शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

वनविभागाच्या कायद्यात अडकला पिंपळडोह किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 18:50 IST

Pimpaldoh fort stuck in forest department law : पर्यटक व अभ्यासकांना किल्ल्यावर जाण्याकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- विवेक चांदूरकरखामगाव : अंबाबरवा अभयारण्यात वसाली गावाजवळ डोंगरावर पिंपळडोह किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यास वनविभागाने बंदी घातली असून, वरिष्ठ स्तरावरून परवागनी घ्यावी लागते. त्यामुळे पर्यटक व अभ्यासकांना किल्ल्यावर जाण्याकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुलडाणा जिल्ह्यात मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या घनदाट अंबाबरवा अभयारण्यात वसाली या गावापासून चार ते पाच किमी अंतरावर पिंपळडोह किल्ल्याचे अवशेष बघायला मिळतात़ आता बरीच पडझड झाली आहे़ येथे केवळ अवशेषच शिल्लक असून, हे अवशेष समृद्घ अशा इतिहासाची साक्ष देतात़ या अवशेषांवरून येथे कधी हजारो लोकांचा राबता असावा, राज्य असावे, राज्यकर्ते असावे व प्रजाही नांदत असावी हे निदर्शनास येते़ पूरातन वास्तूंबाबत असलेल्या शासनाच्या उदासिन धोरणामुळे या किल्ल्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे़ या किल्ल्याबद्दल फारसी माहिती नसून, इतिहास दडलेला आहे़ या ठिकाणी पिंपळाचे झाडे आहेत तसेच डोह असल्यामुळे या किल्ल्याला पिंपळडोह म्हणतात. हा किल्ला मध्यप्रदेशातील सत्ताधीशांच्या ताब्यात असल्यामुळे याचा फारसा इतिहास पुढे आला नाही. येथील राजा सिताब खॉ याने सुरूवातीला पिंपळडोह येथे वास्तव्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती तसेच अन्य अडचणींमुळे अखेर ते भिंगारा येथे वास्तव्यास आले व महाल बांधला, असा उल्लेखही काही पुस्तकांमध्ये आहे. बुलडाणा जिल्ह्यात मध्यप्रदेशच्या सीमेवर घनदाट असे अंबाबरवा अभयारण्य आहे़ वाघ, बिबट, अस्वल या हिंस्त्र पशूंसह अनेक प्राणी येथे वास करतात़ या अभयारण्यात डोंगराच्या पायथ्याशी वसाली हे गाव वसले आहे़ या गावापासून दोन किमी अंतरावर बंदरझिरा म्हणून एक ठिकाण आहे़ येथून तीन ते चार किमी अंतरावर डोंगरावर एक किल्ला आहे़ येथे वाहनांना जाण्यासाठी रस्ता नाही़ बंदरझिरापासून येथे पायीच जावे लागते़ किल्ल्याच्या रस्त्याने जातानाच आपल्याला दगडी खांब, हत्ती, सिंहाची शिल्प असलेले दगड पडलेले दिसतात़ एका दगडावर दोन पादुका कोरल्या असून, हा दगड रस्त्याच्या कडेला पडलेला आहे़ डोंगरावरील वरच्या भागात किल्ल्याचे प्रवेशव्दार आहे़ प्रवेशव्दाराचे बांधकाम दगड आणि विटांनी केलेले आहे़ या प्रवेशव्दारात सैनिक राहत होते़ तशाप्रकारे तेथे चौक्याही आहेत़ प्रवेशव्दारातून आतमध्ये गेल्यावर दोन तळे आहेत़ पावसाळयात यामध्ये पाणी असते, उन्हाळयात तळे सुकतात़ या तळयांचे बांधकामही दगडांनी केले आहे़ किल्ल्यातील रहिवाशांसाठी ही तळे बांधण्यात आली असावी़ आतमध्ये ठिकठिकाणी पडलेल्या खोल्यांचे अवशेष दिसतात़ मागच्या बाजुने परकोट आहे, तो ही आता ढासळत आहे़या किल्ल्याचे बांधकाम नेमके केव्हा झाले याबाबत माहिती नाही़ ऐतिहासिक वास्तू या नवतरूणांसाठी प्रेरणादायी असतात. जो देश इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, असे म्हणतात़ त्यामुळे किल्ल्यांचे जतन होणे गरजेचे आहे़ वसालीचा किल्ला एक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येवू शकतो, ट्रेकिंग करणाºयांसाठी हा उत्तम किल्ला आहे़ याकडे लक्ष देण्याची गरज आहे़
टॅग्स :khamgaonखामगावforest departmentवनविभाग