शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

निक्षय पोषण योजनेचा क्षय रुग्णांना मिळतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 14:14 IST

एप्रिल २०१८ पासून ही योजना कार्यान्वीत केली असून जिल्ह्यातील साडेचार हजार क्षयरुग्ण या योजनेचा लाभ घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पूरक पोषण आहारही रोगापासून व्यक्तीला दूर ठेवण्यास मदत करतो. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्षयरुग्णांसाठी निक्षय पोषण योजना आधार ठरत आहे. एप्रिल २०१८ पासून ही योजना कार्यान्वीत केली असून जिल्ह्यातील साडेचार हजार क्षयरुग्ण या योजनेचा लाभ घेत आहेत.जिल्ह्यात महिन्याकाठी जवळपास १६० संशयीत रुग्ण आढळत असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. मधल्या काळात जिल्ह्यात १२६ क्षय रुग्ण एका सर्व्हेक्षणादरम्यान आढळून आले होते. त्यांच्यावरही उपचार करण्यात ेत आहे. प्रामुख्याने संसर्गातून हा आजार होता. बहुतांशवेळा प्रतिकार शक्तीची कमतरतेमुळे प्रामुख्याने व्यक्ती आजाराला बळी पडतो. मधल्या काळात सुमारे ३००० संशयीत रुग्ण आढळून आले होते. त्यांचे थुंकीचे नमुने, एक्सरे काढल्यानंतर तपासणीअंती १२६ क्षयरोगाचे रुग्ण असल्याचे समोर आले होते. खाणपानात झालेला बदल पाहता नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार बळावतो. त्यादृष्टीने अशा बाधीत रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एक एप्रिल २०१८ पासून उपचारावरील सर्व क्षय रुग्णांसाठी निक्षय पोषण आहार योजना अर्थात पोषण आहार भत्ता योजना सुरू करण्यात आली आहे. प्रामुख्याने या योजनेतंर्गत नियमित उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांना उपचार कालावधीत यात ५०० रुपये दरमहा पोषण आहार भत्ता देण्यात येत आहे. आदीवासी भागाकरीता हा भत्ता ७५० रुपये असल्याची माहिती डॉ. मिलींद जाधव यांनी दिली. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात दोन हजार ८०० क्षयरुग्ण आहेत. या योजनेच्या माध्यमातून क्षयरुग्णांना पुरक पोषण आहारासाठी हा भत्ता देण्यात येतो. त्यातून पोषमयुक्त आहार या रुग्णांना मिळावा व त्यांचे आरोग्य सुधारावे हा सकारात्मक दृष्टीकोण असून, नियमित स्वरुपात उपचार सुरू रहावे अशी भूमिका यामागे आरोग्य विभागाची असल्याचे समोर येत आहे.

जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजारक्षय रोग हा ‘मायकोबॅक्टेरिमय च्युबरक्युलोसिस’ नावाच्या जिवाणूमळे होणारा संसर्गजन्य असा रोग आहे. प्रामुख्याने फुफ्पुस व इतर कोणत्याही अवयवाचा तो असू शकतो. हाडे, सांधे, मज्जातंतूचा क्षय रोग होऊ शकतो. वजन कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थुंकीतून रक्त पडणे आणि सायंकाळी येणारा लाक्षणिक ताप ही या आजाराची लक्षणे असू शकतात.

७८ टक्के रुग्णांनी घेतला लाभएप्रिल २०१८ पासून सुरू झालेल्या या योजनेतंर्गत आतापर्यंत चार हजार ४२४ उपचार घेणाºया क्षय रुग्णांनी या या पुरक पोषण आहार भत्ता योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापोटी या रुग्णांना ६९ लाख ५८ हजार ५०० रुपयांचे देण्यात आले असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा