शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

भाजीपाला पिकांवर ‘पावडरी मिल्ड्यू’ रोगाचे थैमान; भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात

By विवेक चांदुरकर | Updated: February 3, 2024 19:05 IST

सध्या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकावर ‘पावडरी मिल्ड्यू’ भूरी रोगाचा प्रादुर्भााव झाला आहे.

खामगाव: सध्या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकावर ‘पावडरी मिल्ड्यू’ भूरी रोगाचा प्रादुर्भााव झाला आहे. या रोगामुळे पानगळ होत असून, लाखो रूपये खर्चून पेरणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. खामगाव तालुक्यात रब्बी हंगामात ३३ हजार ८४८ हक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कांद्याची ३६८३ तर भाजीपाल्याची ११२६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. रात्री उच्च सापेक्ष आद्रता व दिवसा कमी सापेक्ष आद्रता तसेच २२ ते ३० डिग्री सेल्सीअस तापमान असे पाेषक वातावरण असल्याने या रोगाचा प्रसार वाढला आहे. यामुळे झाडांची पानगळ होत आहे. झाडांची संपूर्ण पाने गळून पडत असून, झाडे सुकत आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शेतकरी फवारणी करीत आहेत. मात्र, फवारणी केल्यावरही पानगळ सुरूच आहे. रोगाची लक्षणेया रोगाचा प्रादुर्भाव झाला तर मिरचीच्या पानांच्या वरच्या बाजुस पिवळसर डाग पडतात. रोगाच्या नंतरच्या काळात पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी पांढरी बुरशी वाढते व नंतर पृष्ठभागावर पसरल्यामुळे प्रकाश संष्लेशन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होवून पाने व फुले गळून पडतात.  पिकांवर सध्या भूरी रोग आला आहे. या रोगामुळे पानगळ होत आहे. फवारणी केल्यावरही झाडांची पाने गळून पडत आहे. शेंड्यापर्यंत झाडांची पाने गळून पडत असून केवळ खोडच शिल्लक राहत आहे. त्यामुळे झाड सुकत आहे. - दीपक हागे, शेतकरी, वानखेड झाडांचे नियमित निरिक्षण केल्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव निदर्शनास आल्यावर सल्फर ८० टक्के डब्ल्यू पी २५ ग्रॅम किंवा अझोक्सा ट्रोबिन २३ एस. सी. अधिक १० मिली अॅमीटर, संयुक्त बुरशीनाशके जसे झोक्सास्ट्रोबिन ११ टक्के अधिक टेबूकोनाझोटल १८.३ टक्के एस बी किंवा १० मिली टेब्यूकोनाझोल १८.३ टक्के अधिक सल्फर ६५ टक्के डब्ल्यूजी २५ ग्रॅम याची फवारणी करावी. - अनिल तु. गाभणे, पीक संरक्षण तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद

टॅग्स :buldhanaबुलडाणा