शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यातले सत्ता समीकरण ‘झेडपी’त जुळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 15:01 IST

जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचे नवे समिकरण समोर आल्यास अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औसुक्याचे ठरले आहे.

- सुधीर चेके पाटील  लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा तुर्तास सुटला असून मंत्रालयाची सूत्रे महाविकास आघाडीने हाती घेतली आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांकडे वळणार आहे. गतवेळी राज्यात भाजप-सेना युतीत असतानाही सत्ताधारी भाजपा आणि राष्टÑवादी काँग्रेस यांची जवळीक लपून राहीलेली नव्हती. तोच कित्ता जिल्हा परिषदेत गिरविण्यात आला. येथे शिवसेनेच्या पतनासाठी जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने राष्टÑवादीशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती. मात्र, आता राज्यात बदलेल्या राजकीय परिस्थितीनुसार जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचे नवे समिकरण समोर आल्यास अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औसुक्याचे ठरले आहे.जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिला, असे जाहीर झाले असल्याने सलग चौथ्यांदा जि. प. अध्यक्षपदी महिला विराजमान होणार आहे. एकूण ६० सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत आजरोजी भाजप २४, काँग्रेस १४, शिवसेना ९, राष्टÑवादी ९, भारिप-बमसं ३ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. यामध्ये भाजपाच्या माजी महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी आमदारकीची निवडणूक जिंकल्याने उंद्री जि. प. गटाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला असल्याने एक जागा रिक्त आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत सध्या एकूण ३२ महिला सदस्यांची संख्या आहे. या सदस्यांमधून अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असतानाच राज्यात शिवसेना-राष्टÑवादी व काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असल्याने त्याचधर्तीवर जिल्हा परिषदेतही सत्तांतराचे वारे वाहत आहे.गतवेळी राज्यात सत्ताधारी भाजपाने शिवसेनेच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली होती; मात्र सेना-भाजपातील तू-तू, मै-मै आणि भाजपाची राष्टÑवादी काँग्रेसशी असलेली जवळीक, याचे लोण जिल्हा परिषदेपर्यंत पोहचले होते. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या करिष्म्यामुळे जिल्हा परिषदेत ऐतिहासीक मुसंडी मारणाºया भाजपने ६० पैकी २४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर पारंपारीक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला दूर सारून राष्टÑवादीच्या टेकूवर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. मात्र, आता राज्यातील सत्तासमिकरण बदलेले आहे.राज्यात महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली असल्याने जिल्हा परिषदेतही काँग्रेस-शिवसेना आणि राष्टÑवादी असे नवे समिकरण समोर येण्याची शक्यता आहे. या समिकरणात जिल्हा परिषदेतील पक्षीय बलानुसार महाविकास आघाडीत काँग्रेसकडे सर्वाधिक १४ सदस्य संख्या असल्याने अध्यक्षपदावर काँग्रेसचा दावा अधिक राहणार आहे. तर राष्टÑवादी व शिवसेनेकडे समान संख्या असल्याने उपाध्यक्षपद अथवा बांधकाम सभापती सारख्या महत्वाचे पद पदरात पाडून घेण्याखेरीज शिवसेना व राष्टÑवादीला पर्याय नाही. असे असले तरी महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांचा डोळा अध्यक्षपदावरच राहणार असल्याने अध्यक्षपदाच्या घोडेबाजारात राज्यातील जुळून आलेल्या सत्तासमिकरणाचा जिल्हा परिषदेत कितपत निभाव लागतो, ही बाब रंजक ठरणार आहे.

राष्टÑवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाचीराज्यात गतवेळच्या भाजप-सेनेच्या सत्तास्थापनेत आणि यावेळच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्यामध्ये राष्टÑवादी काँग्रेसची भूमिका महत्वपूर्ण राहीली आहे. तशीच भूमिका जिल्हा परिषदेतही भाजप सत्तास्थापनेत राष्टÑवादीची ठरली होती. मात्र, आता राज्यात सत्तांतर झाले असल्याने त्याचे लोण जिल्हा परिषदेतही पोहचणार हे निश्चित मानले जात आहे. सत्ता स्थापन करताना महाविकास आघाडीत जास्त सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापण्याची संधी मिळेल. मात्र, येथेही राष्टÑवादी काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरणार असल्याने जर राष्टÑवादी काँग्रेसने अध्यक्षपदावर दावा ठोकला आणि त्यावर ठाम राहीली तर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा देखील राज्याच्या धर्तीवर नाटकीय वळणावर येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शिवसेना आणि काँग्रेस कोण्यात्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही, हे निश्चत असल्याने हे दोन्ही पक्ष नेमकी कोणती भूमिका घेणार हा प्रश्नही आहेच.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषदElectionनिवडणूक