शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

लोणारात पावसाची हजेरी

By admin | Updated: July 8, 2014 23:24 IST

पावसाची चातकासारखी वाट पाहत असलेल्या शेतकर्‍यांना शहरात दुपारी झालेल्या पावसाने दिलासा दिला.

लोणार : पावसाची चातकासारखी वाट पाहत असलेल्या शेतकर्‍यांना शहरात दुपारी झालेल्या पावसाने दिलासा दिला. शहरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. गत महिन्याभरापासून दडी मारुन बसलेल्या पावसामुळे शेतकरी हैरान झाले होते. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी जाणारे तालुक्यातील शेकडो शेतकरी यावेळी चिंतेत होते. महिन्याभरापासून पाऊसच पडला नसल्याने तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला. वेळीच वरुणराजा बरसला असता तर पेरण्या पार पडल्या असत्या. बहरलेली हिरवी शेती पाहून शेतकर्‍यांना आनंदात वारी करणे शक्य झाले असते; मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे तालुक्यातील असंख्य शेतकर्‍यांनी पांडुरंगाला पाण्यासाठी साकडे घालत यंदा आषाढीच्या दिवशी पांडुरंगाला दुरुनच हात जोडले; मात्र पांडुरंगानेही शेतकर्‍यांनी घातलेल्या विनवणीला साथ देत आज चौफेर मृगधारा बरसल्या. महिनाभरापासून तहानलेले रान ओलेचिंब झाले आणि बळीराजाच्या चेहर्‍यावर आनंद फुलला.