शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

पूर्णेला पूर

By admin | Updated: August 6, 2015 00:29 IST

जळगाव, संग्रामपूर मलकापूर तालुक्यांचा संपर्क तुटला.

खामगाव : सोमवारपासून परतलेल्या पावसाने गेल्या ३0 तासांपासून संततधार कायम ठेवल्याने पूण्रेला पूर आला आहे. पुरामुळे संग्रामपूर, जळगाव जामोद व मलकापूर तालुक्यांतील गावांचा संपर्क तुटला असून, काही मार्गावरची वाहतूक वळविण्यात आली आहे. खिरोडा तसेच येरळी येथील पुलावरून बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत आठ फूट पाणी वाहत होते, तर संग्रामपूर तालुक्यातील भोन गावाला पुरामुळे वेढा पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस जळगाव जामोद तालुक्यात २७0 मि.मी. झाला, त्यापाठोपाठ मलकापूर तालुक्यात १५५ मि.मी. आणि सर्वांत कमी देऊळगावराजा तालुक्यात ७६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. बुलडाणा तालुक्यात १६५ मि.मी., चिखली ११८ मि.मी., मेहकर १0९ मि.मी., लोणार १0३ मि.मी., सिंदखेडराजा १४१ मि.मी., मोताळा १४0 मि.मी., नांदुरा ११९ मि.मी., खामगाव १३३ मि.मी., शेगाव १४५ मि.मी. व संग्रामपूर तालुक्यात १९९ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. सोमवार, ४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार बुधवारी सकाळपर्यंत सुरूच होती. या ३0 तासांत जिल्ह्यात तब्बल १८४७.१ मि.मी. पाऊस झाला. त्याची सरासरी १४४.२ मि.मी. इतकी आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची टक्केवारी ४४.२८ इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३१५.६ मि.मी. पाऊस झाला. मागील दीड महिन्यांपासून पावसाने उघाड दिल्याने शेतकर्‍यांना दुबार पेरणीची वेळ आली होती; मात्र सोमवारपासून सर्वदूर सुरू झालेल्या पावसाने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. थोडाही खंड न पडता सुरू असलेला पाऊस तब्बल ३0 तास संततधार पडत होता. बुधवारी मात्र पावसाचा जोर कमी झाला, तर पावसाची रिपरिपही सुरूच होती.

प्रकल्पांतील जलाशयात वाढ

       मंगळवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठय़ा प्रकल्पांमधील जलसाठा वाढला आहे. जिल्ह्यात तीन मोठे, सात मध्यम, सात महामंडळांचे, तर ७४ लघु प्रकल्प आहेत. नळगंगा प्रकल्पात उपयुक्त साठा १५.३८ दलघमी आहे. याची टक्केवारी २२.१८ आहे. पलढग प्रकल्पाचा उपयुक्त साठा २.६८ दलघमी आहे. या प्रकल्पात उपयुक्त साठा ३५.६९ टक्के आहे. ज्ञानगंगा प्रकल्पाचा उपयुक्त साठा १0.३१ दलघमी एवढा आहे. याची टक्केवारी ३0.३९ आहे. मस प्रकल्पाचा उपयुक्त साठा ५.४७ दलघमी आहे, तर टक्केवारी ३६.३९ टक्के आहे.