शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

अत्याचारमुक्त महाराष्ट्रनिर्मिताला प्राधान्य द्यावे : प्रा. कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST

जून महिन्यात चितोडा-अंबिकापूर येथे दोन कुटुंबांतील वादानंतर निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण पाहता बुलडाण्यातील पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेत ही ...

जून महिन्यात चितोडा-अंबिकापूर येथे दोन कुटुंबांतील वादानंतर निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण पाहता बुलडाण्यातील पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेत ही मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत पीरिपाचे पदाधिकारी चरणदास इंगोले, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळवे, विजय गवई यांच्यासह अन्य उपस्थित होते. चितोडा येथील वाद सामंजस्याने मिटविण्याऐवजी वादग्रस्त वक्तव्य खा. प्रतापराव जाधव आणि आ. संजय गायकवाड यांनी केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, चितोडा येथील हिवराळे कुटुंबावर दरोड्यासारखे गुन्हे दाखल करण्याचे आ. गायकवाड सांगतात. सोबतच फौज आणण्याचे वादग्रस्त विधान करतात त्यासाठी ‘मातोश्री’चा संदर्भ देतात. यात एक प्रकारे सर्वसमावेशक भूमिका असलेल्या ‘मातोश्री’चीच बदनामी केल्यासारखा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. या प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृह राज्यमंत्र्यांचीही भेट घेऊन याबाबत त्यांना माहिती देणार असल्याचे कवाडे म्हणाले.

--न्याय न मिळाल्यास मोर्चा--

याप्रकरणी योग्य न्याय न मिळाल्यास बुलडाण्यात मोर्चा काढणार असल्याचे प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. सोबतच चितोडा येथे आपण शांतता नांदावी यासाठी तेथे जाऊन दोन्ही कुटुंबीयांची भेट घेणार होतो. वादग्रस्त विधान करण्याची आपली भूमिका नव्हती, मात्र पोलिसांनी आदेश थोपवून आपल्याला जाऊ दिले नाही. त्यामुळे पीडित कुटुंबीयांची आपण खामगावात भेट घेतल्याचे ते म्हणाले. सामाजिक समतोल व सद्‌भावना निर्माण व्हावी ही आपली भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

--खा. जाधवांची ईडीमार्फत चौकशी व्हावी--

चितोडा प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या एकाच कुटुंबाकडे खा. प्रतापराव जाधव गेले. तेथे वादी पक्षाकडे एवढा पैसा कोठून आला असे वक्तव्य करणाऱ्या खा. जाधव यांची तर ईडीमार्फत अर्थात सक्त वसुली संचालनालयाकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही पत्रकार परिषदेत त्यांनी प्रा. कवाडे यांनी केली.