शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 15:43 IST

फुटलेला कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोंगून ठेवलेल सोयाबीन व नुकताच फुटलेला कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही खरीप हंगामाच्या शेतीमालाच्या नुकसानाची पुनर्रावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. परीणामा अंतिम पैसेवारीलाही फटका बसण्याची शक्यता आहे.यंदाही आगामी पाच दिवस विदर्भामध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन खराब होण्याची भीती आहे. सप्टेंबरमध्ये पिकाला लागलेल्या शेंगातील दाण्यांनाच कोंब फुटले होते. सध्या सोंगलेले सोयाबीन हे जमीनीवरच असल्याने त्याला फटका बसून प्रतवारी घटण्याची भीती आहे. रविवारी जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा परतीचा पाऊस झाल्यामुळे शेतातील सोयाबीनच्या सुड्या भिजल्या. नुकतीच फुटलेली कापसाची बोंडेही फुटल्याने नुकसान झाले. काही ठिकाणी बोंडे काळवंडल्याचे दिसून येत आहे.बुलडाणा, चिखली, खामगाव, मलकापूर, मोताळा, जळगाव जामोद, नांदुरा, शेगाव, लोणार, देऊळगाव राजा, मेहकर , संग्रामपूर, नांदुरा तालुक्यातही हा पाऊस जोरदार बरसला त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. येत्या पाच दिवसातही परतीचा पाऊस मुसळधार बरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील स्थिती ही या परतीच्या पावसासाठी पोषक असल्याने क्यार व महा चक्रीवादळाप्रमाणेच यंदाही हा पाऊस बरसून मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मका, कापूस, तूर, सोयाबीन व भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे. जिल्ह्यात यंदा तीन लाख ६६ हजार हेक्टरवर सोयाबीन तर १.९४ लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला असून त्याला या पावसाचा फटका बसण्याची भीती आहे.तर गेल्या वर्षी ४७८ कोटी रुपयांचे नुकसान ११ दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती