शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST

तालुक्यात झालेल्या ग्रामपंचयत निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, असा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. ग्रामपंचायतींत सरपंच ...

तालुक्यात झालेल्या ग्रामपंचयत निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, असा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. ग्रामपंचायतींत सरपंच आमचा होईल, असा दावाही विविध पक्षांकडून करण्यात येत आहे. १८ जानेवारी राेजी जाहीर झालेल्या निकालात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे.

मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे ३९ ग्रामपंचायतींकरिता १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. या ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी मेहकर येथील तहसील कार्यालय येथे जाहीर करण्यात आला. यावेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मेहकर तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींकरिता ७४९ उमेदवार ३१३ जागेसाठी उभे होते. याकरिता १४२ मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. सोमवारी १४ टेबलवर १४ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल घोषित केला. या निवडणुकीमध्ये मेहकर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या ३९ हजार २७२ पुरुष, तर ३५ हजार ७०२ महिला मतदारांनी मतदान केले. यामध्ये सोमवारी निकाल जाहीर करताच काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवीन उमेदवारांना जनतेने ग्रामपंचायतीमध्ये संधी दिली. यापैकी हिवरा आश्रम येथील भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर यांच्याविरोधात शिवसेनेचे नेते विठ्ठल भाकडे, मनोहर गिर्हे यांनी पॅनल टाकून शिवसेनेने अकरा जागांपैकी सात जागांवर दणदणीत विजय मिळवित ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम केले, तर भाजपाचे संजय वडतकर यांना चार जागेवर समाधान मानावे लागले. देऊळगाव माळी येथील मोठी असलेली ग्रामपंचायत येथे किशोर गाभणे यांनी दणदणीत विजय मिळवीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. लोणी गवळी येथे माजी सभापती सागर पाटील व केशवराव जागृत यांना समसमान विजय मिळाला असून लोणी गवळी ग्रामपंचायतीची धुरा ही आता अपक्ष व्यक्तीवर अवलंबून आहे. या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत नवीन उमेदवारांना संधी दिल्याने नवीन उमेदवारांना सुवर्णकाळ आला आहे.

विजयावर सर्वांचाच दावा

मेहकर तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणीत पॅनलने वर्चस्व मिळवल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याने त्या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीचाही बोलबाला असल्याचे त्यांच्या प्रक्वताकडून बोलले जात आहे.