शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

दे.राजात पाण्याचे राजकारण पेटले!

By admin | Updated: February 8, 2016 02:21 IST

२0 फेब्रुवारीपासून नियमित पाणीपुरवठा करण्याची आमदार, नगराध्यक्षांची ग्वाही; भाजप आंदोलनाचा पवित्रा.

अर्जुनकुमार आंधळे ल्ल देऊळगावराजा: मानवी जीवनात पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच पाण्यावरून जेव्हा राजकारण सुरू होते तेव्हा राजकीय सारीपाटावर मोठी रंगत येते. पाण्यात राजकीय रंग मिसळून श्रेय मिळवण्यासाठीची होणारी धडपड सध्या देऊळगावराजा शहरातील राजकारणाच्या ऐरणीवर आहे. जालना जिल्ह्यातील पीरकल्याण व शिराळा आणि देऊळगावराजा जवळच्या सावखेड भोई या तीन तलावांवरून शहराला पूर्वीपासून पाणीपुरवठा केला जातो. सलग दोन ते तीन वर्षांंंपासून पावसाचे प्रमाण सातत्याने कमी होत गेल्याने उन्हाळ्यात सोडा, ऐन डिसेंबर-जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईचे भीषण संकट शहरवासीयांच्या नशिबी आले, तर नगरपालिका प्रशासनासमोर प्रचंड आव्हान उभे राहिले. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी खडकपूर्णा धरणावरून १३ कि.मी. लांबीची पाइप लाइन मंजूर झाली. तथापि, तत्कालीन कंत्राटदारांच्या असहकार्यामुळे काम रखडत गेले. येणारे पाच महिने पाणीटंचाईमुक्त व्हावे, यासाठी आ.डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष मालती कायंदे यांनी पाइप लाइनचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. आ.डॉ. खेडेकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी लावून धरीत शर्थीचे प्रयत्न केले. नगराध्यक्ष मालती कायंदे यांनीही जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्या पातळीवर हा प्रश्न लावून धरला. त्याचेच फलीत म्हणून खडकपूर्णा धरणावरून येणार्‍या पाइप लाइनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या २0 फेब्रुवारीपासून शहराला नियमित पाणीपुरवठा होण्याचे संकेत आ.डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष कायंदे यांनी शहरवासीयांना दिले आहेत. त्यानुषंगाने शनिवारी पाणीटंचाईसंदर्भात तातडीची सभा पार पडली. त्यामध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. रविवारी सकाळपासून शहराच्या विविध भागात सात टँकर नगरपालिकेने सुरू केले. एकीकडे हे वास्तव असताना पाणीप्रश्नावरून शहराच्या राजकीय सारीपाटावर चांगलेच रंग उधळले गेले आहेत. आमदार शिवसेनेचे, नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात, राज्यात सत्ताधारी असलेली भारतीय जनता पार्टी मंगळवारी भव्य पाणी मोर्चा काढतेय, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पाण्यासंदर्भात आमदारांवर आरोप करतात. याच प्रश्नांवर पालकमंत्र्यासोबत एकही बैठक न घेता थेट पाणी मोर्चा, तेही सत्ता हाती असताना, हे एक कोडेच आहे.