शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावरील वळणमार्गांचा प्रश्न ऐरणीवर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:35 IST

सध्या कोरोना संसर्ग काळात मोजक्या स्वरूपात वाहतूक होत असल्याने परिस्थिती गंभीर नाही. मात्र, येत्या काही दिवसांतच पावसाळ्याच्या तोंडावर, खते, ...

सध्या कोरोना संसर्ग काळात मोजक्या स्वरूपात वाहतूक होत असल्याने परिस्थिती गंभीर नाही. मात्र, येत्या काही दिवसांतच पावसाळ्याच्या तोंडावर, खते, बी बियाणे, आदींसाठी मार्ग शेतीसाठी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता होत आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे काम कोरोना संसर्गाच्या काळातही मोठ्या गतीने सुरू आहे. यंत्रसामग्रीसह शेकडो वाहने व माणसे त्यासाठी रात्रंदिवस राबत आहेत. समृद्धी मार्गामुळे राज्याच्या उपराजधानी व राजधानी दरम्यानची इतरही अनेक शहरे वाहतुकीने एकमेकांना जोडली जाणार आहेत.

याचवेळी महामार्ग कामामध्ये अडथळा ठरत असल्यामुळे तालुक्यातील अंतर्गत अनेक मार्ग खंडित झालेले आहेत. त्यामध्ये बीबी ते कुंबेफळ, देऊळगाव कोळ, कंडारी, भंडारी, महारचिकनाकडे जाणारा तसेच सावखेड तेजन ते जळगाव, पिंपळगाव, सिंदखेडराजा, सावरगाव माळ येथून तुळजापूरकडे जाणाऱ्या अशा अनेक छोटछोट्या अंतर्गत मार्गांचा समावेश आहे. त्या मार्गांना समृद्धी महामार्गासाठी तोडून, उंचसखल असे थातुरमातुर वळणमार्ग काढलेले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचंड धुळीने माखलेल्या ह्या मार्गांवर तुरळक वाहतूक होत आहे. या मार्गांना पर्यायी मार्ग उपलब्ध असले, तरी पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांना ह्याच मार्गांचा वापर केल्याशिवाय शेतात जाता येणार नाही. त्यामुळे या वळणमार्गांचे तातडीने व्यवस्थित बांधकाम करणे गरजेचे ठरत आहे.

वळणमार्ग पक्के करण्याची मागणी

समृद्धी मार्गामुळे खंडित झालेल्या व धुळीने माखलेले थातुरमातुर वळणमार्ग पक्क्या स्वरूपात तयार करून देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख शिवा ठाकरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी राजे जाधव यांनी केली आहे.

आंदोलनाची शक्यता

रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी दूरच्या अंतराचा पर्याय शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा नसल्याने ऐनवेळी एखादे आंदोलन होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. एक महिन्यापूर्वी म्हणजेच एप्रिलच्या मध्यंतरी तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. त्यातून या अंतर्गत मार्गावरील सर्वच वळणमार्ग चिखलमय झाले होते. तेव्हा सपाट नसलेल्या उंच-सखल अशा वळणमार्गांवर अचानक घसरगुंड्या निर्माण होतात. अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे दोन-तीन दिवस चांगलेच हाल झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे सभापती मीना बंगाळे यांनी सांगितले.