शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

कळसूबाईच्या शिखरावर फडकविला बुलडाण्याच्या समाधानने तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:30 IST

बुलडाणा जिल्ह्यातील शिंदी येथील समाधान बंगाळे हा एका पायाने दिव्यांग आहे. शिव ऊर्जा प्रतिष्ठान औरंगाबाद संस्थेचे ...

बुलडाणा जिल्ह्यातील शिंदी येथील समाधान बंगाळे हा एका पायाने दिव्यांग आहे. शिव ऊर्जा प्रतिष्ठान औरंगाबाद संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी संस्थेच्या वतीने दिव्यांगासाठी ही मोहीम आयोजित केली होती. गाडे हे स्वतः दिव्यांग असून दिव्यांगांच्या कल्याणासाठी झटत आहेत. दिव्यांग कल्याण संघटनेत समाधान बंगाळे हा काम करीत असल्याने आपणही कळसूबाई शिखर पार करू शकतो, अशी जिद्द मनाशी बाळगून त्याने शिवाजी गाडे यांच्याशी संपर्क साधला. या मोहिमेत जिल्ह्यातून एकमेव समाधान बंगाळे हा दिव्यांग तरुण सहभागी झाला. २६ जानेवारीला संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण सुरू असताना इकडे महाराष्ट्रातील १९ अपंग हातात तिरंगा घेऊन गड सर करीत होते. समाधान एका पायाने दिव्यांग असतानाही काठीचा (कुबडीचा) सहारा घेत सकाळी ५:३० वाजता शिखर चढण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता सकाळी १०:३० वाजता १९ अपंग युवकांनी शिखराचा माथा सर केला. ६ तासाचा खडतर प्रवास करत १९ अपंग सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील १,६४६ मीटर उंचीचे सर्वोच्च शिखर सर केले आणि माथ्यावर भारत देशाचा तिरंगा डौलाने फडकविला. याबद्दल समाधान बंगाळे याला प्रशस्तिपत्र व गोल्ड मेडल देऊन संस्थेच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला. शिंदीसारख्या खेडेगावातून येऊन जिल्ह्याचा नावलौकिक वाढविल्यामुळे समाधानवर संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.