शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

रब्बी हंगामाचे नियोजन अडीच लाख हेक्टर; पेरा मात्र २७६२ क्षेत्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:09 IST

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असल्याचे चित्र आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कृषी विभागाच्यावतीने अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिन ओली असल्याने पेरणीला विलंब झाला. यामुळे अनेक ठिकाणच्या पेरण्या अद्यापही खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असल्याचे चित्र आहे.यावर्षी कृषी विभागाने सुरूवातीला १ लाख ५७ हजार ७३ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे नियोजन केले होते. मात्र परतीच्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर गेल्याने कृषी विभागाला सुधारीत नियोजन करावे लागले होते. त्यानुसार रब्बीचे प्रस्तावित क्षेत्र २ लाख ४२ हजार ८१६ हेक्टरवर पोहचले होते. दमदार पावसामुळे जमिनीमध्ये चांगला ओलावा असल्याने सिंचनाची व्यवस्था नसलेले शेतकरी देखील रब्बी पिकांची लागवड करणार असल्याची शक्यता असल्याने हे वाढीव नियोजन करण्यात आले होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुधारीत नियोजनानुसार रब्बीचे क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. आता नोव्हेंबर महिना संपायला आला असताना जिल्ह्यात केवळ २ हजार ७३२ हेक्टरवर प्रत्यक्षात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार संग्रामपूर व सिंदखेडराजा तालुक्यात पेरणीला सुरुवात झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात ५० हेक्टर गहू तर ५७ हेक्टर हरभरा आणि सिंदखेडराजा तालुक्यात २ हजार ६४७ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची लागवड करण्यात आली आहे.परतीच्या पावसामुळे जवळपास महिनाभर मुक्काम ठोकल्यामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर गेली. आॅक्टोबरसह नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू होता. रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीस विलंब झाल्यास उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता असते.यामुळे आधीच खरीप हंगाम हातचा गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके घेणे टाळले असल्याचे दिसून येत आहे.अद्यापही पेरणी अत्यल्पयावर्षी पावसाळा चांगला झाल्याने जलस्त्रोतांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकुण ९१ प्रकल्प आहेत. यापैकी ३ मोठे, ७ मध्यम तर ८१ लघु प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्प पूर्णपणे भरलेले आहेत. जिल्ह्यात सध्या ९८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. यामुळे यावर्षी सिंचनासाठी भरपुर पाणी उपलब्ध आहे. याचा फायदा खरीप हंगामातील पिकांना होणार असल्याचे सुखद चित्र दिसत आहे. मात्र ऐन रब्बी पेरणीच्या वेळेवरच सतत पाऊस सुरू राहिला. यामुळे पेरणीला विलंब झाल्याने आतापर्यंत अपेक्षित पेरणी झाली नाही. असे असले तरी अजुन १५ डिसेंबरपर्यंत पेरणीसाठी अवधी असल्याने यामध्ये वाढ होऊ शकते.चारा पिकांसाठी पोषक वातावरणयावर्षी जमिनीमध्ये भरपूर ओलावा असूनदेखील रब्बी हंगामाच्या क्षेत्रात सध्यातरी घट झाल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती चारा पिकांसाठी मात्र लाभदायी आहे. विलंबाने पेरणी झाल्यास इतर पिकांप्रमाणे चारा पिकांवर याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सध्या उद्भवला आहे. भविष्यात आणखी चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यावर्षी जमिनीमध्ये असलेला ओलावा व पुरेसी सिंचनाची व्यवस्था यामुळे काही प्रमाणात का होईना, पण पशुपालकांना दिलासा मिळणार आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती