शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातले सत्ता समीकरण ‘झेडपी’त जुळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 15:01 IST

जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचे नवे समिकरण समोर आल्यास अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औसुक्याचे ठरले आहे.

- सुधीर चेके पाटील  लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा तुर्तास सुटला असून मंत्रालयाची सूत्रे महाविकास आघाडीने हाती घेतली आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांकडे वळणार आहे. गतवेळी राज्यात भाजप-सेना युतीत असतानाही सत्ताधारी भाजपा आणि राष्टÑवादी काँग्रेस यांची जवळीक लपून राहीलेली नव्हती. तोच कित्ता जिल्हा परिषदेत गिरविण्यात आला. येथे शिवसेनेच्या पतनासाठी जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने राष्टÑवादीशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती. मात्र, आता राज्यात बदलेल्या राजकीय परिस्थितीनुसार जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचे नवे समिकरण समोर आल्यास अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औसुक्याचे ठरले आहे.जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिला, असे जाहीर झाले असल्याने सलग चौथ्यांदा जि. प. अध्यक्षपदी महिला विराजमान होणार आहे. एकूण ६० सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत आजरोजी भाजप २४, काँग्रेस १४, शिवसेना ९, राष्टÑवादी ९, भारिप-बमसं ३ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. यामध्ये भाजपाच्या माजी महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी आमदारकीची निवडणूक जिंकल्याने उंद्री जि. प. गटाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला असल्याने एक जागा रिक्त आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत सध्या एकूण ३२ महिला सदस्यांची संख्या आहे. या सदस्यांमधून अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असतानाच राज्यात शिवसेना-राष्टÑवादी व काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असल्याने त्याचधर्तीवर जिल्हा परिषदेतही सत्तांतराचे वारे वाहत आहे.गतवेळी राज्यात सत्ताधारी भाजपाने शिवसेनेच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली होती; मात्र सेना-भाजपातील तू-तू, मै-मै आणि भाजपाची राष्टÑवादी काँग्रेसशी असलेली जवळीक, याचे लोण जिल्हा परिषदेपर्यंत पोहचले होते. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या करिष्म्यामुळे जिल्हा परिषदेत ऐतिहासीक मुसंडी मारणाºया भाजपने ६० पैकी २४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर पारंपारीक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला दूर सारून राष्टÑवादीच्या टेकूवर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. मात्र, आता राज्यातील सत्तासमिकरण बदलेले आहे.राज्यात महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली असल्याने जिल्हा परिषदेतही काँग्रेस-शिवसेना आणि राष्टÑवादी असे नवे समिकरण समोर येण्याची शक्यता आहे. या समिकरणात जिल्हा परिषदेतील पक्षीय बलानुसार महाविकास आघाडीत काँग्रेसकडे सर्वाधिक १४ सदस्य संख्या असल्याने अध्यक्षपदावर काँग्रेसचा दावा अधिक राहणार आहे. तर राष्टÑवादी व शिवसेनेकडे समान संख्या असल्याने उपाध्यक्षपद अथवा बांधकाम सभापती सारख्या महत्वाचे पद पदरात पाडून घेण्याखेरीज शिवसेना व राष्टÑवादीला पर्याय नाही. असे असले तरी महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांचा डोळा अध्यक्षपदावरच राहणार असल्याने अध्यक्षपदाच्या घोडेबाजारात राज्यातील जुळून आलेल्या सत्तासमिकरणाचा जिल्हा परिषदेत कितपत निभाव लागतो, ही बाब रंजक ठरणार आहे.

राष्टÑवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाचीराज्यात गतवेळच्या भाजप-सेनेच्या सत्तास्थापनेत आणि यावेळच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्यामध्ये राष्टÑवादी काँग्रेसची भूमिका महत्वपूर्ण राहीली आहे. तशीच भूमिका जिल्हा परिषदेतही भाजप सत्तास्थापनेत राष्टÑवादीची ठरली होती. मात्र, आता राज्यात सत्तांतर झाले असल्याने त्याचे लोण जिल्हा परिषदेतही पोहचणार हे निश्चित मानले जात आहे. सत्ता स्थापन करताना महाविकास आघाडीत जास्त सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापण्याची संधी मिळेल. मात्र, येथेही राष्टÑवादी काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरणार असल्याने जर राष्टÑवादी काँग्रेसने अध्यक्षपदावर दावा ठोकला आणि त्यावर ठाम राहीली तर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा देखील राज्याच्या धर्तीवर नाटकीय वळणावर येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शिवसेना आणि काँग्रेस कोण्यात्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही, हे निश्चत असल्याने हे दोन्ही पक्ष नेमकी कोणती भूमिका घेणार हा प्रश्नही आहेच.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषदElectionनिवडणूक