शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सात गावांचा पाणी प्रश्न मिटला!

By admin | Updated: October 3, 2016 02:49 IST

मोताळा तालुक्यातील पलढग प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असून सिंचन तथा पेयजलाचा प्रश्न मिटला आहे.

मोताळा(जि. बुलडाणा), दि. २- पावसाळय़ाचे चार महिने संपून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असतानाच तालुक्यातील प्रकल्पांमध्ये जल साठवण होईल की नाही, अशी शंका असताना पावसाने संपूर्ण तालुक्यात हजेरी लावल्याने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पलढग प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. शनिवारी १ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेपासून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागायला सुरुवात झाली आहे. वरचेवर येणारा पाण्याचा ओघ पाहता धरणाच्या कॅनॉलचे गेट दोन इंच उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग नळगंगा धरणात सोडण्यात येत आहे.जून ते ऑगस्टदरम्यान तालुकाभरात कमी-अधिक प्रमाणात पावसाने चांगली हजेरी लावली होती; मात्र तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्याने दरवर्षी ऑगस्ट महिन्यात तुडुंब भरणारा पलढग लघू प्रकल्प यावर्षी भरेल की नाही, अशी शंका होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने पलढग प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे. दरवर्षी जुलै ते ऑगस्टच्या प्रारंभी हा तलाव भरून वाहत असतो; मात्र मागील चार महिन्यांपासून तालुक्यात पावसाचा ल पंडाव सुरू आहे. त्यामुळे नळगंगासह पलढग प्रकल्पात पाणी साठय़ाचे प्रमाण वाढत नव्हते; मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तलाव परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे पलढग प्रकल्पाचा पाणीसाठा शनिवारी सकाळपर्यंत ४00.१0 मीटरपर्यंत पोहोचला होता. शनिवारी दुपारपर्यंत पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे पाणीसाठा ४0३.१0 मीटरपर्यंत गेला व तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले. या प्रकल्पाची क्षमता ४0३.२0 मीटरची असून, संध्याकाळपर्यंत येणार्‍या काळात पाणी पातळीत वाढ होणार असल्यामुळे नदीकाठावर राहत असलेल्या नागरिकांना पाटबंधारे विभागाच्यावतीने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. *नळगंगा धरणात २९ टक्के जलसाठामागील आठवडाभरापासून तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नळगंगा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, धरण २९ टक्के भरले आहे. आठवडापूर्वी धरणात २४ टक्के पाणी होते. नळगंगा धरणाची पूर्ण क्षमता ६६ फु टांची आहे. सध्या धरणामध्ये २0 दलघमी पाणी साठा आहे. तालुकाभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सं ततधार पावसामुळे पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यात ६४९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. असे असले तरी पावसाने सरासरी ओलांडली नाही.