शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश गवई म्हणाले- पहलगाम विसरू शकत नाही
3
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
4
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
5
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
6
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
7
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
8
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
9
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
10
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
11
लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
12
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
13
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
14
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
15
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
16
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
17
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
18
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
19
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

पावसाच्या दडीचा वृक्षारोपणाला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2017 01:00 IST

पंधरा दिवसांपासून पावसाची दडी : रोपे सुकली!

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात चार कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेत विविध शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. परिणामी, जिल्हा प्रशासनाने ८ लाख ५२ हजार वृक्ष लागवडीची उद्दिष्टपूर्ती करून भरीव कार्य केले; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे या वृक्षारोपण मोहिमेला फटका बसण्याची शक्यता असून, अनेक ठिकाणी मोहिमेदरम्यान लावण्यात आलेली रोपे कोमजण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार तथा वस्रोद्योग विभाग, शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभाग, गृह विभाग, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक, महावितरण, अन्न औषध प्रशासनाचे दवाखाने, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कारागृह विभाग, परिवहन विभागाचे राज्य परिवहन विभाग व उप प्रादेशिक परिवहन विभाग, विधी न्याय विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे सिंचन विभाग व पाटबंधारे तसेच कौशल्य विकास विभाग, महसूल विभाग, बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, जिल्हा कोषागार कार्यालय, केंद्र सरकारचे बीएसएनएल व जिल्हा डाक कार्यालय, क्रीडा विभाग तसेच ग्राम विकास विभाग या प्रशासनाच्या मुख्य २६ यंत्रणा मोहिमेत सहभागी झाल्या. या २६ यंत्रणेच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टपूर्ती करीत ८ लाख ६८ हजार ९८२ म्हणजे १.२१ टक्के वृक्ष लागवड केली आहे.मागिल १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी झालेल्या पिकांसह वृक्षारोपण मोहिमेला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सरासरी १९८.९ मि.मी. पाऊसजिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत २५८५.८ मि.मी. म्हणजे सरासरी १९८.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात मागिल १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता चिंतेत आहे. पावसाच्या दडीचा फटका शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेला बसण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक तालुक्यात आतापर्यंत झालेला पाऊस अल्प आहे. त्यात बुलडाणा तालुक्यात २८९ मि.मी., चिखली २२४ मि.मी., देऊळगाव राजा १६५ मि.मी., लोणार २२१ मि.मी., मेहकर २७७ मि.मी., खामगाव १८२.४ मि.मी., शेगाव १२२ मि.मी., मलकापूर १२६ मि.मी., नांदुरा २४१ मि.मी., मोताळा २१३ मि.मी., संग्रामपूर ९८ मि.मी., जळगाव जामोद २०८ मि.मी., असा एकूण २५८५.८ म्हणजे सरसरी १९८. ९ मि.मी., पाऊस झाला आहे.रोपांसाठी नियमित १० मि.मी. पावसाची गरज वृक्षारोपण करताना प्लास्टिकच्या पिशवीतून रोप मातीच्या गोळ्यासह बाहेर काढण्यात येते. त्यामुळे वृक्षारोपण करताना मातीच्या गोळयाचा ओलावा असतो. हा ओलावा दोन दिवस टिकत असते. त्यानंतर रोपांसाठी नियमित दोन दिवसाआड १० मि.मी. पाण्याची गरज असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पाणी देऊ शकत नसल्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. जिल्ह्यात १ ते ७ जुलै दरम्यान वृक्षारोपण करण्यात आले; मात्र मागिल १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वृक्षारोपण मोहिमेतील वृक्ष रोपे कोमजण्याच्या मार्गावर आहेत. यावर्षी वृक्षारोपण मोहिमेला सर्वांनी सहकार्य केल्यामुळे उद्दिष्टपूर्वी झाली आहे; मात्र पाऊस नसल्यामुळे रोपावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. मोहिमेदरम्यान मातीच्या ओल्या गोळ्यासह जमिनीत वृक्षारोपण करण्यात येते. या मातीच्या गोळ्याची ओल दोन दिवस टिकते; मात्र जास्त दिवस पाणी न मिळाल्यास रोपावर परिणाम होऊ शकतो.- जी. ए. झोळे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी, बुलडाणा.