शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपाला नगरपालिकेत जनतेने दिले ‘फस्र्ट क्लास’चे गुण- रावसाहेब दानवे

By admin | Updated: January 21, 2017 02:40 IST

चिखली येथे भाजपाचा आभार मेळावा.

चिखली , दि. २0- गेल्या दोन वर्षांत भाजपा सरकारने केलेल्या प्रगतीचे पुस्तक जनतेने तपासले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. ब्रिटिशकालीन आणेवारी काढण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणल्यामुळे शेतकर्‍याला आता नुकसान भरपाई देणे सुकर झाले आहे. काँग्रेसच्या नेत्यांना भुईमुगाला शेंगा खाली येतात की वर, याचीदेखील जाण नाही, अशी काँग्रेसवर टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी येथील मेळाव्याला संबोधित केले.नगरपालिका निवडणुकांमध्ये जिल्हय़ात भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल जनतेप्रती आभार व्यक्त करण्यासह, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपा मेळावा आणि जाहीर पक्षप्रवेश सोहळय़ाचे आयोजन चिखली नगर परिषदेच्यावतीने स्थानिक राजा टॉवरच्या प्रांगणात २0 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे होते, तर प्रमुख उपस्थितांमध्ये गृहराज्यमंत्री ना. रणजित पाटील, आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय कुटे, गोविंदराव केंद्रे, नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, उपाध्यक्ष वजीराबी शे.अनिस, अँड. विजय कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना खा. दानवे म्हणाले, की राज्य व केंद्र सरकार शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत असून, दोन वर्षांत ४२00 कोटी रुपयांचे अनुदान शेतीवर खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ना. देवेंद्र फडणवीस सरकार हे विदर्भाचा सर्वच क्षेत्रातील अनुशेष भरून काढण्यास कटिबद्ध असून, रस्ते व इतर पायाभूत सुविधांबरोबरच दरडोई उत्पन्नातील पश्‍चिम महाराष्ट्र व विदर्भात असलेली तफावत दूर करण्यासह पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन आवश्यक ते पावले उचलत असून, याचे परिणाम आगामी काळात दिसून येणार असल्याचे गृहराज्यमंत्री ना.डॉ. रणजित पाटील यावेळी त्यांनी सांगितले. प्रसंगी आ.चैनसुख संचेती, आ.संजय कुटे, डॉ. प्रतापसिंग राजपूत आदींची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक युवा नेते कुणाल बोंद्रे यांनी केले. संचालन मोहन शर्मा तर आभार तालुकाध्यक्ष सुनील पोफळे यांनी मानले. यावेळी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.