शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अत्याचारमुक्त महाराष्ट्रनिर्मिताला प्राधान्य द्यावे : प्रा. कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST

जून महिन्यात चितोडा-अंबिकापूर येथे दोन कुटुंबांतील वादानंतर निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण पाहता बुलडाण्यातील पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेत ही ...

जून महिन्यात चितोडा-अंबिकापूर येथे दोन कुटुंबांतील वादानंतर निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण पाहता बुलडाण्यातील पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेत ही मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत पीरिपाचे पदाधिकारी चरणदास इंगोले, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळवे, विजय गवई यांच्यासह अन्य उपस्थित होते. चितोडा येथील वाद सामंजस्याने मिटविण्याऐवजी वादग्रस्त वक्तव्य खा. प्रतापराव जाधव आणि आ. संजय गायकवाड यांनी केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, चितोडा येथील हिवराळे कुटुंबावर दरोड्यासारखे गुन्हे दाखल करण्याचे आ. गायकवाड सांगतात. सोबतच फौज आणण्याचे वादग्रस्त विधान करतात त्यासाठी ‘मातोश्री’चा संदर्भ देतात. यात एक प्रकारे सर्वसमावेशक भूमिका असलेल्या ‘मातोश्री’चीच बदनामी केल्यासारखा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. या प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृह राज्यमंत्र्यांचीही भेट घेऊन याबाबत त्यांना माहिती देणार असल्याचे कवाडे म्हणाले.

--न्याय न मिळाल्यास मोर्चा--

याप्रकरणी योग्य न्याय न मिळाल्यास बुलडाण्यात मोर्चा काढणार असल्याचे प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. सोबतच चितोडा येथे आपण शांतता नांदावी यासाठी तेथे जाऊन दोन्ही कुटुंबीयांची भेट घेणार होतो. वादग्रस्त विधान करण्याची आपली भूमिका नव्हती, मात्र पोलिसांनी आदेश थोपवून आपल्याला जाऊ दिले नाही. त्यामुळे पीडित कुटुंबीयांची आपण खामगावात भेट घेतल्याचे ते म्हणाले. सामाजिक समतोल व सद्‌भावना निर्माण व्हावी ही आपली भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

--खा. जाधवांची ईडीमार्फत चौकशी व्हावी--

चितोडा प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या एकाच कुटुंबाकडे खा. प्रतापराव जाधव गेले. तेथे वादी पक्षाकडे एवढा पैसा कोठून आला असे वक्तव्य करणाऱ्या खा. जाधव यांची तर ईडीमार्फत अर्थात सक्त वसुली संचालनालयाकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही पत्रकार परिषदेत त्यांनी प्रा. कवाडे यांनी केली.