शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 15:43 IST

फुटलेला कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोंगून ठेवलेल सोयाबीन व नुकताच फुटलेला कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही खरीप हंगामाच्या शेतीमालाच्या नुकसानाची पुनर्रावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. परीणामा अंतिम पैसेवारीलाही फटका बसण्याची शक्यता आहे.यंदाही आगामी पाच दिवस विदर्भामध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन खराब होण्याची भीती आहे. सप्टेंबरमध्ये पिकाला लागलेल्या शेंगातील दाण्यांनाच कोंब फुटले होते. सध्या सोंगलेले सोयाबीन हे जमीनीवरच असल्याने त्याला फटका बसून प्रतवारी घटण्याची भीती आहे. रविवारी जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा परतीचा पाऊस झाल्यामुळे शेतातील सोयाबीनच्या सुड्या भिजल्या. नुकतीच फुटलेली कापसाची बोंडेही फुटल्याने नुकसान झाले. काही ठिकाणी बोंडे काळवंडल्याचे दिसून येत आहे.बुलडाणा, चिखली, खामगाव, मलकापूर, मोताळा, जळगाव जामोद, नांदुरा, शेगाव, लोणार, देऊळगाव राजा, मेहकर , संग्रामपूर, नांदुरा तालुक्यातही हा पाऊस जोरदार बरसला त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. येत्या पाच दिवसातही परतीचा पाऊस मुसळधार बरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील स्थिती ही या परतीच्या पावसासाठी पोषक असल्याने क्यार व महा चक्रीवादळाप्रमाणेच यंदाही हा पाऊस बरसून मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मका, कापूस, तूर, सोयाबीन व भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे. जिल्ह्यात यंदा तीन लाख ६६ हजार हेक्टरवर सोयाबीन तर १.९४ लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला असून त्याला या पावसाचा फटका बसण्याची भीती आहे.तर गेल्या वर्षी ४७८ कोटी रुपयांचे नुकसान ११ दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती