शहरं
Join us  
Trending Stories
1
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
2
७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; इंजिनिअरला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल
3
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावाचे स्टँड काढून टाकण्याचे आदेश
4
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
5
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
6
एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले
7
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
8
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
9
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
10
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
11
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
12
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
13
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
14
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
15
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
16
प्रेमाने ‘किसन’ अशी हाक मारणारे कमी झाले, पण दाराबाहेर चपला हीच श्रीमंती!
17
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
18
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
19
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
20
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता

वनविभागाच्या कायद्यात अडकला पिंपळडोह किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 18:50 IST

Pimpaldoh fort stuck in forest department law : पर्यटक व अभ्यासकांना किल्ल्यावर जाण्याकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- विवेक चांदूरकरखामगाव : अंबाबरवा अभयारण्यात वसाली गावाजवळ डोंगरावर पिंपळडोह किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यास वनविभागाने बंदी घातली असून, वरिष्ठ स्तरावरून परवागनी घ्यावी लागते. त्यामुळे पर्यटक व अभ्यासकांना किल्ल्यावर जाण्याकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुलडाणा जिल्ह्यात मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या घनदाट अंबाबरवा अभयारण्यात वसाली या गावापासून चार ते पाच किमी अंतरावर पिंपळडोह किल्ल्याचे अवशेष बघायला मिळतात़ आता बरीच पडझड झाली आहे़ येथे केवळ अवशेषच शिल्लक असून, हे अवशेष समृद्घ अशा इतिहासाची साक्ष देतात़ या अवशेषांवरून येथे कधी हजारो लोकांचा राबता असावा, राज्य असावे, राज्यकर्ते असावे व प्रजाही नांदत असावी हे निदर्शनास येते़ पूरातन वास्तूंबाबत असलेल्या शासनाच्या उदासिन धोरणामुळे या किल्ल्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे़ या किल्ल्याबद्दल फारसी माहिती नसून, इतिहास दडलेला आहे़ या ठिकाणी पिंपळाचे झाडे आहेत तसेच डोह असल्यामुळे या किल्ल्याला पिंपळडोह म्हणतात. हा किल्ला मध्यप्रदेशातील सत्ताधीशांच्या ताब्यात असल्यामुळे याचा फारसा इतिहास पुढे आला नाही. येथील राजा सिताब खॉ याने सुरूवातीला पिंपळडोह येथे वास्तव्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती तसेच अन्य अडचणींमुळे अखेर ते भिंगारा येथे वास्तव्यास आले व महाल बांधला, असा उल्लेखही काही पुस्तकांमध्ये आहे. बुलडाणा जिल्ह्यात मध्यप्रदेशच्या सीमेवर घनदाट असे अंबाबरवा अभयारण्य आहे़ वाघ, बिबट, अस्वल या हिंस्त्र पशूंसह अनेक प्राणी येथे वास करतात़ या अभयारण्यात डोंगराच्या पायथ्याशी वसाली हे गाव वसले आहे़ या गावापासून दोन किमी अंतरावर बंदरझिरा म्हणून एक ठिकाण आहे़ येथून तीन ते चार किमी अंतरावर डोंगरावर एक किल्ला आहे़ येथे वाहनांना जाण्यासाठी रस्ता नाही़ बंदरझिरापासून येथे पायीच जावे लागते़ किल्ल्याच्या रस्त्याने जातानाच आपल्याला दगडी खांब, हत्ती, सिंहाची शिल्प असलेले दगड पडलेले दिसतात़ एका दगडावर दोन पादुका कोरल्या असून, हा दगड रस्त्याच्या कडेला पडलेला आहे़ डोंगरावरील वरच्या भागात किल्ल्याचे प्रवेशव्दार आहे़ प्रवेशव्दाराचे बांधकाम दगड आणि विटांनी केलेले आहे़ या प्रवेशव्दारात सैनिक राहत होते़ तशाप्रकारे तेथे चौक्याही आहेत़ प्रवेशव्दारातून आतमध्ये गेल्यावर दोन तळे आहेत़ पावसाळयात यामध्ये पाणी असते, उन्हाळयात तळे सुकतात़ या तळयांचे बांधकामही दगडांनी केले आहे़ किल्ल्यातील रहिवाशांसाठी ही तळे बांधण्यात आली असावी़ आतमध्ये ठिकठिकाणी पडलेल्या खोल्यांचे अवशेष दिसतात़ मागच्या बाजुने परकोट आहे, तो ही आता ढासळत आहे़या किल्ल्याचे बांधकाम नेमके केव्हा झाले याबाबत माहिती नाही़ ऐतिहासिक वास्तू या नवतरूणांसाठी प्रेरणादायी असतात. जो देश इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, असे म्हणतात़ त्यामुळे किल्ल्यांचे जतन होणे गरजेचे आहे़ वसालीचा किल्ला एक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येवू शकतो, ट्रेकिंग करणाºयांसाठी हा उत्तम किल्ला आहे़ याकडे लक्ष देण्याची गरज आहे़
टॅग्स :khamgaonखामगावforest departmentवनविभाग