शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

व्यापारी संकुल बांधकामावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: May 17, 2017 00:41 IST

शासनाकडून पूर्व मान्यता न घेतल्याचा ठपका: मेहकर न.प.मुख्याधिकाऱ्यांना नगर विकास मंत्रालयाकडून पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: काँग्रेसच्या कारकिर्दीत नगर परिषदेने शहरात बांधा, वापरा व हस्तांतरीत करा, या तत्त्वाने बांधलेल्या भव्य अशा राजीव गांधी व्यापारी संकुलाचे काम शासनाची पूर्वमान्यता न घेता, तत्कालीन न. पा.अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केलेला सामंजस्य करार हा अधिकारबाह्य ठरत असल्याचा ठपका नगर विकास मंत्रालयाने ठेवत हा करार रद्द का करण्यात येऊ नये, याबाबत विचारणा करणारे पत्र मुख्याधिकारी मेहकर यांना पाठविल्याने खळबळ उडाली आहे.१६ मे २०१७ च्या नगर विकास विभागाच्या या निर्णय पत्रात म्हटले की मेहकर नगरपालिकेने बांधा, वापरा व हस्तांतरण करा, या तत्त्वावर दुकान संकुलाचे बांधकामास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक न.पा.संचालनालयाकडे पाठविला होता. सदर प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन असतानाच २०१४ मध्ये शासनाच्या मान्यतेशिवाय न.पा.ने निविदा प्रक्रिया पार पाडून २२ एप्रिल २०१३ रोजी कामाचा आदेश देण्यात आला. या दरम्यान न.पा.ने दुकान संकुल बांधून पट्टेदारास ३० वर्षाच्या करार तत्त्वावर दिला. वास्तविक न.पा.अधिनियमानुसार न.पा.ला जास्तीत जास्त तीन वर्षाच्या कालावधीसाठी आपली स्थावर मालमत्ता पट्ट्याने देता येते. पट्टेदारास अशा मालमत्तेवर कोणतेही कायम बांधकाम करता येत नाही. मेहकर न.पा.चा दुकान संकुलाचा प्रस्ताव ३० वर्षासाठी असून, शासनाची मान्यता न घेता कार्यादेश देण्याची कार्यवाही न.पा.ने केलेली आहे. सदर प्रस्तावात काही त्रुटीसुद्धा आढळून आल्या आहेत. त्यात विकासकामे गाळे धारकाकडून किती प्रीमियम घ्यावा, याचा उल्लेख नाही. भाडे निश्चित करताना मजलेनिहाय प्रति स्क्वे.फूट दर ठरविण्यात आला आहे, त्याचीही कारण मीमांसा दिसून आली नाही. कंत्राटदाराने ही दुकाने ३० वर्षांकरिता ठेवण्यासाठी दोन्ही स्थितीत न.प.चे भाडेकरी या नात्याने कंत्राटदारास परवाना देण्यात येईल.तथापि त्यास त्या जागेवर दुकानावर कोणताही मालकी हक्क प्रस्थापित करता येणार नाही. न.प.ने ठराव क्रमांक दोन २८ सप्टेंबर २०१२ अन्वये कार्यादेश देण्यापूर्वी शासनाची मान्यता घ्यावी, असा ठराव पारित केला असताना कार्यादेश देण्यापूर्वी शासनाची मान्यता घेतली नाही. त्यामुळेच नगर विकास विभागाने स्पष्टच निर्णय घेतला की, शासनाची पूर्व मान्यता न घेता विकासकासोबत नगर पालिका अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केलेला सामंजस्य करार अधिकार बाह्य ठरत असल्याने तो रद्द का करण्यात येऊ नये. याबाबत १५ दिवसात संबंधितांना अभिवेदन करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राजीव गांधी कॉम्प्लेक्स प्रकरण काय वळण घेते. याकडे मेहकरवासीयांचे लक्ष लागले आहे.