शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

सहा लाखावर विविध रोपे तयार

By admin | Updated: July 6, 2014 23:31 IST

पावसाची प्रतीक्षा :लागवडीसाठी सामाजिक वनीकरण सज्ज

खामगाव: सामाजिक वनिकरण विभागाने यावर्षीही वृक्षारोपणासाठी तयारी म्हणून जिल्ह्यातील १२ ठिकाणी असलेल्या रोपवाटिकांमध्ये विविध ८४ प्रजातींची ६ लाखाचेवर विविध वृक्षाची रोपे तयारी केली आहेत. मात्र अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने ही रोपे सामाजिक वनीकरणच्या रोपवाटिकांमध्ये पडून आहेत. त्यामुळे लवकर पाऊस पडून वृक्षारोपणाची प्रतीक्षा लागली आहेत.पर्यावरणाचा वाढता असमतोल पाहता आजरोजी वृक्षारोपण अतिमहत्त्वाचे ठरत आहे. त्यासाठी शासनासोबतच राष्ट्रीय हरित सेना व इतर विविध सामाजिक संघटना पुढाकार घेतात. हा पुढाकार पाहता वृक्षारोपणासाठी खाजगी रोपवाटिकांसोबतच शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, महामार्ग दुतर्फा वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी प्रामुख्याने सामाजिक वनीकरण विभागावर असते. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्याअगोदर सामाजिक वनीकरण विभागाकडून लाखोच्या संख्येत वृक्षरोपे तयार करण्यात येतात. यावर्षीही सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील नांदुरा वगळता १२ तालुक्यात असलेल्या रोपवाटिकांमध्ये उंबर, वड, पिंपळ, बाभूळ, अंजन, चिंच, रिठा, आंबा अशी सावलीची तसेच फळझाडे अशा ८४ प्रजातींची रोपे तयार झाली आहेत. मोठी ५ ते ६ फूट उंचीची १ लाख ६८ हजार ३0३ तर १ ते २ फूट उंच झालेली ४ लाख ६२ हजार ५६४ अशी एकूण ६ लाख ३0 हजार ८६७ वृक्षरोपे तयार आहेत. मात्र यावर्षी जून महिना पावसाविना उलटला असून जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटत असताना जिल्ह्यात तसेच सर्वत्रच अद्याप पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे आतापर्यंत वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरणच्या रोपवाटिकेतून वृक्षरोपे कोणीही नेली नाहीत. वृक्षरोप जगून चांगल्या पध्दतीने वाढ होण्यासाठी पावसाचे पाणी आवश्यक असते. त्यामुळे वृक्षारोपणासाठी पाऊस पडण्याची वाट पाहण्यात येते.