शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 23:52 IST

गाव पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर फार्मसिस्ट हा महत्वाचा घटक बनला आहे. डॉक्टरांच्याच इतके फार्मसिस्टला महत्व आले आहे. त्यामुळे फार्मसिच्या अभ्यासक्रमाला अलिकडच्या काळात अधिक महत्व आले.

ठळक मुद्देजागतिक फार्मसिस्ट डे : अरुण पाटील यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : गाव पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर फार्मसिस्ट हा महत्वाचा घटक बनला आहे. डॉक्टरांच्याच इतके फार्मसिस्टला महत्व आले आहे. त्यामुळे फार्मसिच्या अभ्यासक्रमाला अलिकडच्या काळात अधिक महत्व आले. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी, एकाग्रतेने मन लावून अभ्यास करावा. प्रयत्नांती यश मिळतेच. भविष्यात निराश न होता विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे अधिक लक्ष द्यावे, असे प्रतिपादन किशोरीताई भोयर कॉलेज आॅफ फार्मसी कामठी येथील अधिव्याख्याता डॉ. अरुण पाटील यांनी केले.डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, वैनगंगा शैक्षणिक परिसर येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड फार्मसिस्ट डे कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील डीपारमेंट फार्मास्यटीकल सांयन्सचे प्रो. डॉ. प्रफुल्ल सावळे, भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उके, जि.प. भंडारा चीफ फार्मसी अधिकारी प्रभाकर कळंबे, जिल्हा सामान्य रूग्णालय मुख्य फार्मसी अधिकारी अरविंद बावनकर, साकोली तालुका औषध विक्री संघटनेचे वरिष्ठ सदस्य शरद गुप्ता, एलएमसी सदस्य लोकनाथ नवखरे आणि बाजीराव करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी साकोलीचे प्राचार्य डॉ. दामोदर गौपाले, कार्यक्रम समन्वयक तुळसीदास निंबेकर उपस्थित होते.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स स्पर्धा, रक्तदान शिबिर, नागरिकांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणीसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय फार्मसी विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्येची देवता शारदा या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी मान्यवरांचे हस्ते वैज्ञानिक संशोधक पुस्तकाचे विमोचन करण्यात आले तर तालुक्यातील उत्कृष्ट फार्मेसिस्ट म्हणून गोंडउमरी येथील नितीन वेगड, साकोली येथील प्रकाश गजापुरे, उत्कृष्ठ फार्मसी अधिकारी म्हणून खांबा पीएससीचे सचिन रिनाईत, एकोडी पीएचसीचे सुधांशू नोरे आणि महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी श्वेता जवंजाळ, तन्मयी हटवार, सुधीर कटरे, सागर पाजनकर या सर्वांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.सदर कार्यक्रमात स्थानिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह, आमगाव, देवरी, वरठी, कामठी आणि बिलासूपर येथील फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दामोधर गौपाले यांनी केले. संचालन पूजा हेमणे, काजल लिल्हारे यांनी केले. तर आभार प्रा. अनिल साव यांनी मानले. सदर कार्यक्रम बाजीरावजी करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी, साकोली तालुका केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगीस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र फार्मसी आॅफिर्सस असोसिएशन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.