शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

राजकारणामुळे अंगणवाडी इमारतींचे बांधकाम रखडले!

By admin | Updated: July 11, 2017 00:45 IST

पंचायत समितीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ग्रामीण भागातील गोर-गरिबांच्या घरची चिमुकली शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत ग्रामीण भागात अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. अंगणवाडीच्या इमारत बांधकामासाठी शासन लाखो रुपये देत आहे; मात्र स्थानिक ग्रामपंचायत व राजकारणामुळे इमारत बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात असून, जवळपास ७० टक्के अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सन २०१५-१६ यावर्षी ग्रामीण भागात १६६ अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली होती. प्रत्येक इमारतीसाठी पंचायत समितीमार्फत सहा लाख रुपये निधी शासनाकडून देण्यात येतो; परंतु अनेक ग्रामपंचायतीने अंगणवाडीच्या इमारतीसाठी पाठपुरावा केला नाही, तसेच संबंधित पंचायत समितीनेही अंगणवाडीची इमारत बांधकामाचा प्रस्ताव पाठविला की नाही, संबंधित ग्रामपंचायतीची काय अडचण आहे, याबाबत माहिती घेतली नाही, त्यामुळे १६६ पैकी फक्त ४९ अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यात बुलडाणा तालुक्यातील ५१ पैकी १८ इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. चिखली १९ पैकी १० पूर्ण, मेहकर १७ पैकी ४ पूर्ण, मोताळा १३ पैकी ७ पूर्ण, मलकापूर १२ पैकी २ पूर्ण, नांदुरा ८ पैकी ३ पूर्ण, खामगाव २२ पैकी २ पूर्ण, शेगाव ४ पैकी ०, जळगाव जामोद ६ पैकी १ पूर्ण, संग्रामपूर ७ पैकी ०, देऊळगाव राजा ६ पैकी १ पूर्ण व सिंदखेड राजा तालुक्यात १ पैकी १ इमारतीचे काम पूर्ण झाले असून, एकूण १६६ पैकी ४९ म्हणजे ३० टक्के इमारतीचे काम पूर्ण झाले असून, ७० टक्के अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याचे दिसून येते. यावर्षी सन २०१६-१७ यावर्षीही १६६ अंगणवाडीच्या इमारतीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे संबंधित पंचायत समिती व ग्रामपंचायतीने इमारत बांधकामासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.राजकारणाचा फटकाअंगणवाडी बांधकामासाठी संबंधित ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवून इमारत बांधकामासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे; मात्र अनेक ठिकाणी राजकारण आडवे येत असल्याचे दिसून येते. अंगणवाडी इमारतीसाठी निधी अल्प असल्यामुळे, इमारत बांधल्यानंतर काही शिल्लक राहत नसल्यामुळे तसेच तक्रारी दूर करताना त्रास होत असल्यामुळे अनेक पदाधिकारी अंगणवाडी इमारत बांधकामाकडे दुर्लक्ष करीत असून, जादा निधीच्या कामांकडे लक्ष देत असल्याचे दिसून येते.गावाच्या फायद्यासाठी अंगणवाडी इमारत बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.-सुनील मेहसरे, उपमुकाअ, महिला व बालकल्याण विभाग, जि.प.बुलडाणा.