शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

खांब पडल्याने ३६ तासांपासून २५ गावांमधील वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: July 13, 2016 02:09 IST

साखरखेर्डा ते मेहकर या मेन लाइनवरील विद्युत पोल पडल्याने विजपुरवठा खंडीत झाला आहे.

साखरखेर्डा (जि. बुलडाणा) : साखरखेर्डा ते मेहकर या मेन लाइनवरील विद्युत पोल पडल्याने विजपुरवठा खंडीत झाला आहे. परिणामस्वरुप गेल्या ३६ तासापासून साखरखेर्डासह परिसरातील २५ गावे अंधारात आहेत. विज पुरवठा खंडीत असल्याने विज पुरवठा केव्हा सुरळीत होईल, याबाबत विज पुरवठाचे कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसल्याने विज ग्राहकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.साखरखेर्डा येथे ३३ के.व्ही.चे उपकेंद्र असून या उपकेंद्रात मेनलाईनद्वारे मेहकर येथून विज पुरवठा होतो. मेहकर ते साखरखेर्डा स्पेशल एक्सप्रेस फिडर नसल्याने या लाईनवर नेहमीच विज पुरवठा खंडीत होतो. मेहकर येथून हिवराआश्रम, देऊळगाव माळी, पेनटाकळी आणि साखरखेर्डा या चार ठिकाणच्या ३३ के.व्ही.उपकेंद्रावर विज पुरवठा होतो. मेहकर येथून सर्व केंद्रासाठी एकच लाईन असल्याने कोणत्याही क्षणी विज पुरवठा खंडीत होवू शकतो. १५ जून ते ११ जुलै पर्यंंंत सतत ८ ते ९ वेळा मेन लाईनवर बिघाड झाल्याने तब्बल २४-२४ तास विजपुरवठा खंडीत राहतो. ११ जुलै रोजी दुपारी २ वाजता गुंज ते वरोडी मध्ये एक पोल पावसाने पडला. साखरखेर्डासह सवडद, मोहाडी, राताळी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, गुंज, वरोडी, सावंगी भगत, गोरेगाव, उमनगाव, काटेपांग्री, बाळसमुद्र, दरेगाव, तांदूळवाडी ही गावे ३६ तासापासून अंधारात आहेत. स्थानिक कनिष्ठ अभियंता अतुल शेडगे यांचेशी दोन दिवसांपासून ग्राहकांनी संपर्क केला असता ते कोठेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे विज पुरवठा केंव्हा सुरळीत होईल, याचे प्रत्यक्ष उत्तर एकही कर्मचारी देत नाही. गेल्या ३६ तासापासून विज पुरवठा खंडीत आहे. या मुळे पिठाच्या गिरण्या, नळयोजना, प्रभावीत झाल्या आहेत.