शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

‘खारपाणपट्टय़ात शुद्ध पाणीपुरवठा करा!’

By admin | Updated: April 1, 2017 02:05 IST

खासदार प्रतापराव जाधव यांची लोकसभेत मागणी.

बुलडाणा, दि. ३१- खारपाणपट्टय़ाच्या क्षेत्रात राहणार्‍या नागरिकांना वर्षानुवर्षांंपासून क्षारयुक्त पाण्याच्या सेवनाने अनेक व्याधी होत आहेत. यात सर्वाधिक प्रमाण किडनी आजाराचे असून हजारो बळी गेले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोदमध्ये २00 हून अधिक गावे प्रभावित आहेत. या क्षेत्रातील नागरिकांसाठी शुद्ध पाण्याच्या योजनेला तत्काळ पूर्ण करावे आणि डायलिसीस सेंटरसह अद्ययावत आरोग्य सुविधांसाठी डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली. जिल्ह्यातील अनेक गावे क्षारयुक्त पाण्याने प्रभावित आहेत. याबाबत ह्यलोकमतह्णमध्ये २२ मार्च रोजी ह्यविंधन विहिरींचे पाणी ठरतेय जीवघेणेह्ण व २८ मार्च रोजी ह्यग्रामीण भागात अशुध्द पाणीपुरवठाह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. यावृत्ताची दखल घेत दिल्ली येथे संसदेचे अधिवेशनादरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. यामध्ये आज नियम ३७७ अन्वये खारपाणपट्टय़ाच्या समस्यांसंदर्भात आवाज उठवला. यामध्ये खा. जाधव यांनी जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात २00 हून अधिक गावांमधील नागरिक टीडीएस ५00 च्यावर ग्रेड असलेला क्षारयुक्त पाणी पितात. त्यामुळे किडनी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील डायलिसीस सेंटरमध्येही अधून-मधून मशीन खराब होण्याचे प्रकार घडतात. तसेच रुग्णांना वेटिंगवर राहावे लागते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊन खासगीत उपचार घ्यावे लागतात, तर अनेकांचा जीवही जातो. आतापयर्ंत हजारोंच्या संख्येने रुग्ण दगावले. सरकारने १८0 गावांसाठी शुध्द पाणी पुरवठा योजना तयार केली आहे.