शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची अेाढ; पिकांमध्ये फुलगळतीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 11:42 IST

Agriculture News : पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे.

ब्रह्मानंद जाधव

बुलडाणा : जिल्ह्यात ६ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झालेली आहे. सध्या सोयाबीनसह इतर काही पिके फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहेत. परंतु पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्याचे दिसून येत आहे. पाण्याअभावी पिकांवर फूलगळचा धोका वाढला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी सिंचन करण्याची धडपड करीत आहेत. जिल्ह्यात मागील महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. परंतु हा पाऊस सार्वत्रिक नव्हता, त्यामुळे मागील महिन्यातच पिकांना दमदार पावसाची आवश्यकता होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओल अत्यंत कमी झालेली आहे. माळरानावरील पिकांनी तर माना टाकल्या आहेत. पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी सिंचनाची व्यवस्था करत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही, त्यांची पिके मात्र संकटात सापडली आहेत. कुठल्याही पिकाचे भरघोस उत्पादन मिळण्यासाठी पिकामध्ये अधिक फूलधारणा होणे गरजेचे आहे.

सध्या पाऊस लांबल्याने पिकांना पाणी देणे आवश्यक झाले आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने फूलगळ होऊ शकते. पिकांना सिंचन करताना काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी २४ तास स्प्रिंक्लर चालू ठेवूनही देऊ नये. पाणी योग्य प्रमाणात द्यावे.- सी. पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ज्ञ 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती