शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘खारपाणपट्टय़ात शुद्ध पाणीपुरवठा करा!’

By admin | Updated: April 1, 2017 02:05 IST

खासदार प्रतापराव जाधव यांची लोकसभेत मागणी.

बुलडाणा, दि. ३१- खारपाणपट्टय़ाच्या क्षेत्रात राहणार्‍या नागरिकांना वर्षानुवर्षांंपासून क्षारयुक्त पाण्याच्या सेवनाने अनेक व्याधी होत आहेत. यात सर्वाधिक प्रमाण किडनी आजाराचे असून हजारो बळी गेले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोदमध्ये २00 हून अधिक गावे प्रभावित आहेत. या क्षेत्रातील नागरिकांसाठी शुद्ध पाण्याच्या योजनेला तत्काळ पूर्ण करावे आणि डायलिसीस सेंटरसह अद्ययावत आरोग्य सुविधांसाठी डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली. जिल्ह्यातील अनेक गावे क्षारयुक्त पाण्याने प्रभावित आहेत. याबाबत ह्यलोकमतह्णमध्ये २२ मार्च रोजी ह्यविंधन विहिरींचे पाणी ठरतेय जीवघेणेह्ण व २८ मार्च रोजी ह्यग्रामीण भागात अशुध्द पाणीपुरवठाह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. यावृत्ताची दखल घेत दिल्ली येथे संसदेचे अधिवेशनादरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. यामध्ये आज नियम ३७७ अन्वये खारपाणपट्टय़ाच्या समस्यांसंदर्भात आवाज उठवला. यामध्ये खा. जाधव यांनी जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात २00 हून अधिक गावांमधील नागरिक टीडीएस ५00 च्यावर ग्रेड असलेला क्षारयुक्त पाणी पितात. त्यामुळे किडनी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील डायलिसीस सेंटरमध्येही अधून-मधून मशीन खराब होण्याचे प्रकार घडतात. तसेच रुग्णांना वेटिंगवर राहावे लागते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊन खासगीत उपचार घ्यावे लागतात, तर अनेकांचा जीवही जातो. आतापयर्ंत हजारोंच्या संख्येने रुग्ण दगावले. सरकारने १८0 गावांसाठी शुध्द पाणी पुरवठा योजना तयार केली आहे.