शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भाजीपाला पिकांवर ‘पावडरी मिल्ड्यू’ रोगाचे थैमान; भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात

By विवेक चांदुरकर | Updated: February 3, 2024 19:05 IST

सध्या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकावर ‘पावडरी मिल्ड्यू’ भूरी रोगाचा प्रादुर्भााव झाला आहे.

खामगाव: सध्या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकावर ‘पावडरी मिल्ड्यू’ भूरी रोगाचा प्रादुर्भााव झाला आहे. या रोगामुळे पानगळ होत असून, लाखो रूपये खर्चून पेरणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. खामगाव तालुक्यात रब्बी हंगामात ३३ हजार ८४८ हक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कांद्याची ३६८३ तर भाजीपाल्याची ११२६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. रात्री उच्च सापेक्ष आद्रता व दिवसा कमी सापेक्ष आद्रता तसेच २२ ते ३० डिग्री सेल्सीअस तापमान असे पाेषक वातावरण असल्याने या रोगाचा प्रसार वाढला आहे. यामुळे झाडांची पानगळ होत आहे. झाडांची संपूर्ण पाने गळून पडत असून, झाडे सुकत आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शेतकरी फवारणी करीत आहेत. मात्र, फवारणी केल्यावरही पानगळ सुरूच आहे. रोगाची लक्षणेया रोगाचा प्रादुर्भाव झाला तर मिरचीच्या पानांच्या वरच्या बाजुस पिवळसर डाग पडतात. रोगाच्या नंतरच्या काळात पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी पांढरी बुरशी वाढते व नंतर पृष्ठभागावर पसरल्यामुळे प्रकाश संष्लेशन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होवून पाने व फुले गळून पडतात.  पिकांवर सध्या भूरी रोग आला आहे. या रोगामुळे पानगळ होत आहे. फवारणी केल्यावरही झाडांची पाने गळून पडत आहे. शेंड्यापर्यंत झाडांची पाने गळून पडत असून केवळ खोडच शिल्लक राहत आहे. त्यामुळे झाड सुकत आहे. - दीपक हागे, शेतकरी, वानखेड झाडांचे नियमित निरिक्षण केल्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव निदर्शनास आल्यावर सल्फर ८० टक्के डब्ल्यू पी २५ ग्रॅम किंवा अझोक्सा ट्रोबिन २३ एस. सी. अधिक १० मिली अॅमीटर, संयुक्त बुरशीनाशके जसे झोक्सास्ट्रोबिन ११ टक्के अधिक टेबूकोनाझोटल १८.३ टक्के एस बी किंवा १० मिली टेब्यूकोनाझोल १८.३ टक्के अधिक सल्फर ६५ टक्के डब्ल्यूजी २५ ग्रॅम याची फवारणी करावी. - अनिल तु. गाभणे, पीक संरक्षण तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद

टॅग्स :buldhanaबुलडाणा