शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
4
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
5
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
6
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
8
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
9
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
10
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
11
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
12
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
13
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
14
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
15
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
16
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
17
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
18
अनोखा विक्रम! फक्त एका दिवसात १८ लाखांहून अधिक महिलांचा बसमधून मोफत प्रवास
19
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
20
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?

दुबार पेरणीसाठी खत, बियाणांसह आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

चिखली : मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने दिलेल्या उघडिपीनंतर २८ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन तालुक्यातील ...

चिखली : मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने दिलेल्या उघडिपीनंतर २८ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन तालुक्यातील गांगलगाव, आमखेड, अंबाशी, एकलारा, पाटोदा गावांतील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे. यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या बळीराजाचे अतोनात नुकसान झाले. या नैसर्गिक प्रकोपातून शेतकऱ्यांच्या उभारणीकरिता शासनाने दुबार पेरणीकरिता खत, बियाणांसह मशागतीकरिता तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केली आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, जि.प. महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, मेहकर व चिखलीचे तहसीलदारांसमवेत जिल्हा परिषदेचे अधिकारी, अभियंता उपस्थित होते.

तालुक्यातील गांगलगाव शिवारात सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे आमखेड येथील पाझरतलावाची भिंत फुटली. या भागातील सर्वच नदीनाल्यांना पूर आल्यामुळे तालुक्यातील गांगलगाव, आमखेड, अंबाशी, एकलारा, पाटोदा गावांतील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेती खरडून गेली. या शिवारातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वर आलेली पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. झालेल्या या नुकसानीची पाहणी राहुल बोंद्रे यांच्यासह जि.प. अध्यक्षा मनीषा पवार, जि.प. महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, मेहकरचे तहसीलदार गरकळ व चिखलीचे तहसीलदार अजितकुमार येळे यांच्यासमवेत जि.प.चे अधिकारी, कार्यकारी अभियंता पवन पाटील, उपअभियंता गावडे, कनिष्ठ अभियंता खरपास, मेहकर व चिखलीचे बीडीओ, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह तालुका काँग्रेस अध्यक्ष समाधान सुपेकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्लोकानंद डांगे, समाधान आकाळ, माजी सभापती अशोकराव पडघान, लक्ष्मणराव अंभोरे, अंबाशी, आमखेडचे सरपंच, उपसरपंच, पाटोदाचे सरपंच किशोर सोळंकी, प्रकाश अंभोरे, शिवाजी भाकडे, अशोक भाकडे, प्रदीप वाघ, लड्डुभाई, हबीबभाई, साबीर शेख, माजी सरपंच हारूणभाई, शिवानंद गायकवाड, अतुल देशमुख, दिलीप देशमुख, आमखेड सरपंच ज्ञानेश्वर वाघ, भगवान वाघ, गजानन वाघ, अमोल सुरडकर, चेतन सोळंकी, प्रताप मोरे, भिकाजी पाटील ढोरे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. अतिवृष्टीमुळे उद‌्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उभारणीकरिता राज्य शासनाने दुबार पेरणीसाठी खते, बियाणांसह मशागतीकरिता त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली आहे.