपरिषदेने सादर केलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. यामध्ये सैलानी नगरसह परिसरातील इतर नगरांचा समावेश आहे. मात्र, हद्दवाढीसंदर्भातील अंतिम आदेश अद्यापही न आल्याने अनेक नगर पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. हद्दवाढीचा अंतिम आदेश मिळाल्यास दिलासा मिळण्यास मदत होण्यासह प्रामुख्याने सैलानी नगरवासीयांची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे.