शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

विजेच्या लपंडावामुळे रब्बी हंगाम धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी प्रतिकूल हवामानाचा शेतीपिकांवर परिणाम होऊन शेतकरी संकटात सापडत आहे. गेल्यावर्षी उन्हाळ्यात पाणीपातळी घटल्याने ...

कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी प्रतिकूल हवामानाचा शेतीपिकांवर परिणाम होऊन शेतकरी संकटात सापडत आहे. गेल्यावर्षी उन्हाळ्यात पाणीपातळी घटल्याने पिके जळून गेली होती. त्यानंतर गेल्या खरीप हंगामात पिके काढणीस आली असतानाच झालेल्या अतिवृष्टीने ती वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यानंतर रब्बी हंगाम उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. रब्बी पिकांची कशीबशी लागवड केली. मात्र ढगाळ हवामानामुळे कीटकनाशकांची फवारणी करीत कशीबशी पिके जगविण्याचा अटापिटा सध्या सुरू आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. मोठ्या प्रयत्नाने वातावरणावर मात करीत शेतकरी पिके टिकविण्याचा प्रयत्न करीत असले तरी महावितरणच्या लहरी वीजपुरवठ्यामुळे पिकांची धूळधाण होऊ पाहत आहे.

वेळोवेळी वीज खंडित होत असल्याने पिकांचे भरणे होत नाही. त्यामुळे यंदा मुबलक पाणी उपलब्ध असूनही विजेच्या लहरीपणाचा फटका शेतपिकांना बसत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणी हाेत आहे.