शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मिरचीच्या पिकातून साधली शेतकऱ्यांनी प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST

गणेश भालके धामणगांव धाडः वातावरणातील बदलामुळे पारंपरिक पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते़ त्यामुळे, शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयाेग करणे सुरू ...

गणेश भालके

धामणगांव धाडः वातावरणातील बदलामुळे पारंपरिक पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते़ त्यामुळे, शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयाेग करणे सुरू केले आहे़ धामणगाव धाड परिसरात शेतकऱ्यांनी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले असून ही मिरची अकाेला,अकाेट आणि नागपूरपर्यंत विक्रीस जात आहे़ मिरचीच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न हाेत आहे़

धामणगांव परिसरात मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात मल्चिंग पेपरवर व मुबलक पाणी साठ्यावर लागवड केलेली मिरची व पिके मोठ्या प्रमाणात बहरली आहे़ गेल्या वर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाने कडक निर्बंधामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़ अनेक शेतकऱ्यांनी मिरचीच्या लागवडीकडे पाठ फिरवली होती़ त्यानंतर निर्बंधामध्ये शिथिलता आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी हिरवी मिरचीचे लाखाे रुपयांचे उत्पादन घेतले हाेते़ सुरुवातीला हिरवी मिरचीला ४० ते ६० रुपयांचा भाव मिळाला असताना अनेक शेतकरी यांना फायदा झाला़ यावर्षी सुरूवातीपासूनच परिसरातील धामणगावसह वालसांवगी , पारध मासरूळ डोमरूळ टाकळी तराडखेड आदी भागात लाखो हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली आहे़ काेराेनाची स्थिती असतानाही मोठ्या प्रमाणावर ठिबक सिंचनाद्वारे मल्चिंग पेपरवर अंदाजे ७० ते ७५ टक्के मिरची लागवड झाली आहे. व्यापारी शेतातच मिरची विकत घेत आहे़ धामणगावची मिरची नागपूर , अमरावती , अकोट .अकोला , बुलडाणा , मुंबई वाशी , अहमदनगर , दिल्ली , भुसावळ येथील व्यापारी खरेदी करीत आहेत.

मिरची आठवडाभरावर तोडणीसाठी येणार असून राज्य शासनाने कोरोनाच्या संकटात मिरची लिलाव सुरू करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून शेतकरी व मिरची उत्पादकांचे नुकसान होणार नाही़ लिलावामुळे शेतकऱ्यांचा चांगला भाव मिळेल़

- शेषराव काळे, मिरची उत्पादक शेतकरी, धामणगांव धाड