शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

‘खारपाणपट्टय़ात शुद्ध पाणीपुरवठा करा!’

By admin | Updated: April 1, 2017 02:05 IST

खासदार प्रतापराव जाधव यांची लोकसभेत मागणी.

बुलडाणा, दि. ३१- खारपाणपट्टय़ाच्या क्षेत्रात राहणार्‍या नागरिकांना वर्षानुवर्षांंपासून क्षारयुक्त पाण्याच्या सेवनाने अनेक व्याधी होत आहेत. यात सर्वाधिक प्रमाण किडनी आजाराचे असून हजारो बळी गेले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोदमध्ये २00 हून अधिक गावे प्रभावित आहेत. या क्षेत्रातील नागरिकांसाठी शुद्ध पाण्याच्या योजनेला तत्काळ पूर्ण करावे आणि डायलिसीस सेंटरसह अद्ययावत आरोग्य सुविधांसाठी डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली. जिल्ह्यातील अनेक गावे क्षारयुक्त पाण्याने प्रभावित आहेत. याबाबत ह्यलोकमतह्णमध्ये २२ मार्च रोजी ह्यविंधन विहिरींचे पाणी ठरतेय जीवघेणेह्ण व २८ मार्च रोजी ह्यग्रामीण भागात अशुध्द पाणीपुरवठाह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. यावृत्ताची दखल घेत दिल्ली येथे संसदेचे अधिवेशनादरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. यामध्ये आज नियम ३७७ अन्वये खारपाणपट्टय़ाच्या समस्यांसंदर्भात आवाज उठवला. यामध्ये खा. जाधव यांनी जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात २00 हून अधिक गावांमधील नागरिक टीडीएस ५00 च्यावर ग्रेड असलेला क्षारयुक्त पाणी पितात. त्यामुळे किडनी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील डायलिसीस सेंटरमध्येही अधून-मधून मशीन खराब होण्याचे प्रकार घडतात. तसेच रुग्णांना वेटिंगवर राहावे लागते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊन खासगीत उपचार घ्यावे लागतात, तर अनेकांचा जीवही जातो. आतापयर्ंत हजारोंच्या संख्येने रुग्ण दगावले. सरकारने १८0 गावांसाठी शुध्द पाणी पुरवठा योजना तयार केली आहे.