शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

हा तर सत्ताधा-यांच्या विरोधातील वंचितांचा आक्रोश- मुकुल वासनिक

By admin | Updated: August 30, 2016 01:33 IST

काँग्रेसच्या आक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

चिखली(जि. बुलडाणा), दि. २९: भाजपा सरकार हे गोरगरिबांना आधार देण्याऐवजी अडचणीत टाकण्याचे काम करीत असून, सत्तेत येण्यापूर्वी आश्‍वासनांची खैरात भाजपाने घोषित केली होती; परंतु या आश्‍वासनांची पूर्तता करणे तर दूरच उलटपक्षी काँग्रेस सरकारने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या अनेक जनहिताच्या योजनाच वेगळय़ा पद्धतीने राबवून एकप्रकारे बंदच करण्याचा सपाटा सुरू केला आहे. गोरगरिबांच्या योजना बंद करण्याचे भाजपाचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप करीत गोरगरीब जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या सरकारच्या विरोधात विचारांचा संघर्ष असाच चालू ठेवणार असल्याचे प्रतिपादन अ.भा.काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी चिखली येथे भाजपा सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांनी पुकारलेल्या आक्रोश मोर्चाला संबोधित करताना केले.चिखली येथील आक्रोश मोर्चाला विजय खडसे, नानाभाऊ गावंडे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, बाबूराव पाटील, जि.प.अध्यक्ष अलका खंडारे, श्याम उमाळकर, संजय राठोड, विजय आंभोरे, लक्ष्मण घुमरे, प्रदीप नागरे, मीनल आंबेकर, जयश्री शेळके, अंकुश वाघ, गणेश बस्सी, प्रा.नरेंद्र खेडेकर, बलदेव चोपडे, प्रकाश पाटील, मुक्त्यारसिंग राजपूत, नंदकिशोर बोरे, डॉ. सत्येंद्र भुसारी, दीपक रिंढे, अशोक पडघान, महेंद्र बोर्डे, प्रदीप पचेरवाल यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मोर्चाला संबोधित करताना मुकुल वासनिक म्हणाले की, भाजपावाले आम्हाला म्हणतात की, तुम्ही सरकारमध्ये असताना काय केले? आमच्या सरकारने या देशातील शेतकर्‍यांचे तब्बल ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, तर उलटपक्षी सध्याचे सरकार शेतकर्‍यांच्या जिवावर उठले असून, गरिबांच्या योजनांचा लाभ श्रीमताना देण्याचा कुटील डाव आखण्यास सुरुवात केली आहे. सोबतच सामाजिक व आर्थिक निकषावर आधारित असलेल्या जनगणनेचा गैरवापर या सरकारने चालविला असल्याचे स्पष्ट करून कॉंग्रेस कमिटीच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करून विविध आरोपांच्या फैरी झाडीत मोदी सरकारचा धिक्कार केला. जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजप सरकार अच्छे दिन आणणार असल्याचे सांगत होते; परंतु हे तर लुच्चे दिन आल्याचे दिसत आहे.. सरकारला या मोर्चाची दखल घेऊन या एसईसीसी याद्यांमध्ये बदल करण्यास भाग पाडू व यानंतरही सरकारने जनतेविरोधी निर्णय घेतला तर जिल्हा कॉंग्रेस कमिटी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारादेखील जिल्हाध्यक्ष आ.बोंद्रे यांनी यावेळी दिला. या सभेनंतर सरकारविरोधात घोषणा व नारे देत तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार विजय लोखंडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा यशस्वी करण्यासाठी चिखली कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.