शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पावसाच्या दडीचा वृक्षारोपणाला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2017 01:00 IST

पंधरा दिवसांपासून पावसाची दडी : रोपे सुकली!

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात चार कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेत विविध शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. परिणामी, जिल्हा प्रशासनाने ८ लाख ५२ हजार वृक्ष लागवडीची उद्दिष्टपूर्ती करून भरीव कार्य केले; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे या वृक्षारोपण मोहिमेला फटका बसण्याची शक्यता असून, अनेक ठिकाणी मोहिमेदरम्यान लावण्यात आलेली रोपे कोमजण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार तथा वस्रोद्योग विभाग, शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभाग, गृह विभाग, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक, महावितरण, अन्न औषध प्रशासनाचे दवाखाने, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कारागृह विभाग, परिवहन विभागाचे राज्य परिवहन विभाग व उप प्रादेशिक परिवहन विभाग, विधी न्याय विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे सिंचन विभाग व पाटबंधारे तसेच कौशल्य विकास विभाग, महसूल विभाग, बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, जिल्हा कोषागार कार्यालय, केंद्र सरकारचे बीएसएनएल व जिल्हा डाक कार्यालय, क्रीडा विभाग तसेच ग्राम विकास विभाग या प्रशासनाच्या मुख्य २६ यंत्रणा मोहिमेत सहभागी झाल्या. या २६ यंत्रणेच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टपूर्ती करीत ८ लाख ६८ हजार ९८२ म्हणजे १.२१ टक्के वृक्ष लागवड केली आहे.मागिल १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी झालेल्या पिकांसह वृक्षारोपण मोहिमेला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सरासरी १९८.९ मि.मी. पाऊसजिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत २५८५.८ मि.मी. म्हणजे सरासरी १९८.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात मागिल १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता चिंतेत आहे. पावसाच्या दडीचा फटका शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेला बसण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक तालुक्यात आतापर्यंत झालेला पाऊस अल्प आहे. त्यात बुलडाणा तालुक्यात २८९ मि.मी., चिखली २२४ मि.मी., देऊळगाव राजा १६५ मि.मी., लोणार २२१ मि.मी., मेहकर २७७ मि.मी., खामगाव १८२.४ मि.मी., शेगाव १२२ मि.मी., मलकापूर १२६ मि.मी., नांदुरा २४१ मि.मी., मोताळा २१३ मि.मी., संग्रामपूर ९८ मि.मी., जळगाव जामोद २०८ मि.मी., असा एकूण २५८५.८ म्हणजे सरसरी १९८. ९ मि.मी., पाऊस झाला आहे.रोपांसाठी नियमित १० मि.मी. पावसाची गरज वृक्षारोपण करताना प्लास्टिकच्या पिशवीतून रोप मातीच्या गोळ्यासह बाहेर काढण्यात येते. त्यामुळे वृक्षारोपण करताना मातीच्या गोळयाचा ओलावा असतो. हा ओलावा दोन दिवस टिकत असते. त्यानंतर रोपांसाठी नियमित दोन दिवसाआड १० मि.मी. पाण्याची गरज असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पाणी देऊ शकत नसल्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. जिल्ह्यात १ ते ७ जुलै दरम्यान वृक्षारोपण करण्यात आले; मात्र मागिल १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वृक्षारोपण मोहिमेतील वृक्ष रोपे कोमजण्याच्या मार्गावर आहेत. यावर्षी वृक्षारोपण मोहिमेला सर्वांनी सहकार्य केल्यामुळे उद्दिष्टपूर्वी झाली आहे; मात्र पाऊस नसल्यामुळे रोपावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. मोहिमेदरम्यान मातीच्या ओल्या गोळ्यासह जमिनीत वृक्षारोपण करण्यात येते. या मातीच्या गोळ्याची ओल दोन दिवस टिकते; मात्र जास्त दिवस पाणी न मिळाल्यास रोपावर परिणाम होऊ शकतो.- जी. ए. झोळे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी, बुलडाणा.