शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

दुबार पेरणीसाठी खत, बियाणांसह आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

चिखली : मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने दिलेल्या उघडिपीनंतर २८ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन तालुक्यातील ...

चिखली : मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने दिलेल्या उघडिपीनंतर २८ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन तालुक्यातील गांगलगाव, आमखेड, अंबाशी, एकलारा, पाटोदा गावांतील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे. यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या बळीराजाचे अतोनात नुकसान झाले. या नैसर्गिक प्रकोपातून शेतकऱ्यांच्या उभारणीकरिता शासनाने दुबार पेरणीकरिता खत, बियाणांसह मशागतीकरिता तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केली आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, जि.प. महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, मेहकर व चिखलीचे तहसीलदारांसमवेत जिल्हा परिषदेचे अधिकारी, अभियंता उपस्थित होते.

तालुक्यातील गांगलगाव शिवारात सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे आमखेड येथील पाझरतलावाची भिंत फुटली. या भागातील सर्वच नदीनाल्यांना पूर आल्यामुळे तालुक्यातील गांगलगाव, आमखेड, अंबाशी, एकलारा, पाटोदा गावांतील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेती खरडून गेली. या शिवारातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वर आलेली पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. झालेल्या या नुकसानीची पाहणी राहुल बोंद्रे यांच्यासह जि.प. अध्यक्षा मनीषा पवार, जि.प. महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, मेहकरचे तहसीलदार गरकळ व चिखलीचे तहसीलदार अजितकुमार येळे यांच्यासमवेत जि.प.चे अधिकारी, कार्यकारी अभियंता पवन पाटील, उपअभियंता गावडे, कनिष्ठ अभियंता खरपास, मेहकर व चिखलीचे बीडीओ, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह तालुका काँग्रेस अध्यक्ष समाधान सुपेकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्लोकानंद डांगे, समाधान आकाळ, माजी सभापती अशोकराव पडघान, लक्ष्मणराव अंभोरे, अंबाशी, आमखेडचे सरपंच, उपसरपंच, पाटोदाचे सरपंच किशोर सोळंकी, प्रकाश अंभोरे, शिवाजी भाकडे, अशोक भाकडे, प्रदीप वाघ, लड्डुभाई, हबीबभाई, साबीर शेख, माजी सरपंच हारूणभाई, शिवानंद गायकवाड, अतुल देशमुख, दिलीप देशमुख, आमखेड सरपंच ज्ञानेश्वर वाघ, भगवान वाघ, गजानन वाघ, अमोल सुरडकर, चेतन सोळंकी, प्रताप मोरे, भिकाजी पाटील ढोरे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. अतिवृष्टीमुळे उद‌्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उभारणीकरिता राज्य शासनाने दुबार पेरणीसाठी खते, बियाणांसह मशागतीकरिता त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली आहे.