शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

‘खारपाणपट्टय़ात शुद्ध पाणीपुरवठा करा!’

By admin | Updated: April 1, 2017 02:05 IST

खासदार प्रतापराव जाधव यांची लोकसभेत मागणी.

बुलडाणा, दि. ३१- खारपाणपट्टय़ाच्या क्षेत्रात राहणार्‍या नागरिकांना वर्षानुवर्षांंपासून क्षारयुक्त पाण्याच्या सेवनाने अनेक व्याधी होत आहेत. यात सर्वाधिक प्रमाण किडनी आजाराचे असून हजारो बळी गेले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोदमध्ये २00 हून अधिक गावे प्रभावित आहेत. या क्षेत्रातील नागरिकांसाठी शुद्ध पाण्याच्या योजनेला तत्काळ पूर्ण करावे आणि डायलिसीस सेंटरसह अद्ययावत आरोग्य सुविधांसाठी डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली. जिल्ह्यातील अनेक गावे क्षारयुक्त पाण्याने प्रभावित आहेत. याबाबत ह्यलोकमतह्णमध्ये २२ मार्च रोजी ह्यविंधन विहिरींचे पाणी ठरतेय जीवघेणेह्ण व २८ मार्च रोजी ह्यग्रामीण भागात अशुध्द पाणीपुरवठाह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. यावृत्ताची दखल घेत दिल्ली येथे संसदेचे अधिवेशनादरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. यामध्ये आज नियम ३७७ अन्वये खारपाणपट्टय़ाच्या समस्यांसंदर्भात आवाज उठवला. यामध्ये खा. जाधव यांनी जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात २00 हून अधिक गावांमधील नागरिक टीडीएस ५00 च्यावर ग्रेड असलेला क्षारयुक्त पाणी पितात. त्यामुळे किडनी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील डायलिसीस सेंटरमध्येही अधून-मधून मशीन खराब होण्याचे प्रकार घडतात. तसेच रुग्णांना वेटिंगवर राहावे लागते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊन खासगीत उपचार घ्यावे लागतात, तर अनेकांचा जीवही जातो. आतापयर्ंत हजारोंच्या संख्येने रुग्ण दगावले. सरकारने १८0 गावांसाठी शुध्द पाणी पुरवठा योजना तयार केली आहे.