शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

सात गावांचा पाणी प्रश्न मिटला!

By admin | Updated: October 3, 2016 02:49 IST

मोताळा तालुक्यातील पलढग प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असून सिंचन तथा पेयजलाचा प्रश्न मिटला आहे.

मोताळा(जि. बुलडाणा), दि. २- पावसाळय़ाचे चार महिने संपून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असतानाच तालुक्यातील प्रकल्पांमध्ये जल साठवण होईल की नाही, अशी शंका असताना पावसाने संपूर्ण तालुक्यात हजेरी लावल्याने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पलढग प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. शनिवारी १ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेपासून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागायला सुरुवात झाली आहे. वरचेवर येणारा पाण्याचा ओघ पाहता धरणाच्या कॅनॉलचे गेट दोन इंच उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग नळगंगा धरणात सोडण्यात येत आहे.जून ते ऑगस्टदरम्यान तालुकाभरात कमी-अधिक प्रमाणात पावसाने चांगली हजेरी लावली होती; मात्र तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्याने दरवर्षी ऑगस्ट महिन्यात तुडुंब भरणारा पलढग लघू प्रकल्प यावर्षी भरेल की नाही, अशी शंका होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने पलढग प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे. दरवर्षी जुलै ते ऑगस्टच्या प्रारंभी हा तलाव भरून वाहत असतो; मात्र मागील चार महिन्यांपासून तालुक्यात पावसाचा ल पंडाव सुरू आहे. त्यामुळे नळगंगासह पलढग प्रकल्पात पाणी साठय़ाचे प्रमाण वाढत नव्हते; मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तलाव परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे पलढग प्रकल्पाचा पाणीसाठा शनिवारी सकाळपर्यंत ४00.१0 मीटरपर्यंत पोहोचला होता. शनिवारी दुपारपर्यंत पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे पाणीसाठा ४0३.१0 मीटरपर्यंत गेला व तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले. या प्रकल्पाची क्षमता ४0३.२0 मीटरची असून, संध्याकाळपर्यंत येणार्‍या काळात पाणी पातळीत वाढ होणार असल्यामुळे नदीकाठावर राहत असलेल्या नागरिकांना पाटबंधारे विभागाच्यावतीने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. *नळगंगा धरणात २९ टक्के जलसाठामागील आठवडाभरापासून तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नळगंगा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, धरण २९ टक्के भरले आहे. आठवडापूर्वी धरणात २४ टक्के पाणी होते. नळगंगा धरणाची पूर्ण क्षमता ६६ फु टांची आहे. सध्या धरणामध्ये २0 दलघमी पाणी साठा आहे. तालुकाभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सं ततधार पावसामुळे पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यात ६४९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. असे असले तरी पावसाने सरासरी ओलांडली नाही.