शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

रब्बी हंगामाचे नियोजन अडीच लाख हेक्टर; पेरा मात्र २७६२ क्षेत्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:09 IST

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असल्याचे चित्र आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कृषी विभागाच्यावतीने अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिन ओली असल्याने पेरणीला विलंब झाला. यामुळे अनेक ठिकाणच्या पेरण्या अद्यापही खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असल्याचे चित्र आहे.यावर्षी कृषी विभागाने सुरूवातीला १ लाख ५७ हजार ७३ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे नियोजन केले होते. मात्र परतीच्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर गेल्याने कृषी विभागाला सुधारीत नियोजन करावे लागले होते. त्यानुसार रब्बीचे प्रस्तावित क्षेत्र २ लाख ४२ हजार ८१६ हेक्टरवर पोहचले होते. दमदार पावसामुळे जमिनीमध्ये चांगला ओलावा असल्याने सिंचनाची व्यवस्था नसलेले शेतकरी देखील रब्बी पिकांची लागवड करणार असल्याची शक्यता असल्याने हे वाढीव नियोजन करण्यात आले होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुधारीत नियोजनानुसार रब्बीचे क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. आता नोव्हेंबर महिना संपायला आला असताना जिल्ह्यात केवळ २ हजार ७३२ हेक्टरवर प्रत्यक्षात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार संग्रामपूर व सिंदखेडराजा तालुक्यात पेरणीला सुरुवात झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात ५० हेक्टर गहू तर ५७ हेक्टर हरभरा आणि सिंदखेडराजा तालुक्यात २ हजार ६४७ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची लागवड करण्यात आली आहे.परतीच्या पावसामुळे जवळपास महिनाभर मुक्काम ठोकल्यामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर गेली. आॅक्टोबरसह नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू होता. रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीस विलंब झाल्यास उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता असते.यामुळे आधीच खरीप हंगाम हातचा गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके घेणे टाळले असल्याचे दिसून येत आहे.अद्यापही पेरणी अत्यल्पयावर्षी पावसाळा चांगला झाल्याने जलस्त्रोतांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकुण ९१ प्रकल्प आहेत. यापैकी ३ मोठे, ७ मध्यम तर ८१ लघु प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्प पूर्णपणे भरलेले आहेत. जिल्ह्यात सध्या ९८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. यामुळे यावर्षी सिंचनासाठी भरपुर पाणी उपलब्ध आहे. याचा फायदा खरीप हंगामातील पिकांना होणार असल्याचे सुखद चित्र दिसत आहे. मात्र ऐन रब्बी पेरणीच्या वेळेवरच सतत पाऊस सुरू राहिला. यामुळे पेरणीला विलंब झाल्याने आतापर्यंत अपेक्षित पेरणी झाली नाही. असे असले तरी अजुन १५ डिसेंबरपर्यंत पेरणीसाठी अवधी असल्याने यामध्ये वाढ होऊ शकते.चारा पिकांसाठी पोषक वातावरणयावर्षी जमिनीमध्ये भरपूर ओलावा असूनदेखील रब्बी हंगामाच्या क्षेत्रात सध्यातरी घट झाल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती चारा पिकांसाठी मात्र लाभदायी आहे. विलंबाने पेरणी झाल्यास इतर पिकांप्रमाणे चारा पिकांवर याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सध्या उद्भवला आहे. भविष्यात आणखी चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यावर्षी जमिनीमध्ये असलेला ओलावा व पुरेसी सिंचनाची व्यवस्था यामुळे काही प्रमाणात का होईना, पण पशुपालकांना दिलासा मिळणार आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती