शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

By admin | Updated: May 25, 2017 00:50 IST

जामोद : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षीही कांद्याला भाव नसल्याने उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त आल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजामोद : दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच शेतकरी त्रस्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षीही कांद्याला भाव नसल्याने उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त आल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरात रब्बी हंगामामध्ये नगदी पीक म्हणून कांद्याची लागवड करण्यात येते. कांदा लागवडीला शेत तयार करण्यापासून तर कांदा काढणीपर्यंत जवळपास ४६ हजार ८०० रुपये खर्च येतो. खर्चाचा हिशेब केला असतानांगरणी ८०० रुपये, शेत सपाट करणे ५०० रुपये, सरी काढणे ५०० रुपये, कांद्याची रोपे तयार करणे १० हजार रुपये, कांदा लागवड खर्च ७ हजार रुपये, रासायनिक खत दोन वेळा ४ हजार रुपये, कांदा फवारणी ६ हजार रुपये, निंदन ५ हजार रुपये, पाणी देणे ३ हजार रुपये, कांदा काढणी १० हजार रुपये असा एका एकराला एकूण ४६ हजार ८०० रुपये खर्च आला; मात्र आज रोजी कांद्याची प्रत पाहून २५० ते ३२५ रुपये प्रति क्विंटल भाव सुरू आहे. कांदा पिकावर ३५ ते ४० हजार रुपयांचे एकरी उत्पन्न मिळत आहे. एकंदरीत जमा-खर्चाचा ताळमेळ केला असता, उत्पन्नापेक्षा ८ ते १० हजार रुपये खर्च जास्त झाला. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करता, कांदा पिकाला योग्य भाव देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.; मात्र कांद्याच्या कमी भावामुळे तोटा सहन करावा लागला. शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव नाही. शिवाय वारंवार येत असलेली अस्मानी संकटे व निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.यंदा दोन एकर कांद्याची लागवड केली होती. एकुण मिळालेले उत्पन्नापेक्षा १८ ते २० हजार रूपये खर्च जास्त झाला.- अनंता लक्ष्मण ताडे, शेतकरी जामोद.