शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

By admin | Updated: May 25, 2017 00:50 IST

जामोद : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षीही कांद्याला भाव नसल्याने उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त आल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजामोद : दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच शेतकरी त्रस्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षीही कांद्याला भाव नसल्याने उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त आल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरात रब्बी हंगामामध्ये नगदी पीक म्हणून कांद्याची लागवड करण्यात येते. कांदा लागवडीला शेत तयार करण्यापासून तर कांदा काढणीपर्यंत जवळपास ४६ हजार ८०० रुपये खर्च येतो. खर्चाचा हिशेब केला असतानांगरणी ८०० रुपये, शेत सपाट करणे ५०० रुपये, सरी काढणे ५०० रुपये, कांद्याची रोपे तयार करणे १० हजार रुपये, कांदा लागवड खर्च ७ हजार रुपये, रासायनिक खत दोन वेळा ४ हजार रुपये, कांदा फवारणी ६ हजार रुपये, निंदन ५ हजार रुपये, पाणी देणे ३ हजार रुपये, कांदा काढणी १० हजार रुपये असा एका एकराला एकूण ४६ हजार ८०० रुपये खर्च आला; मात्र आज रोजी कांद्याची प्रत पाहून २५० ते ३२५ रुपये प्रति क्विंटल भाव सुरू आहे. कांदा पिकावर ३५ ते ४० हजार रुपयांचे एकरी उत्पन्न मिळत आहे. एकंदरीत जमा-खर्चाचा ताळमेळ केला असता, उत्पन्नापेक्षा ८ ते १० हजार रुपये खर्च जास्त झाला. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करता, कांदा पिकाला योग्य भाव देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.; मात्र कांद्याच्या कमी भावामुळे तोटा सहन करावा लागला. शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव नाही. शिवाय वारंवार येत असलेली अस्मानी संकटे व निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.यंदा दोन एकर कांद्याची लागवड केली होती. एकुण मिळालेले उत्पन्नापेक्षा १८ ते २० हजार रूपये खर्च जास्त झाला.- अनंता लक्ष्मण ताडे, शेतकरी जामोद.