शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसामुळे रब्बीचा हंगाम प्रभावित; पेरणी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 14:18 IST

परतीच्या पावसामुळे खरीपाचा हंगाम हातून जाण्यासोबतच रब्बीचा हंगामही चांगलाच लांबला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गतवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच रब्बीच्या पिकांनी शेतशिवार फुलल्याचे चित्र सगळीकडे होते. यावर्षी मात्र खामगावसह परिसरात काही अपवाद सोडल्यास बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात अद्यापही पेरणी झालेली नाही. परतीच्या पावसामुळे खरीपाचा हंगाम हातून जाण्यासोबतच रब्बीचा हंगामही चांगलाच लांबला आहे. याचा परिणाम उत्पादनावरही होण्याची शकयता आहे.खरीपाचा हंगाम संपल्यानंतर शेतकरी रब्बीची पेरणी करतात. हरभरा, गहू, कांदा उत्पादक शेतकरीशेती मशागतीची कामे करून नियोजन करतात. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सुरुवातीपासूनच जमिनीत ओल कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मशागत करता आली नसल्याचे दिसून येते. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरी साधारपणे सोयाबीनची काढणी झाल्यानंतर हरभरा, गहू, कांदा पिकाचे नियोजन करतात. परंतु यावर्षी गत महिन्यापासून सतत पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान तर झालेच शिवाय सोयाबीन काढणीही लांबली. गत तीन ते चार दिवसांपासून पाऊस थांबला आहे. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर जे काही पिक शिल्लक आहे, अशा पिकांची काढणी शेतकरी करताना दिसून येत आहेत. दरवर्षी साधारणपणे आॅक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ज्वारी, मका तसेच सोयाबीनची पिके घरात आलेली असतात. कपाशी तेवढीच शेतात शिल्लक राहते. परंतु यावर्षी अर्धा नोव्हेंबर महिना संपत आला तरी खरीपाची संपुर्ण पिके घरात आलेली नाहीत. ज्वारी, सोयाबीनची काढणी आता करण्यात येत आहे. साहाजिकच त्यामुळे खरीपाची काढणी लांबली. परिणामी रब्बीचे पिक घेण्यासाठी शेतात मशागत होऊ शकलेली नाही. उत्पादनाचा विचार केल्यास रब्बी हंगामातील हरभरा उत्पादनात सध्याच्या अंदाजानुसार ५ ते १० टक्के घट येण्याची शक्यता असली, तरी सध्या थंडी पाहिजे तशी पडत नसून यावर्षी थंडीचा मोसमही लांबण्याची शकयता असल्याने उत्पादन वाढूही शकते, असे कृषी तज्ञांचे म्हणने आहे. गतवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खामगावसह नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यात हरभºयाचे शिवार फुलले होते. परंतु यावर्षी तसे चित्र पाहायला मिळत नाही.

कांद्याचे रोप लांबणीवर!दरवर्षी साधारपणे मुग, उडीद निघाल्यानंतर शेतकरी कांद्याचे रोप टाकतात. परंतु यावर्षी पाऊसच एवढा पडला, की उडीदाची काढणी करणे फारच अल्प शेतकºयांना शक्य झाले. अनेकांचे पिक शेतातच सडले. पावसामुळे जमिन सतत ओली असल्याने मशागत होऊ शकली नाही. त्यामुळे कांद्याचे रोप तयार करण्याचे नियोजन लांबणीवर पडल्याचे दिसून येते.

गव्हाला फारसा फरक नाही!यावर्षी रब्बीचा हंगाम लांबला असला, तरी गव्हाला याचा फारसा फरक पडणार नसल्याचे कृषी तज्ञ सांगत आहेत. गव्हाच्या पेरणीला अद्याप उशीर असल्याने गव्हाच्या उत्पादनावर सध्याच्या वातावरणाचा तरी काही फरक पडणार नसल्याचे दिसून येते. एकंदीरत सध्याची परिस्थिती केवळ हरभºयाच्याच उत्पादनावर परिणाम करणारी असल्याचे दिसून येते.यावर्षी हरभºयाची पेरणी लांबली आहे. साधारणपणे १५ ते २० दिवसांनी यावर्षी उशीर झाला आहे. परंतु गहू व कांदा पिकाला याचा फारसा फरक पडणार नाही. सध्या थंडीचा मोसम नसला, तरी येणाºया काळात थंडीचा कालावधी वाढला, तर हरभºयाचेही उत्पादन समाधानकारक होऊ शकते.-डॉ. अनिल गाभणेकृषी तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद.

गतवर्षी आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात हरभºयाची पेरणी केली होती. यावर्षी अति पावसामुळे जमिन ओली असल्याने अजुनही मशागत करता आलेली नाही. आणखी किमान आठ दिवस तरी हरभºयाची पेरणी होण्याची शक्यता नाही.-सुधाकर सोनेकार, शेतकरी

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी