शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

हा तर सत्ताधा-यांच्या विरोधातील वंचितांचा आक्रोश- मुकुल वासनिक

By admin | Updated: August 30, 2016 01:33 IST

काँग्रेसच्या आक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

चिखली(जि. बुलडाणा), दि. २९: भाजपा सरकार हे गोरगरिबांना आधार देण्याऐवजी अडचणीत टाकण्याचे काम करीत असून, सत्तेत येण्यापूर्वी आश्‍वासनांची खैरात भाजपाने घोषित केली होती; परंतु या आश्‍वासनांची पूर्तता करणे तर दूरच उलटपक्षी काँग्रेस सरकारने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या अनेक जनहिताच्या योजनाच वेगळय़ा पद्धतीने राबवून एकप्रकारे बंदच करण्याचा सपाटा सुरू केला आहे. गोरगरिबांच्या योजना बंद करण्याचे भाजपाचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप करीत गोरगरीब जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या सरकारच्या विरोधात विचारांचा संघर्ष असाच चालू ठेवणार असल्याचे प्रतिपादन अ.भा.काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी चिखली येथे भाजपा सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांनी पुकारलेल्या आक्रोश मोर्चाला संबोधित करताना केले.चिखली येथील आक्रोश मोर्चाला विजय खडसे, नानाभाऊ गावंडे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, बाबूराव पाटील, जि.प.अध्यक्ष अलका खंडारे, श्याम उमाळकर, संजय राठोड, विजय आंभोरे, लक्ष्मण घुमरे, प्रदीप नागरे, मीनल आंबेकर, जयश्री शेळके, अंकुश वाघ, गणेश बस्सी, प्रा.नरेंद्र खेडेकर, बलदेव चोपडे, प्रकाश पाटील, मुक्त्यारसिंग राजपूत, नंदकिशोर बोरे, डॉ. सत्येंद्र भुसारी, दीपक रिंढे, अशोक पडघान, महेंद्र बोर्डे, प्रदीप पचेरवाल यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मोर्चाला संबोधित करताना मुकुल वासनिक म्हणाले की, भाजपावाले आम्हाला म्हणतात की, तुम्ही सरकारमध्ये असताना काय केले? आमच्या सरकारने या देशातील शेतकर्‍यांचे तब्बल ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, तर उलटपक्षी सध्याचे सरकार शेतकर्‍यांच्या जिवावर उठले असून, गरिबांच्या योजनांचा लाभ श्रीमताना देण्याचा कुटील डाव आखण्यास सुरुवात केली आहे. सोबतच सामाजिक व आर्थिक निकषावर आधारित असलेल्या जनगणनेचा गैरवापर या सरकारने चालविला असल्याचे स्पष्ट करून कॉंग्रेस कमिटीच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करून विविध आरोपांच्या फैरी झाडीत मोदी सरकारचा धिक्कार केला. जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजप सरकार अच्छे दिन आणणार असल्याचे सांगत होते; परंतु हे तर लुच्चे दिन आल्याचे दिसत आहे.. सरकारला या मोर्चाची दखल घेऊन या एसईसीसी याद्यांमध्ये बदल करण्यास भाग पाडू व यानंतरही सरकारने जनतेविरोधी निर्णय घेतला तर जिल्हा कॉंग्रेस कमिटी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारादेखील जिल्हाध्यक्ष आ.बोंद्रे यांनी यावेळी दिला. या सभेनंतर सरकारविरोधात घोषणा व नारे देत तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार विजय लोखंडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा यशस्वी करण्यासाठी चिखली कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.