शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कांद्यासह भाजीपाल्याचे भाव काेसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:30 IST

बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजारांवर बंदी लादली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले ...

बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजारांवर बंदी लादली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. रविवारी बुलडाणा शहरात कांद्यासह भाजीपाल्याचे भाव काेसळले.

गत आठवड्यापासून कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे १४ मार्च राेजी कांदा २० ते ३० रुपये किलाे विकला गेला. कांद्याचे भाव १० रुपयांनी कमी झाले. बाजारात नव्याने दाखल झालेल्या ढेमशांचे भाव ५० रुपयांवर गेले आहेत. तसेच इतर भाज्यांचे दर कायम आहेत. हिरवी मिरची ४० रुपये किलाे, वांगी ३० रुपये किलोवर पाेहोचली आहेत. आवक घटल्याने मेथी, पालकचे दरही वाढले आहेत. फळ बाजारात सफरचंद, माेसंबी, संत्रे आदींची आवक माेठ्या प्रमाणात कमी झाल्याने दर जवळपास दुप्पट झाले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे दर गेल्या आठवड्यापेक्षा वाढले आहेत.

टरबूज, खरबुजांची आवक वाढली

पाण्याची साेय असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी टरबूज, खरबुजाची माेठ्या प्रमाणात लागवड केली आहे. साधारणत: जानेवारी महिन्यात टरबुजाची लागवड करण्यात येते. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी त्यापूर्वीच लागवड केल्याने बुलडाणा शहरातील विविध भागांत टरबुजाची आवक वाढली आहे. टरबूज २० रुपये तर खरबूज ३० रुपये किलाेप्रमाणे विकले जात आहेत. द्राक्षेही बाजारात दाखल झाली असून ६० ते ८० रुपये किलाेप्रमाणे विकली जात आहेत.

शेतकऱ्यांची थेट विक्री

कृषी विभागाने सुरू केलेल्या याेजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूज, खरबुजाची थेट विक्री सुरू केली आहे. बुलडाणा शहरातील चिखली राेडवर अनेक शेतकऱ्यांनी टरबुजाची दुकाने लावली आहेत. तसेच इतर भागातही ट्रॅक्टरने माल घेऊन शेतकरी विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत असल्याचे चित्र आहे.

कांद्याची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. नव्याने बाजारात आलेल्या भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. इतर भाज्यांचे दर कायम आहेत.

- गणेश सुरवाडे, भाजी विक्रेता

द्राक्षांची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. चांगल्या दर्जाची द्राक्षे ८० रुपये किलाेप्रमाणे विकली जात आहेत. तसेच टरबूज, खरबूजही बाजारात दाखल झाले आहेत. टरबूज २० रुपये तर खरबूज ३० रुपयांप्रमाणे विकले जात आहेत.

- सलीम बागवान, फळ विक्रेता