शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST

तालुक्यात झालेल्या ग्रामपंचयत निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, असा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. ग्रामपंचायतींत सरपंच ...

तालुक्यात झालेल्या ग्रामपंचयत निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, असा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. ग्रामपंचायतींत सरपंच आमचा होईल, असा दावाही विविध पक्षांकडून करण्यात येत आहे. १८ जानेवारी राेजी जाहीर झालेल्या निकालात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे.

मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे ३९ ग्रामपंचायतींकरिता १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. या ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी मेहकर येथील तहसील कार्यालय येथे जाहीर करण्यात आला. यावेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मेहकर तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींकरिता ७४९ उमेदवार ३१३ जागेसाठी उभे होते. याकरिता १४२ मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. सोमवारी १४ टेबलवर १४ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल घोषित केला. या निवडणुकीमध्ये मेहकर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या ३९ हजार २७२ पुरुष, तर ३५ हजार ७०२ महिला मतदारांनी मतदान केले. यामध्ये सोमवारी निकाल जाहीर करताच काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवीन उमेदवारांना जनतेने ग्रामपंचायतीमध्ये संधी दिली. यापैकी हिवरा आश्रम येथील भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर यांच्याविरोधात शिवसेनेचे नेते विठ्ठल भाकडे, मनोहर गिर्हे यांनी पॅनल टाकून शिवसेनेने अकरा जागांपैकी सात जागांवर दणदणीत विजय मिळवित ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम केले, तर भाजपाचे संजय वडतकर यांना चार जागेवर समाधान मानावे लागले. देऊळगाव माळी येथील मोठी असलेली ग्रामपंचायत येथे किशोर गाभणे यांनी दणदणीत विजय मिळवीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. लोणी गवळी येथे माजी सभापती सागर पाटील व केशवराव जागृत यांना समसमान विजय मिळाला असून लोणी गवळी ग्रामपंचायतीची धुरा ही आता अपक्ष व्यक्तीवर अवलंबून आहे. या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत नवीन उमेदवारांना संधी दिल्याने नवीन उमेदवारांना सुवर्णकाळ आला आहे.

विजयावर सर्वांचाच दावा

मेहकर तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणीत पॅनलने वर्चस्व मिळवल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याने त्या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीचाही बोलबाला असल्याचे त्यांच्या प्रक्वताकडून बोलले जात आहे.