शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

जिगावच्या पहिल्या टप्प्यातील २२ गावांच्या पुनर्वसनाला प्राधान्य : शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:28 IST

जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात किती गावांचे पुनर्वसन करावयाचे आहे? जिगाव महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ३३ गावांचे पूर्णत: आणि १४ गावांचे ...

जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात किती गावांचे पुनर्वसन करावयाचे आहे?

जिगाव महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ३३ गावांचे पूर्णत: आणि १४ गावांचे अंशत: पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यासंदर्भाने पहिल्या टप्प्यात २२ गावांचे पुनर्वसन करावयाचे आहेत. २०२१ मध्ये यासंदर्भातील कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. सध्या २२ गावांमधील नागरी सुविधांची कामे सुरू आहेत.

आतापर्यंत किती गावांचे भूखंड वाटप झाले आहेत?

जिगाव प्रकल्पांतर्गत आतापर्यंत कोदरखेड, खरकुंडी आणि पलसोडा या तीन गावांचे भूखंड वाटप झालेले आहे, तर अन्य गावांत नागरी सुविधा देण्यासंदर्भातील पूर्वतयारी सुरू आहे. एकूण १८ नागरी सुविधा पुनर्वसित गावात द्याव्या लागतात.

पुनर्वसनासंदर्भातील धोरण नेमके कसे आहे?

प्रथमत: जागा निश्चितीकरण, नागरी सुविधा उपलब्ध करणे, भूखंड वाटप आणि शेवटचा टप्पा हा स्थलांतराचा असतो. यासोबतच जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, जमीन विक्री, वाटणी, बक्षीसपत्र परवानगीची कामे करण्यात येतात. कामे जलद गतीने निपटारा करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. यासोबतच या कामासंदर्भात काही अडचणी असल्यास थेट आपल्याशी संबंधितांनी संपर्क साधला तरी चालेल.

राहेरा पुनर्वसनाची स्थिती काय?

राहेरा प्रकल्प राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रमातंर्गतचा आहे. राहेरा पुनर्वसनाच्या दृष्टीने कामे प्रगतिपथावर आहे. नागरी सुविधांची कामे सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच भूखंड वाटपाची कामे मार्गी लागतली. ते झाल्यास राहेरा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागले. या कामालाही आम्ही प्राधान्य देत आहोत.

अन्य कोणत्या प्रकल्पांतर्गतची कामे सुरू आहेत?

जिल्ह्यातील बोरखेडी, निम्न ज्ञानगंगा, खडकपूर्णा प्रकल्पांतर्गतची पुनर्वसनाची कामे जवळपास संपुष्टात आली आहे. पेनटाकळी प्रकल्पातंर्गतच्या पुनर्वसनाच्या कामासंदर्भातही कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर नागरी सुविधांची कामे करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हा पुनर्वसन विभाग नियमित पणे आदेश घेऊन कामे मार्गी लावण्यास प्राधान्य देत आहे.