शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

हा तर सत्ताधा-यांच्या विरोधातील वंचितांचा आक्रोश- मुकुल वासनिक

By admin | Updated: August 30, 2016 01:33 IST

काँग्रेसच्या आक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

चिखली(जि. बुलडाणा), दि. २९: भाजपा सरकार हे गोरगरिबांना आधार देण्याऐवजी अडचणीत टाकण्याचे काम करीत असून, सत्तेत येण्यापूर्वी आश्‍वासनांची खैरात भाजपाने घोषित केली होती; परंतु या आश्‍वासनांची पूर्तता करणे तर दूरच उलटपक्षी काँग्रेस सरकारने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या अनेक जनहिताच्या योजनाच वेगळय़ा पद्धतीने राबवून एकप्रकारे बंदच करण्याचा सपाटा सुरू केला आहे. गोरगरिबांच्या योजना बंद करण्याचे भाजपाचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप करीत गोरगरीब जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या सरकारच्या विरोधात विचारांचा संघर्ष असाच चालू ठेवणार असल्याचे प्रतिपादन अ.भा.काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी चिखली येथे भाजपा सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांनी पुकारलेल्या आक्रोश मोर्चाला संबोधित करताना केले.चिखली येथील आक्रोश मोर्चाला विजय खडसे, नानाभाऊ गावंडे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, बाबूराव पाटील, जि.प.अध्यक्ष अलका खंडारे, श्याम उमाळकर, संजय राठोड, विजय आंभोरे, लक्ष्मण घुमरे, प्रदीप नागरे, मीनल आंबेकर, जयश्री शेळके, अंकुश वाघ, गणेश बस्सी, प्रा.नरेंद्र खेडेकर, बलदेव चोपडे, प्रकाश पाटील, मुक्त्यारसिंग राजपूत, नंदकिशोर बोरे, डॉ. सत्येंद्र भुसारी, दीपक रिंढे, अशोक पडघान, महेंद्र बोर्डे, प्रदीप पचेरवाल यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मोर्चाला संबोधित करताना मुकुल वासनिक म्हणाले की, भाजपावाले आम्हाला म्हणतात की, तुम्ही सरकारमध्ये असताना काय केले? आमच्या सरकारने या देशातील शेतकर्‍यांचे तब्बल ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, तर उलटपक्षी सध्याचे सरकार शेतकर्‍यांच्या जिवावर उठले असून, गरिबांच्या योजनांचा लाभ श्रीमताना देण्याचा कुटील डाव आखण्यास सुरुवात केली आहे. सोबतच सामाजिक व आर्थिक निकषावर आधारित असलेल्या जनगणनेचा गैरवापर या सरकारने चालविला असल्याचे स्पष्ट करून कॉंग्रेस कमिटीच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करून विविध आरोपांच्या फैरी झाडीत मोदी सरकारचा धिक्कार केला. जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजप सरकार अच्छे दिन आणणार असल्याचे सांगत होते; परंतु हे तर लुच्चे दिन आल्याचे दिसत आहे.. सरकारला या मोर्चाची दखल घेऊन या एसईसीसी याद्यांमध्ये बदल करण्यास भाग पाडू व यानंतरही सरकारने जनतेविरोधी निर्णय घेतला तर जिल्हा कॉंग्रेस कमिटी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारादेखील जिल्हाध्यक्ष आ.बोंद्रे यांनी यावेळी दिला. या सभेनंतर सरकारविरोधात घोषणा व नारे देत तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार विजय लोखंडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा यशस्वी करण्यासाठी चिखली कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.