शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

दीड महिन्यापासून वीज गायब

By admin | Updated: November 14, 2014 00:17 IST

मेहकर तालुक्यातील रायपूर येथील प्रकार.

मेहकर (बुलडाणा) : तालुक्यातील रायपूर येथील शेतातील विद्युत रोहित्र गेल्या दीड महिन्यापासून जळालेले आहे. त्यामुळे शेतातील विद्युत पुरवठा खंडित असल्याने शेतकर्‍यांना रब्बी हंगामाला पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हा तचे पीक गेल्यामुळे शेतकर्‍यांच्या आता रब्बीकडे नजरा लागल्या आहेत. रब्बी िपकालाही पाण्याची अत्यंत आवश्यकता असून, त्यासाठी शेतकर्‍यांनी विहिरीवर कृषी पंप बसविलेले आहेत; परंतु शेतातील विद्युत रोहित्रच जळाल्याने तब्बल दीड महिन्यापासून शेतातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे येथे पाणी असूनही शेतीला पाणी देता येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. याकडे वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांचेही दुर्लक्ष आहे. पिकाला पाणी देता येत नसल्याने शेतातील तूर, हळद, बटाटा व भाजीपाल्याचे पीक धोक्यात आले आहे. पाण्याअभावी हळदीचे पीक तर पुर्णपणे सुकलेले आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याबरोबर गुरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देऊन येथे त्वरित विद्युत रोहित्र बसवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.