शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

सहा जिल्ह्यातील सुक्ष्म नियोजन आराखड्यांची गुणवत्ता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 12:46 IST

खामगाव: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांचा सुक्ष्म नियोजन आराखडा अर्थात मायक्रो प्लानिंग तयार करण्यासाठी विदर्भातील सहा जिल्ह्यात अप्रशिक्षित कर्मचाºयांकडून मायक्रोप्लॉनिंगचे काम केले जात आहे.

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्युज नेटवर्कखामगाव: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांचा सुक्ष्म नियोजन आराखडा अर्थात मायक्रो प्लानिंग तयार करण्यासाठी विदर्भातील सहा जिल्ह्यात अप्रशिक्षित कर्मचाºयांकडून मायक्रोप्लॉनिंगचे काम केले जात आहे. यामुळे योजनेच्या सुक्ष्म नियोजन आराखड्यांच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी विभागाचे या प्रक्रियेवर कुठलेही नियंत्रण नसल्याने अधिकाºयांनी हात वर केले आहेत. दुष्काळग्रस्तांना आधार मिळावा, तसेच पाणी व जमिनीची पोत सुधारण्यासोबतच लहान व मध्यम शेतकºयांचा विकास व्हावा, बदलत्या हवामानानुसार शेतकºयांना शेती करणे सोयीचे व्हावे या उद्देशाने शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कार्यान्वीत केली आहे. सध्या शासनाचे या योजनेकडे सर्वात जास्त लक्ष असून योजना पुर्णत्वास नेण्यासाठी शासनाने जागतिक बँकेकडून कर्ज देखिल घेतले आहे. एकूण तिन टप्प्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतील कामांना वेग देण्यासाठी ग्राम कृषी संजिवनी समित्यासुध्दा गठीत करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या गावांचा ‘सुक्ष्म नियोजन आराखडा’ ही या योजनेतील महत्वाची बाब आहे. यासाठी राज्यभरात ‘यशदा’कडून प्रशिक्षण घेतलेल्या ५० प्रविण प्रशिक्षकांची टीमही तयार आहे. सुक्ष्म नियोजन आराखड्याच्या आधारावरच या योजनेचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याने सदर आराखडा ‘यशदा’च्या प्रविण प्रशिक्षकांकडून तयार करणे अपेक्षित असताना, असे प्रशिक्षण न घेतलेल्या अंमळनेर येथील राष्ट्रविकास बहु.सामाजिक संस्थेला विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा व हिंगोली आदी जिल्ह्यातील निवड झालेल्या गावांचा सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे अशा संस्थेकडून तयार करण्यात येणाºया सुक्ष्म नियोजन आराखड्याची गुणवत्ता किती दर्जेदार असेल, याबाबत शंका उपस्थीत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे उपविभागीय कृषी अधिकाºयांना याबबात कुठलीही कल्पना नसल्याने योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

संस्था सदस्यांना द्यावे प्रशिक्षणनानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना राबविण्यासाठी शासनाकडे कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने संस्थांकडून कामे करून घेण्यात येत असावीत, अशीही चर्चा आहे. परंतु ज्या संस्थांना काम देण्यात येत आहे, अशा संस्थांकडून मायक्रोप्लॅनिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कर्मचाºयांना ‘यशदा’ कडून विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे. बुलडाणा जिल्ह्यात येथे झाले काम नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १०३ गावांची निवड करण्यात आली आहे. यापैकी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, खिरोडा, पलसोडा,  शेगाव तालुक्यातील भास्तनसह इतर काही गावांमध्ये सदर संस्थेने आराखडे तयार केल्याची माहिती आहे. 

 ज्या लोकांकडून सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याकडून शेतकºयांना योजनेबद्दल पाहिजे तसे समजावून सांगण्यात आले नाही. यामुळे सदर योजनेचा उद्देश कितपत यशस्वी होईल, याबाबत संशय आहे.

- राजु मिरगे पाटील (माजी पंचायत समिती सभापती, शेगाव) 

 जर त्या संस्थेची नेमणूक झाली आहे. तर त्या संस्थेकडे प्रशिक्षित मनुष्यबळ आहे. असेच समजावे लागेल. - पुरुषोत्तम अनगाईत, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव

 तालुक्यात सुरु असलेल्या कामांची कोणतीही माहिती नाही. सदर काम माझ्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. -  ढाकणे, तालुका कृषी अधिकारी शेगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव