शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दे.राजात पाण्याचे राजकारण पेटले!

By admin | Updated: February 8, 2016 02:21 IST

२0 फेब्रुवारीपासून नियमित पाणीपुरवठा करण्याची आमदार, नगराध्यक्षांची ग्वाही; भाजप आंदोलनाचा पवित्रा.

अर्जुनकुमार आंधळे ल्ल देऊळगावराजा: मानवी जीवनात पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच पाण्यावरून जेव्हा राजकारण सुरू होते तेव्हा राजकीय सारीपाटावर मोठी रंगत येते. पाण्यात राजकीय रंग मिसळून श्रेय मिळवण्यासाठीची होणारी धडपड सध्या देऊळगावराजा शहरातील राजकारणाच्या ऐरणीवर आहे. जालना जिल्ह्यातील पीरकल्याण व शिराळा आणि देऊळगावराजा जवळच्या सावखेड भोई या तीन तलावांवरून शहराला पूर्वीपासून पाणीपुरवठा केला जातो. सलग दोन ते तीन वर्षांंंपासून पावसाचे प्रमाण सातत्याने कमी होत गेल्याने उन्हाळ्यात सोडा, ऐन डिसेंबर-जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईचे भीषण संकट शहरवासीयांच्या नशिबी आले, तर नगरपालिका प्रशासनासमोर प्रचंड आव्हान उभे राहिले. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी खडकपूर्णा धरणावरून १३ कि.मी. लांबीची पाइप लाइन मंजूर झाली. तथापि, तत्कालीन कंत्राटदारांच्या असहकार्यामुळे काम रखडत गेले. येणारे पाच महिने पाणीटंचाईमुक्त व्हावे, यासाठी आ.डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष मालती कायंदे यांनी पाइप लाइनचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. आ.डॉ. खेडेकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी लावून धरीत शर्थीचे प्रयत्न केले. नगराध्यक्ष मालती कायंदे यांनीही जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्या पातळीवर हा प्रश्न लावून धरला. त्याचेच फलीत म्हणून खडकपूर्णा धरणावरून येणार्‍या पाइप लाइनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या २0 फेब्रुवारीपासून शहराला नियमित पाणीपुरवठा होण्याचे संकेत आ.डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष कायंदे यांनी शहरवासीयांना दिले आहेत. त्यानुषंगाने शनिवारी पाणीटंचाईसंदर्भात तातडीची सभा पार पडली. त्यामध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. रविवारी सकाळपासून शहराच्या विविध भागात सात टँकर नगरपालिकेने सुरू केले. एकीकडे हे वास्तव असताना पाणीप्रश्नावरून शहराच्या राजकीय सारीपाटावर चांगलेच रंग उधळले गेले आहेत. आमदार शिवसेनेचे, नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात, राज्यात सत्ताधारी असलेली भारतीय जनता पार्टी मंगळवारी भव्य पाणी मोर्चा काढतेय, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पाण्यासंदर्भात आमदारांवर आरोप करतात. याच प्रश्नांवर पालकमंत्र्यासोबत एकही बैठक न घेता थेट पाणी मोर्चा, तेही सत्ता हाती असताना, हे एक कोडेच आहे.