शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

स्थगिती उठवली, १४ ऑगस्टपर्यंत होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 11:04 IST

Khamgaon News : चालू वर्षात २०२१-२२ मध्ये १५ टक्के बदल्या करण्यास १४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

खामगाव : कोरोना काळात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ््यांच्या बदली प्रक्रीयेला ३० जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ती शुक्रवारी उठवण्यात आली. तसेच १४ आँगस्टपर्यंत बदली प्रक्रीया पूर्ण करावी, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदल्या करता येणार नाही, असे सामान्य प्रशासन विभागाने ९ जुलै रोजीच्या शासन निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राज्यात दरवर्षी अधिकारी-कर्मचाऱ््यांच्या बदल्या एप्रिल व मे महिन्यात केल्या जातात. त्यानुसार १० मे रोजी नियमित बदली प्रक्रीयेला स्थगिती दिल्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिला होता. दरम्यान, बदली प्रक्रीयेबाबत मार्गदर्शक सूचना देण्याचेही शासनाने ठरवले होते. त्यानुसार ९ जुलै रोजी या विभागाने बदली प्रक्रीयेच्या धोरणाबाबत आदेश दिला. चालू वर्षात २०२१-२२ मध्ये १५ टक्के बदल्या करण्यास १४ आँगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदल्या करता येणार नाहीत, असेही नमूद केले आहे.सोबतच मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. त्यामध्ये बदली खर्चावर मर्यादा ठेवण्यासाठी १५ टक्केचे बंधन पाळण्याचे म्हटले आहे. सोबतच संबंधित पदावर कालावधी पूर्ण झालेल्या पात्र अधिकारी-कर्मचाऱ््यांची प्राधान्याने बदली केली जाणार आहे. सर्वसाधारण बदल्यांची कारवाई ३१ जुलैपर्यंत केली जाणार आहे. ती प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतरच रिक्त पदांवर बदली प्रक्रीया सुरू होणार आहे. विशेष कारणास्तव बदल्या १ आँगस्ट ते १४ आँगस्ट या कालावधीत होणार आहेत. विशेष बदल्या एकुण कार्यरत पदांच्या १० टक्के एवढ्या कराव्या, असेही निर्देश दिले आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावGovernmentसरकार