शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निक्षय पोषण योजनेचा क्षय रुग्णांना मिळतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 14:14 IST

एप्रिल २०१८ पासून ही योजना कार्यान्वीत केली असून जिल्ह्यातील साडेचार हजार क्षयरुग्ण या योजनेचा लाभ घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पूरक पोषण आहारही रोगापासून व्यक्तीला दूर ठेवण्यास मदत करतो. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्षयरुग्णांसाठी निक्षय पोषण योजना आधार ठरत आहे. एप्रिल २०१८ पासून ही योजना कार्यान्वीत केली असून जिल्ह्यातील साडेचार हजार क्षयरुग्ण या योजनेचा लाभ घेत आहेत.जिल्ह्यात महिन्याकाठी जवळपास १६० संशयीत रुग्ण आढळत असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. मधल्या काळात जिल्ह्यात १२६ क्षय रुग्ण एका सर्व्हेक्षणादरम्यान आढळून आले होते. त्यांच्यावरही उपचार करण्यात ेत आहे. प्रामुख्याने संसर्गातून हा आजार होता. बहुतांशवेळा प्रतिकार शक्तीची कमतरतेमुळे प्रामुख्याने व्यक्ती आजाराला बळी पडतो. मधल्या काळात सुमारे ३००० संशयीत रुग्ण आढळून आले होते. त्यांचे थुंकीचे नमुने, एक्सरे काढल्यानंतर तपासणीअंती १२६ क्षयरोगाचे रुग्ण असल्याचे समोर आले होते. खाणपानात झालेला बदल पाहता नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार बळावतो. त्यादृष्टीने अशा बाधीत रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एक एप्रिल २०१८ पासून उपचारावरील सर्व क्षय रुग्णांसाठी निक्षय पोषण आहार योजना अर्थात पोषण आहार भत्ता योजना सुरू करण्यात आली आहे. प्रामुख्याने या योजनेतंर्गत नियमित उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांना उपचार कालावधीत यात ५०० रुपये दरमहा पोषण आहार भत्ता देण्यात येत आहे. आदीवासी भागाकरीता हा भत्ता ७५० रुपये असल्याची माहिती डॉ. मिलींद जाधव यांनी दिली. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात दोन हजार ८०० क्षयरुग्ण आहेत. या योजनेच्या माध्यमातून क्षयरुग्णांना पुरक पोषण आहारासाठी हा भत्ता देण्यात येतो. त्यातून पोषमयुक्त आहार या रुग्णांना मिळावा व त्यांचे आरोग्य सुधारावे हा सकारात्मक दृष्टीकोण असून, नियमित स्वरुपात उपचार सुरू रहावे अशी भूमिका यामागे आरोग्य विभागाची असल्याचे समोर येत आहे.

जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजारक्षय रोग हा ‘मायकोबॅक्टेरिमय च्युबरक्युलोसिस’ नावाच्या जिवाणूमळे होणारा संसर्गजन्य असा रोग आहे. प्रामुख्याने फुफ्पुस व इतर कोणत्याही अवयवाचा तो असू शकतो. हाडे, सांधे, मज्जातंतूचा क्षय रोग होऊ शकतो. वजन कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थुंकीतून रक्त पडणे आणि सायंकाळी येणारा लाक्षणिक ताप ही या आजाराची लक्षणे असू शकतात.

७८ टक्के रुग्णांनी घेतला लाभएप्रिल २०१८ पासून सुरू झालेल्या या योजनेतंर्गत आतापर्यंत चार हजार ४२४ उपचार घेणाºया क्षय रुग्णांनी या या पुरक पोषण आहार भत्ता योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापोटी या रुग्णांना ६९ लाख ५८ हजार ५०० रुपयांचे देण्यात आले असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा