शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीच्या आशा पल्लवीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:39 IST

सातत्याने अवर्षणसदृश स्थितीचा सामना करणार्‍या  बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने  जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी गाठली आहे. जिल्ह्यातील  १३ तालुक्यांपैकी सात तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी  ओलांडली असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या  असून, जमिनीतील ओलावा गहू पिकासाठी पोषक ठरत आहे. 

ठळक मुद्देजमिनीतील ओलावा गव्हाला ठरतोय पोषक अर्ध्या जिल्ह्यात पावसाने पार केली सरासरी

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सातत्याने अवर्षणसदृश स्थितीचा सामना करणार्‍या  बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने  जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी गाठली आहे. जिल्ह्यातील  १३ तालुक्यांपैकी सात तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी  ओलांडली असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या  असून, जमिनीतील ओलावा गहू पिकासाठी पोषक ठरत आहे. जिल्ह्यात सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात असून, खरीप  हंगामानंतर आता शेतकरी रब्बीच्या तयारीला लागला आहे.  जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र ९२ हजार ८५१ आहे.  खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसावरच खरिपाची  िपके तग धरून होती. मध्यंतरी पावसाने पाठ फिरवल्याने  जलसाठय़ांनीसुद्धा तळ गाठला होता; परंतु परतीच्या पावसाने  जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी भरून काढली आहे.   जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामाला संजीवनी मिळाली  आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १00.६७ टक्के पाऊस झाला  आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी बुलडाणा, चिखली,  देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मलकापूर, मोताळा आणि  जळगाव जामोद या सात तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी  ओलांडली आहे. बुलडाणा तालुक्यात १३१.८0 टक्के,  चिखली १0२.४९ टक्के, देऊळगाव राजा १0७.२६, सिंदखेड  राजा १0३.७५ टक्के, लोणार ८९.५२ टक्के, मेहकर ९३.२१  टक्के, खामगाव ९५.३१ टक्के, शेगाव ७३.१६ टक्के, मलका पूर ११0.११ टक्के, नांदुरा ९६.५५ टक्के, मोताळा १0१.३७  टक्के, संग्रामपूर ८५.९४ टक्के, जळगाव जामोद ११६.२५ ट क्के पर्जन्यमान झालेले आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांत  पावसाने सरासरी ओलांडली असल्याने जलस्रोतामध्ये चांगला  जलसाठा आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये रब्बी हंगामाची पिके  घेण्यासाठी शेतकरी जोमाने तयारी करत आहे.  

जिल्ह्यात ९२ हजार ८५१ हेक्टर रब्बीचे क्षेत्रजिल्ह्यात रब्बी हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र ९२ हजार ८५१ हे क्टर आहे. त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्याचे ४ हजार ८३२,  संग्रामपूर ४ हजार २३८, चिखली तालुक्यात २५ हजार ९१,  बुलडाणा १७ हजार ५२१, देऊळगाव राजा १२ हजार १७७,  मेहकर २४ हजार २१, सिंदखेड राजा १0२४३, लोणार १४  हजार ६0८, खामगाव ८ हजार ७४६, शेगाव ४ हजार ३0३,  मलकापूर तालुक्यात २ हजार २५८, मोताळा ३ हजार ७७१,  नांदुरा २ हजार ५८४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. 

रब्बी पेरणीला सुरुवात जिल्ह्यात सोयाबीन काढणीच्या हंगामानंतर आता रब्बी  हंगामाच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करण्याचे काम जोमात  सुरू आहे. रब्बी पेरणीपूर्वी शेत वखरण्याचे काम सध्या जोमात  सुरू आहे, तर काही ठिकाणी रब्बी पेरणीला सुरूवातही झाली  आहे. 

टॅग्स :agricultureशेती