शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

लसीकरण केंद्रांवर पोलीस बंदोबस्त द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:37 IST

बुलडाणा : लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सदेखील पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. सोबतच ...

बुलडाणा : लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सदेखील पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. सोबतच लसीकरण केंद्रांवरील डॉक्टरांशी वाद घालण्याचे प्रकारदेखील समोर आले आहेत़ कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून लसीकरण केंद्रांवर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्षा कमलताई जालिंदर बुधवत यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात नमूद आहे की, कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून तिसऱ्या लाटेचा धोकादेखील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. गतवर्षीपासून आतापर्यंत सुमारे ७० हजार रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात बाधित झाले असून त्यात ६४ हजारांवर बरे होऊन घरीदेखील परतले आहेत. तर, आतापर्यंत ४६० जण दुर्दैवाने दगावले आहेत. लसीकरणासाठी शासन आग्रही असून नागरिकांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत लसींचा पुरवठा कमी होत असल्याने लसीकरण केंद्रांवर तुटवडा निर्माण होतो आहे. त्यातच नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रांवर होत आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर रुग्णालये अशी तब्बल ७२ लसीकरण केंद्रे आहेत. या लसीकरण केंद्रांवर डॉक्टर व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी वाद घालण्याचे प्रकारसुद्धा समोर आले असून गर्दीतील काही विघ्नसंतोषी डॉक्टरांशी हुज्जत घालून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. त्यामुळे डॉक्टर आणि लसीकरण केंद्रावरील एकूणच प्रशासकीय व्यवस्था दडपणात आली आहे. करिता प्रत्येक लसीकरण केंद्रांवर पोलीस बंदोबस्त (महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह) देण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही बाब अतिशय महत्त्वाची असून याबाबत तत्काळ पोलीस विभागाला आदेश व्हावेत, अशी मागणी जि.प. उपाध्यक्षा कमलताई जालिंदर बुधवत यांनी केली आहे.

नागरिकांनी संयम पाळावा

कोरोनाविरुद्ध युद्ध आपल्याला प्रत्येकाला लढून जिंकायचे आहे. यासाठी लस घेणे आवश्यकच आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दीदेखील आपल्याला टाळायची आहे. ऑनलाइन स्वरूपात नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन विहित वेळेत लस घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. यासाठी संयम पाळून कोरोनायोद्धे असलेल्या डॉक्टरांना सहकार्य करावे, अशी विनंतीदेखील जिल्हा परिषद उपाध्यक्षा कमलताई जालिंदर बुधवत यांनी नागरिकांना केली आहे.