शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

निक्षय पोषण योजनेचा क्षय रुग्णांना मिळतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 14:14 IST

एप्रिल २०१८ पासून ही योजना कार्यान्वीत केली असून जिल्ह्यातील साडेचार हजार क्षयरुग्ण या योजनेचा लाभ घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पूरक पोषण आहारही रोगापासून व्यक्तीला दूर ठेवण्यास मदत करतो. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्षयरुग्णांसाठी निक्षय पोषण योजना आधार ठरत आहे. एप्रिल २०१८ पासून ही योजना कार्यान्वीत केली असून जिल्ह्यातील साडेचार हजार क्षयरुग्ण या योजनेचा लाभ घेत आहेत.जिल्ह्यात महिन्याकाठी जवळपास १६० संशयीत रुग्ण आढळत असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. मधल्या काळात जिल्ह्यात १२६ क्षय रुग्ण एका सर्व्हेक्षणादरम्यान आढळून आले होते. त्यांच्यावरही उपचार करण्यात ेत आहे. प्रामुख्याने संसर्गातून हा आजार होता. बहुतांशवेळा प्रतिकार शक्तीची कमतरतेमुळे प्रामुख्याने व्यक्ती आजाराला बळी पडतो. मधल्या काळात सुमारे ३००० संशयीत रुग्ण आढळून आले होते. त्यांचे थुंकीचे नमुने, एक्सरे काढल्यानंतर तपासणीअंती १२६ क्षयरोगाचे रुग्ण असल्याचे समोर आले होते. खाणपानात झालेला बदल पाहता नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार बळावतो. त्यादृष्टीने अशा बाधीत रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एक एप्रिल २०१८ पासून उपचारावरील सर्व क्षय रुग्णांसाठी निक्षय पोषण आहार योजना अर्थात पोषण आहार भत्ता योजना सुरू करण्यात आली आहे. प्रामुख्याने या योजनेतंर्गत नियमित उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांना उपचार कालावधीत यात ५०० रुपये दरमहा पोषण आहार भत्ता देण्यात येत आहे. आदीवासी भागाकरीता हा भत्ता ७५० रुपये असल्याची माहिती डॉ. मिलींद जाधव यांनी दिली. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात दोन हजार ८०० क्षयरुग्ण आहेत. या योजनेच्या माध्यमातून क्षयरुग्णांना पुरक पोषण आहारासाठी हा भत्ता देण्यात येतो. त्यातून पोषमयुक्त आहार या रुग्णांना मिळावा व त्यांचे आरोग्य सुधारावे हा सकारात्मक दृष्टीकोण असून, नियमित स्वरुपात उपचार सुरू रहावे अशी भूमिका यामागे आरोग्य विभागाची असल्याचे समोर येत आहे.

जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजारक्षय रोग हा ‘मायकोबॅक्टेरिमय च्युबरक्युलोसिस’ नावाच्या जिवाणूमळे होणारा संसर्गजन्य असा रोग आहे. प्रामुख्याने फुफ्पुस व इतर कोणत्याही अवयवाचा तो असू शकतो. हाडे, सांधे, मज्जातंतूचा क्षय रोग होऊ शकतो. वजन कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थुंकीतून रक्त पडणे आणि सायंकाळी येणारा लाक्षणिक ताप ही या आजाराची लक्षणे असू शकतात.

७८ टक्के रुग्णांनी घेतला लाभएप्रिल २०१८ पासून सुरू झालेल्या या योजनेतंर्गत आतापर्यंत चार हजार ४२४ उपचार घेणाºया क्षय रुग्णांनी या या पुरक पोषण आहार भत्ता योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापोटी या रुग्णांना ६९ लाख ५८ हजार ५०० रुपयांचे देण्यात आले असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा