शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावरील वळणमार्गांचा प्रश्न ऐरणीवर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:35 IST

सध्या कोरोना संसर्ग काळात मोजक्या स्वरूपात वाहतूक होत असल्याने परिस्थिती गंभीर नाही. मात्र, येत्या काही दिवसांतच पावसाळ्याच्या तोंडावर, खते, ...

सध्या कोरोना संसर्ग काळात मोजक्या स्वरूपात वाहतूक होत असल्याने परिस्थिती गंभीर नाही. मात्र, येत्या काही दिवसांतच पावसाळ्याच्या तोंडावर, खते, बी बियाणे, आदींसाठी मार्ग शेतीसाठी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता होत आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे काम कोरोना संसर्गाच्या काळातही मोठ्या गतीने सुरू आहे. यंत्रसामग्रीसह शेकडो वाहने व माणसे त्यासाठी रात्रंदिवस राबत आहेत. समृद्धी मार्गामुळे राज्याच्या उपराजधानी व राजधानी दरम्यानची इतरही अनेक शहरे वाहतुकीने एकमेकांना जोडली जाणार आहेत.

याचवेळी महामार्ग कामामध्ये अडथळा ठरत असल्यामुळे तालुक्यातील अंतर्गत अनेक मार्ग खंडित झालेले आहेत. त्यामध्ये बीबी ते कुंबेफळ, देऊळगाव कोळ, कंडारी, भंडारी, महारचिकनाकडे जाणारा तसेच सावखेड तेजन ते जळगाव, पिंपळगाव, सिंदखेडराजा, सावरगाव माळ येथून तुळजापूरकडे जाणाऱ्या अशा अनेक छोटछोट्या अंतर्गत मार्गांचा समावेश आहे. त्या मार्गांना समृद्धी महामार्गासाठी तोडून, उंचसखल असे थातुरमातुर वळणमार्ग काढलेले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचंड धुळीने माखलेल्या ह्या मार्गांवर तुरळक वाहतूक होत आहे. या मार्गांना पर्यायी मार्ग उपलब्ध असले, तरी पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांना ह्याच मार्गांचा वापर केल्याशिवाय शेतात जाता येणार नाही. त्यामुळे या वळणमार्गांचे तातडीने व्यवस्थित बांधकाम करणे गरजेचे ठरत आहे.

वळणमार्ग पक्के करण्याची मागणी

समृद्धी मार्गामुळे खंडित झालेल्या व धुळीने माखलेले थातुरमातुर वळणमार्ग पक्क्या स्वरूपात तयार करून देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख शिवा ठाकरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी राजे जाधव यांनी केली आहे.

आंदोलनाची शक्यता

रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी दूरच्या अंतराचा पर्याय शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा नसल्याने ऐनवेळी एखादे आंदोलन होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. एक महिन्यापूर्वी म्हणजेच एप्रिलच्या मध्यंतरी तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. त्यातून या अंतर्गत मार्गावरील सर्वच वळणमार्ग चिखलमय झाले होते. तेव्हा सपाट नसलेल्या उंच-सखल अशा वळणमार्गांवर अचानक घसरगुंड्या निर्माण होतात. अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे दोन-तीन दिवस चांगलेच हाल झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे सभापती मीना बंगाळे यांनी सांगितले.