शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

दुबार पेरणीसाठी खत, बियाणांसह आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

चिखली : मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने दिलेल्या उघडिपीनंतर २८ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन तालुक्यातील ...

चिखली : मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने दिलेल्या उघडिपीनंतर २८ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन तालुक्यातील गांगलगाव, आमखेड, अंबाशी, एकलारा, पाटोदा गावांतील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे. यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या बळीराजाचे अतोनात नुकसान झाले. या नैसर्गिक प्रकोपातून शेतकऱ्यांच्या उभारणीकरिता शासनाने दुबार पेरणीकरिता खत, बियाणांसह मशागतीकरिता तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केली आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, जि.प. महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, मेहकर व चिखलीचे तहसीलदारांसमवेत जिल्हा परिषदेचे अधिकारी, अभियंता उपस्थित होते.

तालुक्यातील गांगलगाव शिवारात सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे आमखेड येथील पाझरतलावाची भिंत फुटली. या भागातील सर्वच नदीनाल्यांना पूर आल्यामुळे तालुक्यातील गांगलगाव, आमखेड, अंबाशी, एकलारा, पाटोदा गावांतील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेती खरडून गेली. या शिवारातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वर आलेली पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. झालेल्या या नुकसानीची पाहणी राहुल बोंद्रे यांच्यासह जि.प. अध्यक्षा मनीषा पवार, जि.प. महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, मेहकरचे तहसीलदार गरकळ व चिखलीचे तहसीलदार अजितकुमार येळे यांच्यासमवेत जि.प.चे अधिकारी, कार्यकारी अभियंता पवन पाटील, उपअभियंता गावडे, कनिष्ठ अभियंता खरपास, मेहकर व चिखलीचे बीडीओ, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह तालुका काँग्रेस अध्यक्ष समाधान सुपेकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्लोकानंद डांगे, समाधान आकाळ, माजी सभापती अशोकराव पडघान, लक्ष्मणराव अंभोरे, अंबाशी, आमखेडचे सरपंच, उपसरपंच, पाटोदाचे सरपंच किशोर सोळंकी, प्रकाश अंभोरे, शिवाजी भाकडे, अशोक भाकडे, प्रदीप वाघ, लड्डुभाई, हबीबभाई, साबीर शेख, माजी सरपंच हारूणभाई, शिवानंद गायकवाड, अतुल देशमुख, दिलीप देशमुख, आमखेड सरपंच ज्ञानेश्वर वाघ, भगवान वाघ, गजानन वाघ, अमोल सुरडकर, चेतन सोळंकी, प्रताप मोरे, भिकाजी पाटील ढोरे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. अतिवृष्टीमुळे उद‌्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उभारणीकरिता राज्य शासनाने दुबार पेरणीसाठी खते, बियाणांसह मशागतीकरिता त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली आहे.