शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST

तालुक्यात झालेल्या ग्रामपंचयत निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, असा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. ग्रामपंचायतींत सरपंच ...

तालुक्यात झालेल्या ग्रामपंचयत निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, असा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. ग्रामपंचायतींत सरपंच आमचा होईल, असा दावाही विविध पक्षांकडून करण्यात येत आहे. १८ जानेवारी राेजी जाहीर झालेल्या निकालात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे.

मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे ३९ ग्रामपंचायतींकरिता १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. या ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी मेहकर येथील तहसील कार्यालय येथे जाहीर करण्यात आला. यावेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मेहकर तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींकरिता ७४९ उमेदवार ३१३ जागेसाठी उभे होते. याकरिता १४२ मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. सोमवारी १४ टेबलवर १४ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल घोषित केला. या निवडणुकीमध्ये मेहकर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या ३९ हजार २७२ पुरुष, तर ३५ हजार ७०२ महिला मतदारांनी मतदान केले. यामध्ये सोमवारी निकाल जाहीर करताच काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवीन उमेदवारांना जनतेने ग्रामपंचायतीमध्ये संधी दिली. यापैकी हिवरा आश्रम येथील भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर यांच्याविरोधात शिवसेनेचे नेते विठ्ठल भाकडे, मनोहर गिर्हे यांनी पॅनल टाकून शिवसेनेने अकरा जागांपैकी सात जागांवर दणदणीत विजय मिळवित ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम केले, तर भाजपाचे संजय वडतकर यांना चार जागेवर समाधान मानावे लागले. देऊळगाव माळी येथील मोठी असलेली ग्रामपंचायत येथे किशोर गाभणे यांनी दणदणीत विजय मिळवीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. लोणी गवळी येथे माजी सभापती सागर पाटील व केशवराव जागृत यांना समसमान विजय मिळाला असून लोणी गवळी ग्रामपंचायतीची धुरा ही आता अपक्ष व्यक्तीवर अवलंबून आहे. या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत नवीन उमेदवारांना संधी दिल्याने नवीन उमेदवारांना सुवर्णकाळ आला आहे.

विजयावर सर्वांचाच दावा

मेहकर तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणीत पॅनलने वर्चस्व मिळवल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याने त्या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीचाही बोलबाला असल्याचे त्यांच्या प्रक्वताकडून बोलले जात आहे.