शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पलसिद्ध महास्वामी स्मृती महोत्सव उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात - सिद्धलिंग शिवाचार्य महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 18:30 IST

मठाधीपती म्हणून ४० वर्षापासून कामकाज पाहत असलेले शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्याशी साधलेला संवाद...

- अशोक इंगळे

साखरखेर्डा: श्री पलसिद्ध महास्वामी यांचा स्मृती सोहळा साखरखेर्डा येथे १८ आॅगस्ट पासून तीन दिवस आयोजित करण्यात आलेला आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यानुषंगाने येथील मठाधीपती म्हणून ४० वर्षापासून कामकाज पाहत असलेले शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्याशी साधलेला संवाद...

 श्री पलसिद्ध महास्वामींचे साखरखेर्डा येथे आगमन कसे झाले ?

- कर्नाटकमधील बिदर प्रांताचे राजे जयसिंग यांच्या प्रदेशात दुष्काळ पडला होता. साधु संतांना पाऊस पाडण्यासाठी अधिष्ठानासाठी त्यावेळी बसविण्यात आले. पण पाऊस पडला नाही. त्यामुळे साधु संतांना तुरूंगात डांबण्यात आले होते. त्याची वार्ता जगद्गुरू मरुळसिद्ध शिवाचार्य यांना कळाल्याने त्यांनी दक्षीणेकडे कुच करत बिदर गाठले व अनुष्ठाण सुरू केले. त्याला प्रसन्न होत वरूण राजाने सात दिवस पाऊस पाडला. त्यानंतर कर्नाटकमधील उजैनी येथे पीठ स्थापना करून विरशैव धर्माचा प्रसार भारत भ्रमण करीत त्यांनी खेटकपूर गाठले.

पलसिद्ध नाव कसे रुढ झाले?

- खेटकपूर अभयारण्यात महास्वांनी तपश्चर्या केली. वय वाढल्याने पुढील प्रवास शक्य नव्हता. त्यामुळे मरूळसिद्ध महास्वामींनी एका गुहेत प्रवेश करून पळसाच्या वृक्षाखाली समाधी घेतली. स.न. ९८० मधील तो काळ होता. पळसाच्या वृक्षाखाली ते समाधीस्त झाल्याने मरुळसिद्ध यांचे नावाचे पलसिद्ध महास्वामी म्हणून रुढ झाले. बिदर प्रांतात त्यांना मळी (पाऊस पाडणारे) स्वामी म्हणून ओखळल्या जाते. मठाच्या गादीवर किती महापुरुष होऊन गेले? मठाची स्थापना झाल्यापासून सुमारे ३० स्वामींनी गादीवर बसून मठाचा कारभार पाहिला.सोबतच धर्म प्रसाराचे काम केले. विरशैव धर्म हा पुरातन धर्म आहे. सर्वांशी समन्वय ठेवून जातीभेद विरहीत विरशैव लिंगायत धर्म कार्यरत आहे. विरशैव धर्म कोणत्याही धर्माचा विरोध करत नाही. विरशैव धर्म पुरातन आहे. सर्व धर्मांचा सन्मान आम्ही करतो. साखरखेर्डा गावाचे पूर्वीचे नाव खेटकपूर असे होते. खेटकासूर नावाचा राक्षस येथे वास्तव्याला होता. अशी अख्यायिका आहे. त्यावरून या गावाचे नाव खेटकपूर पडले होते. संस्थांनच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून तसे प्रयत्न सुरू आहेत.

मठाच्या विकासासाठी काही ठोस निर्णय आहेत का?

- मठाचा विकास येथे शैक्षणिक, आरोग्य तथा पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यास होऊ शकतो. त्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. या संस्थांनला आता ब वर्गाचा दर्जा मिळाला असून विकास कामे सुरू आहेत. हा दर्जा मिळाल्यामुळे भक्त निवास, शौचालयांची सुविधा, धार्मिक कार्यासाठी सभागृह, भोजन मंडप, पाकगृह अशी विविध कामे येथे झाली आहे. येथे पर्यटन स्थळ विकसीत झाले तर साखरखेर्डा गावाचा आर्थिक विकास होईल. संस्थांनाला ब वर्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे विकासाची प्रक्रिया सुरू होऊन येथे सुविधा उपलब्ध होत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत