शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

पावसाचा दगा; उत्पादन घटले

By admin | Updated: October 18, 2014 23:58 IST

संग्रामपूर तालुक्यातील चित्र, सोयाबीन, कपाशी धोक्यात.

संग्रामपूर (बुलडाणा): परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने सोयाबीनचे दाणे बारीक झाले, तर कोरडवाहू कपाशी धोक्यात आली आहे. दिवाळीच्या सणासह वर्षभराचा आर्थिक गाडा कसा चालवावा, याची चिंता तालुक्यातील शेतकरी, शेतमजुरांसमोर उभी ठाकली आहे.यंदाच्या हंगामात सुरवातीलाच पेरणीचा ताळमेळ हुकल्याने दोन ते तीन वेळा पेरणी करण्याची वेळ आली. यामध्ये बियाण्यासह मजुरीवर आलेला खर्च पाहता, कमीत कमी सोयाबीनची एकरी आठ ते दहा क्विंटलच्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, परतीचा पाऊस कोसळला नाही. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा पक्व होण्याआधीच सुकल्या व दाणे बारीक राहिले. सद्य:स्थितीत एकरी दीड क्विंटलपासून तर चार-पाच क्विंटलपर्यंंत उत्पादनाचे आकडे येत आहेत. सोंगणीचा एकरी हजार व थ्रेशरचे एकरी हजार असा दोन हजार रुपये, शिवाय आतापर्यंतचा खर्च लक्षात घेता, सोयाबीन कोणत्याच भावात परवडणारे झाले आहे. अशातच सोयाबीनला बाजारात क्विंटलमागे अडीच हजार ते तीन हजार रुपये असलेला भाव शेतकर्‍यांसाठी मारक आहे. पाऊसच नसल्याने तुरीचे पीकही धोक्यात आले आहे. सोयाबीनमध्ये हुकले तरी तुरीमध्ये जमेल, ही आशाही मावळताना दिसत आहे. यासोबतच कोरडवाहू कपाशीचे भवितव्य खराब आहे. अजूनही कपाशीची झाडे मोसमात येताना दिसत नाही. थंडीचा जोरही नाही. याचा परिणाम रब्बी हंगामावर होण्याचे चित्र दिसत आहे.