शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कायमस्वरूपी शिक्षक द्या; अन्यथा शाळा बंदचा इशारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:29 IST

तालुक्यातील भरोसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आवश्यक तितके शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत असून, वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण विभागाकडून कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करणे तर दूरच, उलटपक्षी रिक्त जागांवर नवीन नेमणूक करण्यावर बंदी घालण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, हप्ताभरात नवीन शिक्षकांची नेमणूक न केल्यास बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील भरोसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आवश्यक तितके शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत असून, वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण विभागाकडून कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करणे तर दूरच, उलटपक्षी रिक्त जागांवर नवीन नेमणूक करण्यावर बंदी घालण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, हप्ताभरात नवीन शिक्षकांची नेमणूक न केल्यास बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.तालुक्यातील भरोसा हे सुमारे ३ हजार लोकवस्तीचे गाव असून, तेथे मागील ५0 वर्षांंपासून इयत्ता १ ते ७ वीपर्यंंत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा होती; मात्न इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे येथील वर्ग ५ ते ७ हे तीन वर्ग बंद पडले. दरम्यान, वर्ग बंद पडल्याची सल सहन न झाल्याने ग्रामस्थांनी एकजूट होऊन शाळा पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा चंग बांधला आणि त्यासाठी लोकवर्गणी करून शाळा डिजिटल बनवण्यात आली. प्रत्येक वर्गात ‘एलसीडी’ लावून संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. शिवाय, परिसरामध्ये वृक्ष लागवड करून शाळेला आधुनिक टच देऊन शाळेतील वातावरण उत्साही बनविण्यात गावकर्‍यांना यश आले. तथापि, ग्रामस्थांच्या पुढाकारानेच पुन्हा बंद पडलेला पाचवा वर्ग सुरू केला होता. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता; मात्न जुलै महिन्यामध्ये गवई नामक शिक्षकेची बदली झाल्याने पाचवीतील मुलांच्या पालकांनी मुलांचे प्रवेश रद्द केले, त्यामुळे आता शाळेमध्ये चार वर्ग १३३ मुले व तीन शिक्षक अशी विचित्न परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच एका शिक्षकाकडे मुख्याध्यापक पद असल्यामुळे दोन वर्ग एकाच वर्गात बसवावे लागतात. त्यामुळे लाखो रुपये खर्चून शाळा डिजिटल करूनही पालकांचा भ्रमनिरास झाल्याने संतप्त ग्रामस्थांसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर थुट्टे यांनी ६ सप्टेंबर रोजी शिक्षण अधिकारी बुलडाणा यांना लेखी निवेदन दिले असून, आठवडाभरात कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक न झाल्यास शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. -