शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 15:43 IST

फुटलेला कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोंगून ठेवलेल सोयाबीन व नुकताच फुटलेला कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही खरीप हंगामाच्या शेतीमालाच्या नुकसानाची पुनर्रावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. परीणामा अंतिम पैसेवारीलाही फटका बसण्याची शक्यता आहे.यंदाही आगामी पाच दिवस विदर्भामध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन खराब होण्याची भीती आहे. सप्टेंबरमध्ये पिकाला लागलेल्या शेंगातील दाण्यांनाच कोंब फुटले होते. सध्या सोंगलेले सोयाबीन हे जमीनीवरच असल्याने त्याला फटका बसून प्रतवारी घटण्याची भीती आहे. रविवारी जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा परतीचा पाऊस झाल्यामुळे शेतातील सोयाबीनच्या सुड्या भिजल्या. नुकतीच फुटलेली कापसाची बोंडेही फुटल्याने नुकसान झाले. काही ठिकाणी बोंडे काळवंडल्याचे दिसून येत आहे.बुलडाणा, चिखली, खामगाव, मलकापूर, मोताळा, जळगाव जामोद, नांदुरा, शेगाव, लोणार, देऊळगाव राजा, मेहकर , संग्रामपूर, नांदुरा तालुक्यातही हा पाऊस जोरदार बरसला त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. येत्या पाच दिवसातही परतीचा पाऊस मुसळधार बरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील स्थिती ही या परतीच्या पावसासाठी पोषक असल्याने क्यार व महा चक्रीवादळाप्रमाणेच यंदाही हा पाऊस बरसून मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मका, कापूस, तूर, सोयाबीन व भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे. जिल्ह्यात यंदा तीन लाख ६६ हजार हेक्टरवर सोयाबीन तर १.९४ लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला असून त्याला या पावसाचा फटका बसण्याची भीती आहे.तर गेल्या वर्षी ४७८ कोटी रुपयांचे नुकसान ११ दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती