शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By admin | Updated: July 17, 2017 02:07 IST

बुलडाणा, मेहकर, लोणार परिसरात दमदार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवारपासून रिमझिम स्वरूपात हजेरी लावली होती. दरम्यान, आज १६ जुलै रोजी दुपारी २ वाजेपासून बुलडाणा परिसरासह अनेक तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. या पावसामुळे जवळपास ५ हजार हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले असून, बळीराजाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात यावर्षी वेळेवरच जूनला मान्सूनच्या पावसाने सुरुवात झाली होती. जवळपास दोन ते तीन दिवस चांगला पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी महागडी खते, बियाणे खरेदी करून जवळपास पाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली; परंतु ही पिके जमिनीवर येत नाही तोच, पावसाने पंधरा दिवसांपासून दडी मारली. त्यातच दररोज कडक उन्ह पडत असल्यामुळे नुकतेच जमिनीवर आलेली पिके कोमेजली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. कमी पाऊस झाल्यामुळे जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या होत्या. त्यामुळे अनेक तालुक्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले होते; परंतु बुधवारपासून अनेक तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे ५ लाख हेक्टरवरील पिकांना दिलसा मिळाला होता. दरम्यान, १६ जुलै रोजी बुलडाणा, मेहकर, लोणार परिसरात जवळपास दोन तास दमदार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणचे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. या शिवाय मोताळा, देऊळगावराजा, चिखली, सिंदखेडराजा तालुक्यात ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले असून, रखडलेल्या दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्यांना सुरुवात झाली आहे. शिवाय पाच लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळाले आहे. वास्तविक जिल्ह्यातील पावसाचे सरासरी प्रमाण हे ७१२.७ एवढे आहे; परंतु पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटून गेला असतानादेखील आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २२४.८ मिमी पाऊस झाला आहे.घाटाखाली संततधारखामगाव: गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी दुपारी घाटाखालील काही तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. घाटाखालील संग्रामपूर तालुका वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये रविवारी दुपारी १२.३० वाजतापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने परिसरात काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्याची स्थिती होती. या पिकांना आता पावसामुळे संजीवनी मिळाली असून, खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली असली तरी, संग्रामपूर तालुक्याला पावसाची प्रतीक्षा आहे.नुकसान कोठेही नाहीजिल्ह्यातील काही तालुक्यात बुधवारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. दरम्यान, रविवारी दुपारी बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी नदी, नाले वाहू लागले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी भरले होते; मात्र कोठेही नुकसान झाले नाही.