शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

समृद्धी महामार्गावरील वळणमार्गांचा प्रश्न ऐरणीवर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:35 IST

सध्या कोरोना संसर्ग काळात मोजक्या स्वरूपात वाहतूक होत असल्याने परिस्थिती गंभीर नाही. मात्र, येत्या काही दिवसांतच पावसाळ्याच्या तोंडावर, खते, ...

सध्या कोरोना संसर्ग काळात मोजक्या स्वरूपात वाहतूक होत असल्याने परिस्थिती गंभीर नाही. मात्र, येत्या काही दिवसांतच पावसाळ्याच्या तोंडावर, खते, बी बियाणे, आदींसाठी मार्ग शेतीसाठी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता होत आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे काम कोरोना संसर्गाच्या काळातही मोठ्या गतीने सुरू आहे. यंत्रसामग्रीसह शेकडो वाहने व माणसे त्यासाठी रात्रंदिवस राबत आहेत. समृद्धी मार्गामुळे राज्याच्या उपराजधानी व राजधानी दरम्यानची इतरही अनेक शहरे वाहतुकीने एकमेकांना जोडली जाणार आहेत.

याचवेळी महामार्ग कामामध्ये अडथळा ठरत असल्यामुळे तालुक्यातील अंतर्गत अनेक मार्ग खंडित झालेले आहेत. त्यामध्ये बीबी ते कुंबेफळ, देऊळगाव कोळ, कंडारी, भंडारी, महारचिकनाकडे जाणारा तसेच सावखेड तेजन ते जळगाव, पिंपळगाव, सिंदखेडराजा, सावरगाव माळ येथून तुळजापूरकडे जाणाऱ्या अशा अनेक छोटछोट्या अंतर्गत मार्गांचा समावेश आहे. त्या मार्गांना समृद्धी महामार्गासाठी तोडून, उंचसखल असे थातुरमातुर वळणमार्ग काढलेले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचंड धुळीने माखलेल्या ह्या मार्गांवर तुरळक वाहतूक होत आहे. या मार्गांना पर्यायी मार्ग उपलब्ध असले, तरी पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांना ह्याच मार्गांचा वापर केल्याशिवाय शेतात जाता येणार नाही. त्यामुळे या वळणमार्गांचे तातडीने व्यवस्थित बांधकाम करणे गरजेचे ठरत आहे.

वळणमार्ग पक्के करण्याची मागणी

समृद्धी मार्गामुळे खंडित झालेल्या व धुळीने माखलेले थातुरमातुर वळणमार्ग पक्क्या स्वरूपात तयार करून देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख शिवा ठाकरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी राजे जाधव यांनी केली आहे.

आंदोलनाची शक्यता

रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी दूरच्या अंतराचा पर्याय शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा नसल्याने ऐनवेळी एखादे आंदोलन होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. एक महिन्यापूर्वी म्हणजेच एप्रिलच्या मध्यंतरी तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. त्यातून या अंतर्गत मार्गावरील सर्वच वळणमार्ग चिखलमय झाले होते. तेव्हा सपाट नसलेल्या उंच-सखल अशा वळणमार्गांवर अचानक घसरगुंड्या निर्माण होतात. अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे दोन-तीन दिवस चांगलेच हाल झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे सभापती मीना बंगाळे यांनी सांगितले.